शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

संपादकीय: वो सुबह जरूर आएगी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 06:32 IST

कोरोनाने व्यक्ती ते समष्टी असा जगण्याचा सगळा पट बदलून टाकला. दैनंदिनी, खाणेपिणे, आहार-विहार, सवयी, उपजीविका, इतकेच कशाला मानवी नातेसंबंध, कुटुंब, समाज वगैरेचा फेरविचार करायला लावला, हे अधिक महत्त्वाचे.

कोविड नावाच्या श्वास गुदमरून जीव घेणारा महाभयंकर विषाणू आढळल्याच्या, लागण झालेला पहिली व्यक्ती निष्पन्न झाल्याच्या घटनेला परवा, मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. चीनमधील वुहान शहरात बाधित आढळलेली हुबेई प्रांतातील ती ५५ वर्षांची व्यक्ती ‘पेशंट झिरो’ असल्याचा दावा काहींना मान्य नाही हे खरे. पण, गेले वर्षभर पृथ्वीच्या पाठीवर प्रत्येकाने भीतीच्या छायेखाली एकेक दिवस वर्षासारखा कंठला असल्याने नोव्हेंबर की डिसेंबर महत्त्वाचे नाहीच. देश-प्रदेश, जात-धर्म, भाषा-संस्कृती असा कशाकशाचा भेदाभेद न मानणाऱ्या विषाणूच्या संक्रमणाने बेफिकीर होऊन हवेत उडणाऱ्या माणसांना एका झटक्यात जमिनीवर आणले.

व्यक्ती ते समष्टी असा जगण्याचा सगळा पट बदलून टाकला. दैनंदिनी, खाणेपिणे, आहार-विहार, सवयी, उपजीविका, इतकेच कशाला मानवी नातेसंबंध, कुटुंब, समाज वगैरेचा फेरविचार करायला लावला, हे अधिक महत्त्वाचे. चीनमधून निघालेला हा विषाणू साधारणपणे मार्चपर्यंत हळूहळू जगाच्या कानाकोपऱ्यात गेला. युरोप, अमेरिकेच्यासारख्या महासत्तांना त्याने झुकायला लावले. भारतासारख्या खंडप्राय, प्रचंड लोकसंख्येच्या देशाला त्याने धडा शिकवला. असह्य वेदना दिल्या. आजही त्यातून अनेकजण सावरलेले नाहीत. कोट्यवधी स्थलांतरित मजूर, बायाबापड्या व चिमुकल्यांची जीवघेणी पायपीट देशाने अनुभवली. कोट्यवधींच्या पोटापाण्याची साधने संकटात आली. उद्योग, व्यवसायाची घडी विस्कटली. अर्थव्यवस्थेला प्रचंड धक्का बसला. ती रुळावर आणण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केल्यानंतर दसरा-दिवाळीच्या काळात काही चांगल्या गोष्टी घडताना दिसल्या तरी अजून खूप अंतर कापायचे आहे.

या वर्षभरात कोरोना विषाणू दंतकथा बनला. लॉकडाऊन, कन्टेन्मेंट, आयसोलेशन वगैरे शब्द परवलीचे बनले. आधी सांगितले गेले, चीनमधल्या वेट मार्केटमधून खरेदी केलेल्या वटवाघुळ किंवा अन्य कोणत्या तरी वन्यप्राण्यापासून हा विषाणू माणसाच्या शरीरात पोहोचला. नंतर त्यात जगाचे राजकारण आले. चीननेच हा विषाणू प्रयोगशाळेत मुद्दामच तयार केल्याचा आरोप झाला. आंतरराष्ट्रीय न्यायालयात चीनविरुद्ध खटला चालविण्याची भाषा वापरली गेली. अंतिमत: काही सिद्ध झालेले नाही. कदाचित देशोदेशींच्या सत्ताधाऱ्यांनी महामारीचा फैलाव रोखण्यातील अपयश लपविण्यासाठी ते केले असावे. अर्थात, राजकारणीच नव्हे तर रक्ताच्या नात्यातल्यांसह नानाविध स्वभावाचे लोक कसे वागले याचे चांगले-वाईट अनेक अनुभव प्रत्येकाच्याच गाठीशी असल्याने, ‘हे कोविड, तुझे रंग हजार’ म्हणायची वेळ आली.  

ही विषाणूविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. त्यावर विजय मिळविण्याचा ध्यास मानवी समुदायाने घेतला आहेच. इस्रायली लेखक युवाल नोआ हरारी यांनी त्यांच्या होमो डिअस पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, भूक, युद्ध व रोगराई या तीन शत्रूंवर मिळवलेल्या विजयाचा मोठा वारसा मानवजातीला आहे आणि त्याचा मार्ग विज्ञानावरील विश्वासातूनच जातो. कोणी कितीही भाकडकथा सांगितल्या तरी महामारीवर मात करण्याचा मार्ग विज्ञानच असल्याचे प्रत्येकाला मनोमन कळून चुकले आहे. थोडक्यात यानिमित्ताने विज्ञानाची महती मानवी मनांवर ठसवली गेली. तरीही धोका कायम आहे. किंबहुना तो अधिक वाढला आहे. युरोपमध्ये दुसरी लाट भयावह स्थितीत पोहोचली आहे. अमेरिकेतही स्थिती गंभीर आहे. इकडे दिल्लीत तिसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू आहे. विषाणूची भीती पाठीवर टाकून हातावर पोट असणारे लोक पुन्हा कामावर परतले आहेत. अनलॉक किंवा ‘मिशन बिगिन अगेन’ नावाने एकेक सार्वजनिक व्यवस्था खुली केली जात आहे. देवालये उघडली आहेत व ज्ञानालये उघडण्याची तयारी सुरू आहे. पण, हे करताना कमालीची दक्षता बाळगण्याची गरज आहे. एकमेकांपासून पुरेसे अंतर, मास्क व सॅनिटायझर हेच सध्या तरी या सावधगिरीचे उपाय आहेत.  कारण, संक्रमणाची ही आवर्तने सुरूच राहतील. डेंग्यू, स्वाइन फ्लू यांसारख्या विषाणूंप्रमाणे कोरोनासोबतही जगण्याची मानसिक तयारी सगळ्यांनी केली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीसाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. महिनाभरात ती आली तरी सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी बरेच महिने लागतील. सध्या संसर्गाने अंधारलेल्या क्षितिजावर सूर्योदयापूर्वीचे झुंजुमुंजु झाले, इतकेच म्हणता येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या