शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अग्रलेख : बोम्मईंची कोलांटी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 08:25 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने सीमाप्रश्नावर छत्तीस वर्षांनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक गेल्या आठवड्यातच झाली होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने सीमाप्रश्नावर छत्तीस वर्षांनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक गेल्या आठवड्यातच झाली होती. अमित शहा यांच्या सूचनेनुसार दोन्ही राज्यांच्या प्रत्येकी तीन मंत्र्यांची समिती स्थापन करावी आणि सीमाप्रश्नावर चर्चा करावी, सीमेवर तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निश्चित झाले. दरम्यान योगायोगाने दहा दिवस चालणारे दोन्ही राज्यांच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानीच्या शहरात (नागपूर आणि बेळगाव) सोमवार, दि. १९ डिसेंबर रोजी सुरू झाले. अमित शहा यांच्या उपस्थित दिल्लीत झालेल्या बैठकीचे पडसाद दोन्ही अधिवेशनात उमटले. दोन्ही राज्यांत भाजप सत्तेवर असल्याने त्याची कोंडी करण्यासाठी चांगलीच संधी विरोधी पक्षांना मिळाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधिमंडळात जुनीच भूमिका पुन्हा मांडत सीमाप्रश्न कधीच निकाली निघाला आहे, कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, असे जाहीर केले. महाजन अहवालाच्या शिफारशी हा तोडगा होता, मात्र महाराष्ट्राने तो फेटाळल्याने विषय संपला आहे, असे सांगून टाकले.

हीच भूमिका हाेती तर अमित शहा यांनी बोलाविलेल्या बैठकीला त्यांनी उपस्थित राहण्याचे प्रयोजनच नव्हते. हाच मुद्दा पकडून कर्नाटकचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी बोम्मई यांना कोंडीत पकडले. दिल्लीच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रस्तावास बोम्मई यांनी सहमती दर्शवून ते बंगळुरूला परतले होते. त्याला बरोबर एक आठवडा झाला. तेवढ्यात त्यांनी कोलांटी उडी मारून अमित शहा यांचा मार्ग आम्हाला मान्य नसल्याचे स्पष्ट केलेले दिसते. प्रत्येकी तीन मंत्र्यांच्या समितीची अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही.

सीमेवरील तणाव निवळावा यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. याउलट महाराष्ट्रातील नेते आणि कार्यकर्त्यांना कर्नाटकात प्रवेशबंदी करून टाकली आहे. बेळगावात महाराष्ट्रात एकीकरण समितीच्या होणाऱ्या मेळाव्यास परवानगी नाकारण्यात आली. कार्यकर्ते आणि नेत्यांना मेळाव्याच्या दिवशी पोलिसांनी ताब्यात घेऊन सायंकाळी सोडले. याचाच अर्थ दिल्लीच्या बैठकीतील निर्णय कर्नाटकास मान्य नसल्याचेच बोम्मई यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. बोम्मई यांच्या या कोलांटी उडीवर मात करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत नेमकी झालेली चर्चा आणि घेतलेले निर्णय जाहीर केले पाहिजेत.

तीन मंत्र्यांची समिती कशासाठी नियुक्त करायची, तिची कार्यकक्षा कशी निश्चित करायची आहे, ती समिती कोणत्या मुद्द्यावर चर्चा करून केंद्रीय गृहमंत्रालयास सूचनावजा शिफारशी करणार आहे का, या साऱ्यांचा खुलासा होण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी बोलले पाहिजे. हा त्यांचा खासगी मामला होऊ शकत नाही. दोघेही महाराष्ट्रातील बारा कोटी मराठी जनतेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मराठी जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घेतले पाहिजेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळात विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्याचे टाळत राहणे शहाणपणाचे नाही. बोम्मई यांच्याप्रमाणेच शिंदे, फडणवीस यांनाही कोलांटी उड्या मारायच्या आहेत का, अशी शंका येते. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची राजकीय कोंडी होऊ शकते. ही अडचण समजून घेता येईल; पण खोटेपणा कशासाठी? झालेल्या बैठकीचा वृत्तांत तरी जनतेला सांगितला पाहिजे. एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, सीमावाद नावाचा काही प्रश्नच अस्तित्वात नाही असे विधिमंडळात सांगत असाल तर दिल्लीला जाण्याचे प्रयोजनच नव्हते.

कर्नाटकातील जनतेपेक्षा गृहमंत्र्यांची भीती अधिक जाणवली असणार आहे. त्यामुळेच बसवराज बोम्मई यांनी कोलांटी उडी मारली आहे. अमित शहा यांनी सुचविल्याप्रमाणे तीन तीन मंत्र्यांच्या समितीत कर्नाटक सहभागी होणार नाही, असे सांगण्याचे धाडस तरी बोम्मई यांनी दाखवावे. सीमावाद नाहीच, तर चर्चा करण्यासाठी समिती तरी कशाला हवी? की समिती स्थापन करण्याचे नुसतेच नाटक आहे? समिती जेव्हा स्थापन व्हायची तेव्हा होईल आणि तिच्या बैठका होतील तेव्हा होतील.. त्यातून काही निष्कर्ष निघतील किंवा मतभेद होऊन हाती काहीही लागणार नाही. सध्या तरी वेळ मारून महाराष्ट्रातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी माणसांना दुखवायचे नसेल का?

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक