शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

CoronaVirus News: लॉकडाऊन शेवटचा पर्याय; गरज आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 05:46 IST

लॉकडाऊन हा अखेरचा उपाय आपण करून पाहिला आहे. संपूर्ण समाजव्यवस्था लॉकअप करूनही आपण पुढे जात नाही आहोत, हे वास्तव स्वीकारावे लागेल.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा अखेरचा उपाय आहे, अशी भूमिका ‘लोकमत’ने अनेक वेळा मांडली आहे. याचे कारण असे की, लॉकडाऊन केल्याने आर्थिक व्यवहारावर परिणाम होतात आणि होणारे नुकसान भरून काढता येत नाही, सर्वच व्यवस्था कोलमडून पडते, त्यात शेवटच्या स्तरावर अगदी अंगमेहनतीचे काम करणाऱ्या माणसाला सर्वाधिक झळ सोसावी लागते. लॉकडाऊन करून सर्व व्यवहार याच्यासाठी बंद करावे लागतात की, आपण काही काळासाठी या लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून स्वत:ला घरी लॉकअप केले तर ‘ब्रेक द चेन’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरेल.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यात लॉकडाऊनचा निर्णय घेताना काहींनी त्याचा राजकीय मुद्दा बनविला. वास्तविक त्याची गरज नव्हती. लॉकडाऊनचा लाभ घेऊन आरोग्य व्यवस्था उभी करणे महत्त्वाचे होते. तज्ज्ञांच्या मते दुर्दैवाने कोरोना संसर्गाची तिसरी लाट आली, तर तिला तोंड देण्यासाठी पुरेशी व्यवस्था उभी करण्यात आपण आघाडी घेतली आहे का, याचे उत्तर नाही, असेच द्यावे लागते आहे. परिणामी दुसऱ्या लाटेतच असंख्य रुग्णांना गृह अलगीकरणाची मुभा देण्यात आली. परिणामत: संसर्ग वाढण्यासच त्याची मदत झाली. नागरिकांनी पुरेशी काळजी घेतली नाही. एकाच घरातील एकाच कुटुंबातील पाच-सहा जणांचा एक-दोन आठवड्यात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. तिघे सख्खे भाऊ, आई-वडील आणि त्यांचा कर्ता मुलगा मृत्युमुखी पडला. सारे कुटुंब उघड्यावर पडले.. अशी शेकडो उदाहरणे महाराष्ट्रात आहेत. आई-वडील दोघेही मृत्यू पावले आणि मुले अनाथ झाली, अशी नवीच समस्या समाजासमोर उभी राहिली आहे. अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम केअर ट्स्ट’मधून पेन्शन देण्याची योजना आखली आहे.
संसर्ग झालेल्या प्रत्येक रुग्णास आपण बेड देऊ शकलो नाही. गृह अलगीकरणाचा पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. कोविड केअर सेंटरमधील व्यवस्था ठिकठाक नसल्याने रुग्णांनीदेखील गृह अलगीकरणातच राहणे पसंत केले. खासगी किंवा कौटुंबिक डॉक्टरांचे उपचार घेण्यास प्राधान्य दिले. त्यांनीही व्यवसायासाठी गृह अलगीकरणाचा सल्ला दिला. त्यातून ही सर्व विदारक परिस्थिती निर्माण झाल्याचे मान्यच करावे लागेल. ‘मुंबई मॉडेल’ म्हणून ज्या मुंबई महापालिकेच्या यंत्रणेचा गौरवाने उल्लेख केला जातो आहे, तशी व्यवस्था सर्वत्र करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात आल्या आहेत का? हा प्रश्न सर्वांनी स्वत:लाच विचारून, वास्तविकतेशी तुलना करून पाहावी.
महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेची शक्यता फेब्रुवारीच्या मध्यासच दिसत होती. मार्च आणि एप्रिलमध्ये तिचा स्फोट संपूर्ण देशात झाला. त्याला सामोरे जाण्याची तयारी आपण करू शकलो नाही, हे आता तरी मान्य करूया. त्याचवेळी आपण काही उपाययोजना केली असती, संभाव्य संकटाचा अंदाज घेऊन वास्तव चित्रही लक्षात घेतले असते, तर आज पस्तावण्याची वेळ आपल्यावर आली नसती. दुसऱ्या लाटेचा बंदोबस्त करणे आपल्याला जमले नाही, याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरही परिणाम झाला असून भारताची मान खाली गेली आहे. भारताकडून अनेकांच्या अपेक्षा होत्या, पण त्या आपण पूर्ण करू शकलो नाही. आता नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होते आहे. लॉकडाऊनचा फेरविचार करायला हरकत नाही. मात्र या काळात निर्माण झालेली उच्चतम धोक्याची पातळी पुन्हा आपण गाठू शकणार नाही, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे आरोग्य व्यवस्था सुधारणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र किंवा कर्नाटकापेक्षा गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांची व्यवस्था भयावह होती. गंगा नदीच्या वाहत्या पाण्यात मृतदेह वाहताना पाहणे भयावह होते. लॉकडाऊन ते लॉकअप करून प्रत्येकाने आर्थिक, मानसिक, तसेच सामाजिक झळ सोसली आहे. आता प्रश्नांची तीव्रता लक्षात आली आहे. सरकारला आणीबाणीची परिस्थिती समजून आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्यावा लागणार आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना त्रास होईल, असा अंदाज वर्तविण्यात येऊ लागला, तेव्हा आपल्या आरोग्य व्यवस्थेत आवश्यक बालरोगतज्ज्ञांची पुरेशी संख्यादेखील नाही. अधिक सावधान होऊन काेरोना संसर्गाच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्याच वेगाने लसीकरणातील चुका दुुरुस्त करून सर्वांना लवकरात लवकर लस दिली पाहिजे. या दोन्ही आघाड्यांवर लढलो, तर कोरोनावर मात करू शकू अन्यथा लॉकअपने सामान्य जनतेची आर्थिक कोंडी होणार आहे. यासाठी लॉकडाऊन हा अखेरचा उपाय आपण करून पाहिला आहे. संपूर्ण समाजव्यवस्था लॉकअप करूनही आपण पुढे जात नाही आहोत, हे वास्तव स्वीकारावे लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या