शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय: आता खरा लसोत्सव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 04:56 IST

Corona Vaccination: अनेक राज्ये गेले काही दिवस लस तुटवड्याच्या तक्रारी करीत होते. या तुटवड्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला टीका उत्सव अपेक्षेइतक्या मोठ्या प्रमाणात होऊ शकला नाही.

कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणासंदर्भात देशातील विविध राज्यांंना जाणवणाऱ्या बऱ्याच अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने यासंदर्भातील धोरणात बदलाने केला आहे. अठरा वर्षांवरील सर्वजण लस घेण्यासाठी पात्र हा त्यातील सर्वांत ठळक विशेष आहे. सोबतच विविध लस उत्पादकांना पन्नास टक्के लस खुल्या बाजारात विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, लसीची किंमत कंपन्यांना आधी जाहीर करावी लागेल. राज्यांनाही त्यांच्या गरजेनुसार लस खरेदी करता येईल. खासगी रुग्णालये, उद्योग, कंपन्यांना लस खरेदी करता येईल. अनेक राज्ये गेले काही दिवस लस तुटवड्याच्या तक्रारी करीत होते. या तुटवड्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला टीका उत्सव अपेक्षेइतक्या मोठ्या प्रमाणात होऊ शकला नाही.

लसीकरणाचा हा तिसरा टप्पा १ मेपासून सुरू होईल व या निर्णयामुळे आता राज्य सरकारांना वारंवार केंद्र सरकारकडे बोट दाखवता येणार नाही. आपापल्या राज्यामधील जनतेची काळजी स्वत:च घेता येईल. लसींच्या उपलब्धतेवरून आरोप-प्रत्यारोपही खूप झाले आहेत. तेव्हा, केंद्र व राज्यामधील वितंडवादामुळे होणाऱ्या राजकारणालाही आळा बसेल, अशी आशा करूया. सगळ्यांना पुरेल इतकी लस उपलब्ध नसेल तर आधी कुणाला द्यावी यावर हे महामारीचे संकट आले तेव्हापासूनच चर्चा सुरू आहे. लहान मुले व वृद्धांची काळजी आधी घ्यायला हवी व कोरोना विषाणूचा संसर्ग लहान मुलांनी तुलनेने कमी होत असल्याने आधी साठी ओलांडलेल्या ज्येष्ठांचे लसीकरण करावे, अशी पहिली सूचना होती. त्यासोबतच वीस ते साठ हा उत्पादक वयोगट असल्याने त्याला आधी लसीचे संरक्षण द्यायला हवे, असे मानणाऱ्यांचाही एक वर्ग होता. भारतात सुरुवातीला ज्येष्ठांना, सोबत मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे सहआजार असलेल्या ४५ वर्षांवरील प्रौढांना लस देण्याचे धोरण आखण्यात आले. या मोहिमेचे दोन टप्पे झाले.

दरम्यान, महामारीच्या दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी वयाची मुले व तरुणांनाही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे आढळल्याने लस घेण्यासाठी पात्रतेची वयोमर्यादा खाली आणण्याची मागणी होऊ लागली. त्यानुसार, केंद्र सरकारने आता अठरा वर्षांवरील सर्वांना १ मेपासून लस देण्याचे धाेरण स्वीकारले आहे. सगळेजण वारंवार ज्याचा उल्लेख करतात तसा भारत हा तरुणांचा देश आहे. देशाची निम्मी लोकसंख्या पंचविशीच्या आत, तर पासष्ट टक्के लोकसंख्या पस्तीशीच्या आत आहे. नेमकेपणाने सांगायचे तर पंधरा वर्षांपर्यंतच्या वयोगटात देशाची २६.६२ टक्के, तर पंधरा ते ६४ वर्षे वयोगटात ६७ टक्के लोकसंख्या येते. ६५ वर्षे व त्यावरील लोकसंख्येचे प्रमाण अवघे ६.३८ टक्के इतके आहे. कालपर्यंत देशात जवळपास साडेबारा कोटी लोकांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. हा टप्पा भारताने ९२ दिवसांत गाठला. दिवसाला सरासरी २५ लाख लोकांना लस देण्यात येत असल्याचे लक्षात घेतले तर जवळपास शंभर कोटी लोकांना लस देण्यासाठी चारशे दिवस लागतील. पण, हा वेग अजिबात परवडणारा नाही. वारंवार स्वरूप बदललेला विषाणू अधिक घातक बनला आहे. मृत्यूचे आकडेही भयावह पातळीवर पोहोचले आहेत. अशावेळी लसीकरणाचा वेग दुप्पटीने, तिप्पटीने वाढविण्याची आवश्यकता आहे. झालेच तर अठरा वर्षांच्या आतील वयोगटाच्या लसीकरणाचे आव्हानही अजून शिल्लक आहेच.

लसींच्या किमती व त्यांच्या खरेदीवर सरकारने करावयाच्या खर्चाबद्दलही खूप चर्चा होत आहे. पाहिले तर ती चर्चा निरर्थक आहे. कारण, आजची गरज आहे ती लोकांचे जीव वाचविण्याची. माणसांच्या जिवापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. त्यासाठी सरकारी तिजोरीतील किती पैसा खर्च होतो किंवा सामान्यांना त्या खर्चाचा किती वाटा उचलावा लागतो, या गोष्टी निरर्थक आहेत. देशातील एकूण लस उत्पादन व वाढती मागणी याचा विचार करता हे सर्वच वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचे आव्हान खूपच मोठे आहे. घेतलेली लस किती दिवस प्रभावी असेल, हे अजून पुरेसे स्पष्ट झालेले नाही. दर सहा महिन्यांनी किंवा वर्षाला लस घ्यावी लागणार असेल तर तितके उत्पादन कंपन्यांना करावे लागणार आहे. हे सगळे तपशील विचारात घेतले तर देशातील जवळपास एकशेचाळीस कोटी जनतेचे लसीकरण डिसेंबरपूर्वी पूर्ण करावे लागेल. जेणेकरून लसीकरण सुरू झाल्याच्या तारखेला म्हणजे पुढच्या सोळा जानेवारीच्या आत तरी देशवासीयांच्या एकावेळेच्या लसीकरणाची मोहीम पूर्ण होईल.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या