शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

अग्रलेख : बोम्मईंची कोलांटी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 08:25 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने सीमाप्रश्नावर छत्तीस वर्षांनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक गेल्या आठवड्यातच झाली होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने सीमाप्रश्नावर छत्तीस वर्षांनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक गेल्या आठवड्यातच झाली होती. अमित शहा यांच्या सूचनेनुसार दोन्ही राज्यांच्या प्रत्येकी तीन मंत्र्यांची समिती स्थापन करावी आणि सीमाप्रश्नावर चर्चा करावी, सीमेवर तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निश्चित झाले. दरम्यान योगायोगाने दहा दिवस चालणारे दोन्ही राज्यांच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानीच्या शहरात (नागपूर आणि बेळगाव) सोमवार, दि. १९ डिसेंबर रोजी सुरू झाले. अमित शहा यांच्या उपस्थित दिल्लीत झालेल्या बैठकीचे पडसाद दोन्ही अधिवेशनात उमटले. दोन्ही राज्यांत भाजप सत्तेवर असल्याने त्याची कोंडी करण्यासाठी चांगलीच संधी विरोधी पक्षांना मिळाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधिमंडळात जुनीच भूमिका पुन्हा मांडत सीमाप्रश्न कधीच निकाली निघाला आहे, कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, असे जाहीर केले. महाजन अहवालाच्या शिफारशी हा तोडगा होता, मात्र महाराष्ट्राने तो फेटाळल्याने विषय संपला आहे, असे सांगून टाकले.

हीच भूमिका हाेती तर अमित शहा यांनी बोलाविलेल्या बैठकीला त्यांनी उपस्थित राहण्याचे प्रयोजनच नव्हते. हाच मुद्दा पकडून कर्नाटकचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी बोम्मई यांना कोंडीत पकडले. दिल्लीच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रस्तावास बोम्मई यांनी सहमती दर्शवून ते बंगळुरूला परतले होते. त्याला बरोबर एक आठवडा झाला. तेवढ्यात त्यांनी कोलांटी उडी मारून अमित शहा यांचा मार्ग आम्हाला मान्य नसल्याचे स्पष्ट केलेले दिसते. प्रत्येकी तीन मंत्र्यांच्या समितीची अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही.

सीमेवरील तणाव निवळावा यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. याउलट महाराष्ट्रातील नेते आणि कार्यकर्त्यांना कर्नाटकात प्रवेशबंदी करून टाकली आहे. बेळगावात महाराष्ट्रात एकीकरण समितीच्या होणाऱ्या मेळाव्यास परवानगी नाकारण्यात आली. कार्यकर्ते आणि नेत्यांना मेळाव्याच्या दिवशी पोलिसांनी ताब्यात घेऊन सायंकाळी सोडले. याचाच अर्थ दिल्लीच्या बैठकीतील निर्णय कर्नाटकास मान्य नसल्याचेच बोम्मई यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. बोम्मई यांच्या या कोलांटी उडीवर मात करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत नेमकी झालेली चर्चा आणि घेतलेले निर्णय जाहीर केले पाहिजेत.

तीन मंत्र्यांची समिती कशासाठी नियुक्त करायची, तिची कार्यकक्षा कशी निश्चित करायची आहे, ती समिती कोणत्या मुद्द्यावर चर्चा करून केंद्रीय गृहमंत्रालयास सूचनावजा शिफारशी करणार आहे का, या साऱ्यांचा खुलासा होण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी बोलले पाहिजे. हा त्यांचा खासगी मामला होऊ शकत नाही. दोघेही महाराष्ट्रातील बारा कोटी मराठी जनतेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मराठी जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घेतले पाहिजेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळात विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्याचे टाळत राहणे शहाणपणाचे नाही. बोम्मई यांच्याप्रमाणेच शिंदे, फडणवीस यांनाही कोलांटी उड्या मारायच्या आहेत का, अशी शंका येते. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची राजकीय कोंडी होऊ शकते. ही अडचण समजून घेता येईल; पण खोटेपणा कशासाठी? झालेल्या बैठकीचा वृत्तांत तरी जनतेला सांगितला पाहिजे. एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, सीमावाद नावाचा काही प्रश्नच अस्तित्वात नाही असे विधिमंडळात सांगत असाल तर दिल्लीला जाण्याचे प्रयोजनच नव्हते.

कर्नाटकातील जनतेपेक्षा गृहमंत्र्यांची भीती अधिक जाणवली असणार आहे. त्यामुळेच बसवराज बोम्मई यांनी कोलांटी उडी मारली आहे. अमित शहा यांनी सुचविल्याप्रमाणे तीन तीन मंत्र्यांच्या समितीत कर्नाटक सहभागी होणार नाही, असे सांगण्याचे धाडस तरी बोम्मई यांनी दाखवावे. सीमावाद नाहीच, तर चर्चा करण्यासाठी समिती तरी कशाला हवी? की समिती स्थापन करण्याचे नुसतेच नाटक आहे? समिती जेव्हा स्थापन व्हायची तेव्हा होईल आणि तिच्या बैठका होतील तेव्हा होतील.. त्यातून काही निष्कर्ष निघतील किंवा मतभेद होऊन हाती काहीही लागणार नाही. सध्या तरी वेळ मारून महाराष्ट्रातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी माणसांना दुखवायचे नसेल का?

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक