शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

गडकरींची जोरदार रस्ते बांधणी; पण लोकप्रतिनिधीच उकळताहेत खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 04:19 IST

नितीन गडकरी यांना विनंती आहे, टोलवसुलीचा ठेका घेण्याचा तेजीचा धंदा करणाऱ्या राजकारण्यांना यातून खड्यासारखे बाजूला करा. रस्त्यांसाठी कंपन्यांनी केलेल्या गुंतवणुकीपेक्षा कितीतरी अधिकपट वसुली करण्याचा हा लुटीचा धंदाही होऊ नये.

‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा,’ या धोरणानुसार महाराष्ट्रात रस्तेबांधणीचा मोठा प्रयोग गेली २० वर्षे केला जातो. यावर मतमतांतरे झाली. मात्र, धोरण कायम राहिले. मुंबई-पुणे, पुणे-सोलापूर, औरंगाबाद-जालना, सोलापूर-औरंगाबाद, नाशिक-मुंबई, पुणे-कोल्हापूर आदी महामार्गांचे काम मार्गी लागले. पुणे-कोल्हापूर महामार्गाचे काम निकृष्ट झाले. त्याचे आता सहापदरीकरण चालू आहे. पनवेल ते गोवा या मार्गाचे चौपदरीकरण चालू आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने सर्वात मोठ्या ८०० किलोमीटरच्या मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे. नाशिक-पुणे रस्त्याचे काम रेंगाळले आहे.

महामार्गाचे काम होत असताना खासगी कंपन्या वाहनधारकांना लुटतील, अशी तक्रार होती. त्यात फारसे तथ्य नसले, तरी महाराष्ट्रातील सर्वच महामार्गांचे काम निकृष्ट आहे, हे मान्यच करावे लागेल, शिवाय त्यांची निगा ठेवली जात नाही. त्यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व समस्यांकडे शासकीय अधिकारी लक्ष देत नाहीत. वाहनधारकांच्या या समस्या आहेत. त्या माध्यमांतून मांडल्या गेल्या की, आमदार-खासदार आणि अनेक उपटसुंभ संघटना त्याचा गैरफायदा घेतात. खासगी कंपन्यांना वेठीस धरण्यासाठी या समस्यांचे भांडवल करतात. महामार्गांचे काम होत असताना त्या-त्या परिसरातील लोकप्रतिनिधींनी जागरूक राहून रस्ते वाहतुकीस योग्य कसे होतील; स्थानिक नागरिकांना त्यांचे व्यवहार करण्यास अडथळे येणार नाहीत, याची काळजी कशी घेतली जाईल आदींचा लोकप्रतिनिधींनी विचार करायला हवा. यांच्याच सभागृहात ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा,’ या धोरणाचा निर्णय होतो. मात्र, लोकांच्या, तसेच वाहनधारकांच्या समस्या सोडविण्याऐवजी त्यांचे भांडवल करून खंडणी वसुलीचे प्रकार महाराष्ट्रात चालू आहेत. याच्या तक्रारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत गेल्या.
आपल्या तडकाफडकी स्वभावाने धडाकेबाज काम करणारे गडकरी यांनी अशा आमदार-खासदारांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. यामध्ये ‘कोणत्याही पक्षाचे आमदार-खासदार असू देत; त्यांच्याविरुद्ध तक्रारी करा,’ असे आवाहनही त्यांनी केले. लोकांच्या समस्यांची ढाल करून, खासगी कंपन्यांवर दबाव आणून खंडण्या वसुलीचा धंदा तेजीतच आहे. सातारा येथील खासदार श्रीनिवास पाटील यांनी पुण्यात नुकतीच गडकरी यांची भेट घेऊन, पुणे-कोल्हापूर रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल त्यांना निवेदन दिले. तेव्हा या रस्त्याच्या कामात अडथळे आणणाऱ्या नेत्यांचा त्यांनी समाचारच घेतला. ‘खंडणी हवी अन्यथा टोलवसुलीचा ठेका हवा,’ अशी मागणी करणारे हे नेते रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल शब्द काढत नाहीत.
पुणे-कोल्हापूर रस्त्यावर चार वर्षांत सुमारे ७५० लोकांचे बळी गेले. याची त्यांना ना खंत, ना खेद वाटतो. गडकरी यांना विनंती आहे की, टोलवसुलीचा ठेका घेण्याचा तेजीचा धंदा करणाऱ्या राजकारण्यांनाही यातून खड्यासारखे बाजूला करा. रस्तेबांधणीसाठी येणारा खर्च, त्याचा परतावा किती द्यायचा, किती वर्षे द्यायचा, रस्त्यांची निगा राखण्यासाठी या कंपन्यांनी दरवर्षी किती रक्कम खर्च करावी आदींचा सर्व तपशील जाहीर करायला हवा. रस्त्यांसाठी गुंतवणुकीपेक्षा कितीतरी अधिकपट वसुली करण्याचा हा लुटीचा धंदाही होऊ नये.
रस्तेबांधणी हा देशबांधणीचा कार्यक्रम मानून त्यासाठी सर्वांनी हातभार लावावा. टोलवसुली योग्य व्हावी, कर्नाटकात बेळगाव जिल्ह्यातील प्युंज लॉइड या कंपनीच्या रस्त्याचे काम गडकरी यांनी एकदा पाहावे. त्यांची उत्तम निगाही आहे आणि नेत्यांना ते जवळही करीत नाहीत. केंद्रीय मंत्र्यांनी यात लक्ष घालून अशी खंडणी रोखण्यासाठी कडक धोरण स्वीकारणे गरजेचे आहे, अन्यथा आमदार-खासदारांच्या त्रासाने महाराष्ट्रात रस्त्यांची कोणी कामेच घेणार नाहीत. यातून महाराष्ट्राचे नुकसान तर होईल, पण ते मराठी माणसालाही बदनाम करील. या खंडणीबहाद्दरांच्या मुसक्या आवळा!

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी