शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

एन. डी. पाटील! सर्वसामन्यांसाठी लढणारं वादळ अखेर विसावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 05:39 IST

अखेरचा श्वास घेईपर्यंत मी कष्टकरी माणसांसाठी लढतच राहणार, असा उल्लेख अलीकडे स्मृतिभ्रंश झाला तरी एन. डी.  भेटणाऱ्यांजवळ करत असत. त्यांचे जीवन म्हणजे सामाजिक न्यायासाठीची अखंड जीवननिष्ठा होती.

अन्यायाविरुद्ध संघर्ष हा आमचा नारा आहे, त्यासाठी वाट्टेल तेवढे कष्ट उपसण्याची तयारी आहे, अशा निर्धाराने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे नेतृत्व करणारे शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक नेते प्रा. नारायण ज्ञानदेव ऊर्फ एन. डी. पाटील थांबले. अखेरचा श्वास घेईपर्यंत मी कष्टकरी माणसांसाठी लढतच राहणार, असा उल्लेख अलीकडे स्मृतिभ्रंश झाला तरी एन. डी.  भेटणाऱ्यांजवळ करत असत. त्यांचे जीवन म्हणजे सामाजिक न्यायासाठीची अखंड जीवननिष्ठा होती. वयाच्या नव्वदाव्या वर्षीदेखील वाचन, मनन, चिंतन आणि न्याय्य हक्कासाठी लढा देण्याची ऊर्मी बाळगून असलेले ते नेते होते. त्यांनी सत्तेचे राजकारण कधी केले नाही. अनेक निवडणुका लढविल्या, पण हार-जीत महत्त्वाची मानली नाही.  लोकशाहीत राजकारण अधिकाधिक मूल्याधिष्ठ व्हावे, यासाठी निवडणुका हादेखील आंदोलनाचाच एक भाग आहे, अशी मांडणी ते करीत.

महाराष्ट्र विधानसभेच्या १९८५ च्या निवडणुकीत कोल्हापूरच्या गांधी मैदानावरील सभेत लाखभर लोकांसमोर अखंड सव्वातीन तास  त्यांचे भाषण झाले होते. संपूर्ण महाराष्ट्राची वाटचाल आणि पुढील दिशा त्यांनी मांडली होती. विचाराची बैठक स्पष्ट होती. राजकारण हे सत्तेसाठी नाही, तर समाजाच्या परिवर्तनासाठी आहे, यावर त्यांची ठाम निष्ठा होती.  त्यांनी महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नांवर ठाम भूमिका घेऊन संघर्ष केला. सहकारात शिरलेल्या अपप्रवृत्तींविरुद्धचा लढा, सेझ उभारताना शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधातील लढा, कोल्हापूरचा टोलविरोधी लढा, मोफत शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व्हावे, अंधश्रद्धा, शेतीमालाला रास्त भाव, शेतकऱ्यांना माफक दरात वीजपुरवठा; अशा अनेक लढ्यांमध्ये त्यांनी नेतृत्व केले. सहकारी साखर कारखाने कवडीमाेल किमतीत  विकले जात होेते. त्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात एन. डी. पाटील हा एकमेव नेता रस्त्यावर उतरून संघर्ष करीत राहिला. त्यांच्या आंदोलनामुळे काही साखर कारखाने सहकारात टिकून राहिले.
सेझची संकल्पना आली तेव्हा हजारो एकर शेतजमीन काढून घेऊन रयतेला भूमिहीन करण्याविरुद्ध एन. डी. पाटील यांनी मोठा संघर्ष उभा करून हे कट-कारस्थान हाणून पाडले.  एनडींचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ढवळीचा. सारे कुुटुंब अशिक्षित होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या संपर्कात ते आले आणि सारे आयुष्य बदलून गेले. कमवा व शिका योजनेतून शिक्षण पूर्ण केले. कर्मवीरांच्या तत्त्वानुसार शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा विडा उचलला. जीवनाच्या अखेरपर्यंत  एक पैशाचेही मानधन न घेता रयत शिक्षण संस्थेत कार्यकारिणी सदस्य ते चेअरमन पदापर्यंत काम केले.  राजकारणातही साधनशुचिता पाळली. अठरा वर्षे विधानपरिषदेवर आणि पाच वर्षे विधानसभेत कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद मंत्रिमंडळात ते सहकार खात्याचे मंत्री होते. त्यांच्या पुढाकारानेच विदर्भ-मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कापूस एकाधिकार योजना लागू केली गेली.
विधिमंडळात विरोधी बाकांवरून जनतेचा आवाज म्हणजे एन. डी. पाटील होते. त्यांच्या नैतिक दबदब्यामुळे कितीही मोठा नेता असला तरी, एनडींच्या विरोधात बोलण्याची हिंमत करत नसे. अर्थशास्त्र आणि इंग्रजीचे विद्यार्थी असलेल्या सरांचे वाचन अफाट होते. त्यांचे लिखाण देखील सतत चालू असायचे. मुंबईचे डाव्या पक्षाचे कार्यकर्ते लालजी पेंडसे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा दस्तावेज मांडताना मोठा ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथासाठी चाळीस पानांची सविस्तर प्रस्तावना एन. डी. पाटील यांनी लिहिली आहे. ती प्रस्तावना म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची संपूर्ण पूर्वपीठिकाच आहे.राजकीय नेते सामाजिक सुधारणेच्या चळवळीपासून फटकून वागतात. त्याला एन. डी. अपवाद होते. महाराष्ट्राच्या प्रत्येक सामाजिक चळवळीत ते आघाडीवर होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सलग चाळीस वर्षे अध्यक्ष हाेते. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या खुनाबद्दल त्यांना प्रचंड संताप होता. सत्ता, संपत्ती आणि साधनांच्या मोहापासून दूर असणारे एन. डी. यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव झाला. फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर श्रद्धा असणाऱ्या एनडींनी पुरस्कारांचा सर्व निधी जागच्या जागीच सामाजिक कार्यासाठी वाटून टाकला. त्यांचे सीमा आंदोलनासाठीचे योगदान कधीही विसरता येणार नाही. हा प्रश्न सुटला नाही, याची खंत जखम म्हणून मला साेबत घेऊन जावी लागेल, असे अखेरच्या काळात ते नेहमी म्हणत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

टॅग्स :N D Patilप्रा. एन. डी. पाटील