शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Editorial: संपादकीय: ज्याचे करावे बरे...; भारत नेहमी हाच अनुभव का घेतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 12:14 IST

पाकिस्तानचे जाऊ द्या; पण दुर्दैवाने, भूतानचा अपवाद वगळता, उर्वरित शेजारीही संधी मिळाली की भारतावर वार करण्यास मागेपुढे बघत नाहीत.

श्रीलंकेत अवघ्या पाच आठवड्यात दुसऱ्यांदा आणीबाणीची घोषणा झाली आहे. तसा तो देश गत तीन वर्षांपासून आर्थिक आणीबाणीचा सामना करीत होताच ! पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून विकासाच्या अपरिमित संधी उपलब्ध असलेल्या श्रीलंकेवर आज अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. तसा तो देश दुर्दैवीच !

जवळपास दीडशे वर्षे ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात घालवल्यावर श्रीलंकेला १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाले खरे; पण अवघ्या ३५ वर्षांनीच तब्बल २७ वर्षे लांबलेल्या भीषण गृहयुद्धास सामोरे जावे लागले. त्यामधून सावरण्यास प्रारंभ होत नाही तोच अवघ्या एक दशकाच्या आत, अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला. श्रीलंकेवर आज अब्जावधी डॉलर्सचे कर्ज आहे. महागाई गगनाच्याही पलीकडे पोहोचली आहे. विदेशी चलन गंगाजळीत ठणठणाट आहे. भरीस भर म्हणून कोरोना महासाथीच्या परिणामी आर्थिक गाड्याचे चाक रुतून बसले आहे. त्यावर सरकारी गैरव्यवस्थापनाने कळस चढविला आहे. श्रीलंकेचे हे जे हाल सुरू आहेत, त्याला परिस्थितीपेक्षाही भ्रष्ट, स्वार्थी, अपरिपक्व, दूरदृष्टीचा अभाव असलेले राजकीय नेतृत्वच जास्त कारणीभूत आहे. त्याचे चटके मात्र निरपराध नागरिकांना सोसावे लागत आहेत. त्यामुळे जनता रस्त्यांवर उतरून आंदोलन करीत आहे. सध्या तरी आंदोलन बव्हंशी शांततामय मार्गाने सुरू आहे; मात्र जनतेत राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे या बंधूंबद्दल प्रचंड रोष आहे. इतर राजकीय नेत्यांना त्याची जाणीव झाल्याने त्यांनी राजपक्षे परिवाराच्या बुडत्या जहाजावरून पटापट उड्या घेतल्या आहेत. त्यामुळे २०२० मधील संसदीय निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळविलेला राजपक्षे बंधूंचा पक्ष अल्पमतात आला आहे. परिणामी आर्थिक संकटाच्या जोडीलाच राजकीय संकटही उभे ठाकले आहे.

श्रीलंकेला एकमेव भारताचा शेजार लाभला आहे. त्यामुळे कोणत्याही संकटाच्या स्थितीत तो देश भारताकडे मदतीच्या अपेक्षेने बघत असतो. आताही श्रीलंकेला भारताकडून भरीव मदतीची अपेक्षा आहे आणि भारतानेही आपल्या या चिमुकल्या शेजारी देशाला नाराज केलेले नाही. यावर्षी जानेवारीपासून एप्रिलपर्यंत भारताने श्रीलंकेला तब्बल २.४ अब्ज डॉलर्सची मदत केली आहे आणि यापुढेही वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याबद्दल श्रीलंकन सरकारने भारताचे आभार मानले असले तरी, या मदतीमुळे श्रीलंकन जनतेत मात्र काहीशी नाराजी आहे. वस्तुतः भारताने केलेल्या मदतीमुळेच आज श्रीलंकेत चढ्या भावाने आणि अल्प प्रमाणात का होईना, पेट्रोल, डिझेल आणि अन्नधान्य उपलब्ध आहे. त्याबद्दल श्रीलंकन जनतेने भारताचे आभार मानायला हवे. भारतीय प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीलंकन नागरिक भारताबद्दल कृतज्ञता व्यक्त करतातही; पण श्रीलंकन प्रसारमाध्यमांमधील वृत्तांकनावर नजर टाकल्यास त्यांची नाराजीही लक्षात येते. त्यांच्या नाराजीचे कारण हे आहे की भारताने केलेल्या मदतीमुळे परिस्थिती निवळेल आणि त्यामुळे राजपक्षे बंधूंचा रोष कमी होऊन त्यांना राजकीय जीवदान मिळू शकेल, असे त्यांना वाटते! `ज्याचे करावे बरे, तो म्हणतो माझेच खरे!’ असा हा अनुभव भारताला जवळपास सर्वच शेजारी देशांच्या बाबतीत वारंवार येतो. भारत काही अमेरिका वा युरोपियन देशांप्रमाणे विकसित, श्रीमंत देश नाही. तरीदेखील भारत वेळोवेळी सर्वच शेजारी देशांना शक्य ती सर्व प्रकारची मदत करीत असतो. अगदी पाकिस्तानलाही नैसर्गिक आपत्तींच्या वेळी भारताने भरघोस मदत केली आहे.

पाकिस्तानचे जाऊ द्या; पण दुर्दैवाने, भूतानचा अपवाद वगळता, उर्वरित शेजारीही संधी मिळाली की भारतावर वार करण्यास मागेपुढे बघत नाहीत. अगदी चिमुकला मालदिवही त्या बाबतीत मागे नाही. संकट कोसळले की मदतीसाठी भारताकडे आशाळभूत नजरेने बघायचे आणि गरज सरताच चीनच्या कच्छपी लागून भारताच्या हितांना बाधा पोहोचवायची, असे वर्तन हे सगळे शेजारी देश करीत असतात. आज भारताकडून मदतीची आस लावून बसलेले राजपक्षे बंधू अवघ्या काही दिवसांपूर्वी चीनच्या बळावर भारताच्या कुरापती काढत होते, भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक असलेले प्रकल्प चीनी कंपन्यांना बहाल करीत होते. नेपाळचेही तेच सुरू आहे. मालदीव आणि बांगलादेशच्या यापूर्वीच्या सरकारांनीही भारताशी उघड वैर घेतले होते. या पार्श्वभूमीवर, भारताने शेजारी देशांना संकटांच्या वेळी मदत अवश्य करावी; पण ते भविष्यात `गरज सरो, वैद्य मरो’ अशी भूमिका स्वीकारणार नाहीत, असे बदलही आपल्या परराष्ट्र व्यवहार धोरणात करावेत !

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका