शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

भाजप देशाच्या संरक्षणाच्या बाजूने आहे की कसाबच्या बाजूने?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 06:31 IST

हा देश आणि सरकार दहशतखोरांच्या बाजूने आहे की विरोधात? आणि देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या एका हिंमतवान जवानाला शाप देणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीला खतपाणी घालणारे आहे की तिचा बंदोबस्त करणारे, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे.

‘दहशतवादाला धर्म नसतो. ती मनोवृत्ती नाहीशीच करायची असते’ हे महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख कै. हेमंत करकरे या देशभक्ताचे उद्गार आहेत. आपली मुलगी जुई नवरे हिला त्यांनी ते ऐकविले आहेत. जुई आता अमेरिकेत राहते. ती दोन मुलांची आई आहे. ‘हेमंत करकरे मी दिलेल्या शापामुळे मरण पावले’ असे अभद्र उद्गार काढणाऱ्या प्रज्ञा ठाकूर या भाजपच्या भोपाळमधील उमेदवार बाईविषयी बोलताना जुई म्हणाली, ‘तिला किंवा तिच्या शापवाणीला मला प्रतिष्ठा मिळवून द्यायची नाही. मात्र दहशत हा माणुसकीविरोधी अपराध आहे. कोणत्याही धर्माचा माणूस वा स्त्री तो करू शकतो. देशाचे पोलीस व अन्य संरक्षक यंत्रणा यांनी या अपराधाचा बंदोबस्त केला पाहिजे,’ असेही ती एका राष्ट्रीय दैनिकाला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी म्हणाली.

मालेगाव बॉम्बस्फोटात दोन डझन निरपराध माणसे मारली गेली. त्या स्फोटात प्रज्ञा ठाकूर ही पहिल्या क्रमांकाची आरोपी होती. तिला सगळ्या पुराव्यांनिशी करकरे यांनी पकडून गजाआड केले होते. त्या वेळी प्रज्ञाच्या नावामागे असलेल्या ‘साध्वी’ या उपाधीमुळे अनेक कर्मठ हिंदुत्ववाद्यांचे पित्त खवळले होते. त्यांनी करकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणारे फलक त्यांच्या घराभोवती लावले होते. मात्र त्याच सुमारास मुंबईवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा बंदोबस्त करताना कसाब या शत्रूसैनिकाच्या गोळ्यांनी करकरे यांचा बळी घेतला. त्यांच्या हौतात्म्याची बातमी येताच त्यांच्या घराभोवतीचे ते फलक संबंधितांनी गुपचूप काढून घेतले. हेमंत करकरे यांना त्यांच्या देशभक्तीसाठी शौर्य पदके दिली गेली. त्यांचे पुतळे अनेक जागी लागले. अनेक शहरांतील चौकांना त्यांचे नाव दिले गेले. इकडे प्रज्ञा ठाकूरविरुद्धचे पुरावे क्रमाने कमी होत गेले. साक्षीदार फितूर होत गेले व संशयाचा फायदा देत न्यायालयाने तिची नाइलाजाने सुटका केली. या खुनाच्या व दहशतखोरीच्या आरोपी स्त्रीला भाजपने भोपाळचे लोकसभेचे तिकीट दिले. वर ‘तिला तिकीट देऊन हिंदुत्वावरील दहशतखोरीच्या आरोपाला आम्ही उत्तर दिले’ असे निंदनीय उद्गार खुद्द पंतप्रधान मोदी यांनी काढले.

हा देश आणि त्याचे सरकार दहशतखोरांच्या बाजूने आहे की विरोधात, ते दहशतीला बळी पडणाऱ्या अधिकाऱ्यांना न्याय देणारे की त्यांना शाप देणाऱ्यांच्या बाजूने जाणारे आणि देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या एका हिंमतवान जवानाला शाप देणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीला खतपाणी घालणारे आहे की तिचा बंदोबस्त करणारे, असा प्रश्न पडावा अशी ही स्थिती आहे. हेमंत करकरे पोलीस खात्यात असताना त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल्यांचा बीमोड केला, म्हणून त्यांना ‘रॉ’मध्ये बोलाविले होते. काही काळ परदेशात प्रशिक्षण घेऊन ते भारतात आले व महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख झाले. जेथे जेथे त्यांची नियुक्ती होती तेथे तेथे त्यांनी आपल्या निष्पक्ष कामाचा ठसा उमटवला. अन्याय करणाऱ्यांवर कारवाई केली. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांशी नाते ठेवणारे करकरे आपल्या कर्तव्यात चोख होते. त्यांना त्यांचा पोलिसी गणवेश व देश याविषयी अभिमान होता. दहशतवाद्यांच्या धमक्या येत असताना व कर्मठ हिंदुत्ववाद्यांचे पक्ष त्यांना जीवे मारण्याची धमकी देत असताना व त्यांचे सारे कुटुंब दहशतीच्या छायेखाली असतानाही हा बेडर अधिकारी आपल्या कर्तव्याला जागला. त्याने प्राण दिला तोही देशाचे व मुंबईचे रक्षण करताना.

त्याला शाप देण्याची बुद्धी फक्त बुद्धिभ्रष्टांना व देशविरोधी वृत्तीच्या लोकांनाच होऊ शकते. करकरे हे त्यांच्या खात्यातील लोकांच्या, अधिकाऱ्यांच्या, मराठी माणसांच्या व देशाच्याही अभिमानाचा विषय होते व आहेत. त्यांची देशभक्ती व दहशतवादाला त्यांनी केलेला विरोध जरा लक्षात घेतला असता तर या साध्वीचे डोकेही ठिकाणावर राहिले असते. साध्वीच्या शापाला पाठिंबा दर्शविणारे पंतप्रधान आणि त्यांचा भाजप देशाच्या संरक्षणाच्या बाजूने आहे की त्याच्यावर हल्ला करणाऱ्या कसाबच्या बाजूने, हा प्रश्न अशा वेळी साऱ्यांना पडावा. साध्वीची बाजू देशविरोधी आणि करकरे यांची बाजू देशभक्तीची आहे हे स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाNarendra Modiनरेंद्र मोदी