शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
3
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
4
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
5
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
6
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
7
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
8
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
9
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
10
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
11
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
12
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
13
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
14
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
15
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
16
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
17
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
18
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
19
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
20
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 08:12 IST

लोकांचा सरकारवरचा विश्वास ओसरू शकतो. मात्र, लोकशाहीवरील विश्वास अढळ असायला हवा!

भारत आज जो काही आहे, त्याचे महत्त्वाचे अधिष्ठान आहे लोकशाही. एवढे धर्म, पंथ, भाषा असूनही हा महाकाय देश झेपावला ते लोकशाहीमुळे. एखाद्या पक्षावरचा अथवा नेत्यावरचा लोकांचा विश्वास उडू शकतो. सरकारवरचाही विश्वास ओसरू शकतो. मात्र, लोकशाहीवरील विश्वास अढळ असायला हवा!

राहुल गांधींची पत्रकार परिषद म्हणून महत्त्वाची. त्याकडे गंभीरपणे पाहायला हवे. राहुल यांनी परवाच्या पत्रकार परिषदेत केलेला ‘एच-फाइल्स’चा स्फोट हा केवळ राजकीय आरोप नाही. निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच त्यामुळे तडा गेला आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आदल्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपाची फाइल बाहेर काढली. गेल्यावर्षी झालेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाली. निवडणूक आयोगाने भाजपशी हातमिळवणी केली आणि त्या पक्षाला विजय मिळवून दिला, असा आरोप त्यांनी केला. पंचवीस लाख बनावट नावे मतदार याद्यांमध्ये घुसडून सरकार चोरी झाली, असे त्यांचे म्हणणे आहे. त्या संदर्भातील भयावह आकडेवारीही त्यांनी मांडली.

काँग्रेसचे म्हणणे आहे की, असे घडले नसते, तर भाजपला सत्ता मिळू शकली नसती. काँग्रेस सत्तेत आली असती. तसे दहा ठोस मुद्दे आणि  १०० टक्के पुरावे त्यांच्याकडे आहेत! इतकेच नव्हे तर एका ब्राझिलियन मॉडेलच्या नावाचा वापर दहा मतदान केंद्रांवर २२ वेळा करण्यात आला आहे. हे धक्कादायक तर आहेच, पण निवडणुकांवरील विश्वास उडून जाण्यासारखे आहे. दुसरी बाजूही त्याचवेळी लक्षात घ्यावी लागते. निवडणूक आयोगाने तातडीने प्रतिक्रिया देत हे आरोप आधारहीन ठरवले आहेत. २०२४च्या ‘रोल रिव्हिजन’पासून मतदानापर्यंत काँग्रेसने एकदाही औपचारिक हरकती नोंदवल्या नाहीत, असे आयोगाने म्हटले आहे. काही वावगे घडले असते, तर पक्षाच्या बूथ एजंट्सनी प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर हरकत नोंदवली असती. ती का नोंदवली नाही? असा आयोगाचा प्रतिप्रश्न आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री नयाबसिंह सैनी यांनीही पलटवार करत काँग्रेसवर दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. या गदारोळात, अन्य काही ठिकाणी मतदार याद्यांतील विसंगती पुढे आल्याचे वृत्त आहे. अशी काही मोजकी उदाहरणे असली, तरी त्यामुळे शंका घेण्यास वाव निश्चितपणे आहे.

लोकशाही संस्थांनी अशा मुद्द्यांची दखल घेऊन आपली विश्वासार्हता वाढवली पाहिजे. राहुल गांधी म्हणतात, ते गंभीर आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि इतर दोन आयुक्तांनी भाजपसोबत संगनमत केले आहे. निवडणूक आयोगाने ‘ऑपरेशन सरकार चोरी’ सुरू करत काँग्रेसचा मोठा विजय पराभवात बदलून टाकला. नव्या पिढीला उद्देशून राहुल म्हणाले की, ‘तुमचे भविष्य चोरले जात आहे.’ राहुल गांधी यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री सैनी यांचा एक व्हिडिओ दाखवला. त्यात सैनी म्हणताना दिसतात, ‘आम्हाला हरयाणामध्ये विजयाबाबत पूर्णपणे खात्री आहे. सर्व तयारी पूर्ण झाली आहे.’ यावर राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाले, ‘जेव्हा सर्व एक्झिट पोल आणि संकेत काँग्रेसच्या विजयाच्या दिशेने बोलत होते, तेव्हा हे ‘इंतजाम’ म्हणजे नक्की काय?’

स्वायत्त निवडणूक आयोग हे भारताचे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही संघर्षाशिवाय भारतात सर्वांना मताधिकार मिळाला, तेव्हा अमेरिकेतही तो मिळालेला नव्हता. याच स्वायत्त निवडणूक आयोगामुळे मतदारांनी भल्याभल्यांचा तोरा उतरवला. इंदिरा गांधींनाही व्यक्तिगत पराभवाला सामोरे जावे लागले होते. २०१४मध्ये मतदारांनी सत्तांतर घडवले. त्याचे मुख्य कारण निवडणुका पारदर्शक पद्धतीने होत होत्या. निवडणूक आयोग स्वायत्त असल्यामुळेच हे घडू शकले. आता मात्र असे आरोप होणे हे लक्षण चांगले नाही. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे. निवडणूक आयोगावरील टीकेला भाजपने उत्तर देण्याचे कारण नाही. खुद्द आयोगाने आपली विश्वासार्हता अधोरेखित करायला हवी. मतदार यादीची स्वच्छता आणि पारदर्शकता, तांत्रिक तपासणीची काटेकोरता आणि तक्रार निवारणाच्या पायऱ्यांची सहज उपलब्धता या संदर्भातील प्रश्न राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेने उपस्थित केले आहेत.

निवडणूक आयोगाने हरयाणासंदर्भात स्वतंत्र स्पष्टीकरण करायला हवे. निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये सांख्यिक नमुना-पद्धतीने पडताळणी करत त्याचे निष्कर्ष सार्वजनिक स्तरावर सादर करायला हवेत. राहुल गांधींनी असेच आरोप महाराष्ट्र आणि कर्नाटकातील निवडणुकांबद्दलही केले आहेत. या आरोपांची दखल गंभीरपणे घ्यायला हवी. तशा सुधारणा व्हायला हव्यात. मतदान आणि लोकशाही प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास कायम राहावा, यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घ्यायला हवा.

English
हिंदी सारांश
Web Title : Democracy Questioned: H-Files Damage Trust in Election Process

Web Summary : Rahul Gandhi's 'H-Files' allegations of election fraud undermine democracy. He accuses the Election Commission of bias, citing discrepancies in voter lists. The Commission denies these claims, prompting a debate about electoral integrity and the need for transparent verification to maintain public trust in the democratic process.
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRahul Gandhiराहुल गांधीVotingमतदान