शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

भोळा आयाेग अन् EVM! कधीतरी निवडणूक आयोग आरोपांवर आत्मचिंतन करणार आहे की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 07:33 IST

देशाची अठरावी लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र, हरयाणा, दिल्ली आदी राज्यांची विधानसभा निवडणूकही याच पद्धतीने पार पाडण्यात आली. जिथे फेरमतमोजणीची मागणी झाली तिथेदेखील क्लिष्ट असे नियम लावून तक्रारींची वासलात लावली गेली

एखाद्या घटनात्मक संस्थेला न्यायव्यवस्थेकडून कितीवेळा सूचना दिल्या जाव्यात आणि त्या संस्थेशी संबंधित किती प्रकरणे न्यायालयात पोहोचावीत, याचा निश्चित असा मापदंड भारतात स्थापित नाही. तसा तो असता तरी तो वारंवार ओलांडल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाला खंत असती का हे सांगता येत नाही. कारण, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिका पुन्हा पुन्हा उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात दाखल होत आहेत. याचिकांमध्येही राजकारण असल्याने सगळ्यांवरच सुनावणी होते असे नाही. तटस्थ याचिकाकर्त्यांचे म्हणणे मात्र ऐकून घेतले जाते. ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफाॅर्म्स’ म्हणजे ‘एडीआर’ या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या अर्जाची दखल घेत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश दिले की, फेरमतमोजणी अथवा मतदानाची पडताळणी होण्याआधी मतदान यंत्रावरील आकडेवारी नष्ट करू नका.

गेल्यावर्षी एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याबद्दल हा अर्ज एडीआरने केला होता. ॲड. प्रशांत भूषण यांनी एडीआरची बाजू मांडताना सरन्यायाधीश संजीव खन्ना व न्या. दीपांकर दत्ता यांचे लक्ष वेधले की, एप्रिलमधील आदेशात न्यायालयाने मतमोजणी, मतदानयंत्रांची हाताळणी, त्या यंत्रातील डेटा आदींविषयी आखून दिलेल्या आदर्श कार्यप्रणालीच्या चाैकटीत काम झालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाचा तो निकाल ‘व्होटर व्हेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेल’ म्हणजे ‘व्हीव्हीपॅट’च्या शंभर टक्के मोजणीविषयीचा होता. न्या. खन्ना व न्या. दत्ता यांच्याच खंडपीठाने याचिका निकाली काढताना ती मागणी फेटाळली होती. मतदान यंत्राशी छेडछाड झाल्याचा संशय असेल किंवा फेरमतमोजणीची मागणी झाली तर मतदान यंत्रे बनविणाऱ्या कंपनीच्या अभियंत्याने येऊन तपासणी करावी, कोणताही गैरप्रकार झाला नसल्याची शहानिशा करावी, असे निर्देश त्यावेळी न्यायालयाने आयोगाला दिले होते. निवडणूक आयोगाने मात्र त्या निकालाचा अर्थ आपल्या सोयीने काढला आणि मतदानानंतर ४५ दिवसांचा नियम लावून ईव्हीएममधील डेटा नष्ट केला जाऊ लागला.

देशाची अठरावी लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र, हरयाणा, दिल्ली आदी राज्यांची विधानसभा निवडणूकही याच पद्धतीने पार पाडण्यात आली. जिथे फेरमतमोजणीची मागणी झाली तिथेदेखील क्लिष्ट असे नियम लावून तक्रारींची वासलात लावली गेली आणि ईव्हीएमची आकडेवारी नष्ट करण्यात आली. आता सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातील खंडपीठाने आयोगाला सुनावले आहे की, मुळात ईव्हीएमचा डेटा नष्ट करावा, असे त्या निर्देशांमध्ये अजिबात ध्वनित नव्हते. ईव्हीएमविषयी कोणाला शंका असेल तर कंपनीच्या अभियंत्याने यावे आणि यंत्राची तपासणी करून शंकेचे निरसन करावे, एवढेच आम्ही सुचविले होते. तुम्ही त्यापुढे गेला आणि निवडणूक चिन्ह अपलोड करणाऱ्या युनिटपासून ते मतदानाच्या आकडेवारीपर्यंत सारे काही काढून टाकत गेला.

न्यायालयाने फेरमतमोजणीचे प्रति मतदानयंत्र शुल्क ४० हजार रुपयांवरून कमी करण्याची सूचना आयोगाला केली आहे. इतकी रक्कम भरूनदेखील प्रत्यक्ष फेरमोजणी होतच नाही, असा अनुभव आहे. यात सर्वांत महत्त्वाचे हे की, न्यायालयांमध्ये अशा याचिका निवडणूक आयोगाच्या विरोधात दाखल होणे, न्यायालयांना जणू एवढेच काम उरले आहे अशा पद्धतीने सगळा सव्यापसव्य, यातून  निवडणूक आयोगाला काय साध्य करायचे आहे? न्यायव्यवस्थेचा यात खूप वेळ जातो. याचिका फेटाळली गेली तर वेगळे अर्थ काढले जातात.

निवडणूक आयोग या स्वायत्त व घटनात्मक संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. यावर कधीतरी निवडणूक आयोग आत्मचिंतन करणार आहे की नाही? आत्मचिंतनाऐवजी अलीकडे निवडणूक आयोग अनेक बाबतीत हटवादी भूमिका घ्यायला लागल्याची टीका होते. विशेषतः विरोधी पक्षांना आयोग मोजतच नाही. आयोगाकडून तटस्थ व निष्पक्ष भूमिकेची अपेक्षा असताना अनेकदा राजकीय पक्षांमध्ये आयोग भेदभाव करतो, विरोधकांना समान वागणूक मिळत नाही, असा आरोप आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश ज्या पार्श्वभूमीवर आले आहेत ती गंभीर आहे. गेल्या वर्षभरात भोळ्याभाबड्या निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचे नाव घेत जे केले ते निर्हेतूक होते, असे मानणे सोपे नाही.

टॅग्स :EVM Machineईव्हीएम मशीनElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSupreme Courtसर्वोच्च न्यायालय