शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

चांगली सुरुवात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 08:38 IST

वाकडी आणि राईनपाडा येथे घडलेल्या घटनांमुळे माणुसकीला काळिमा फासला गेला. एकविसाव्या शतकात माणूस एवढा पाशवी बनू शकतो, याची कल्पना कोणी केली नसेल.

- मिलिंद कुलकर्णीवाकडी आणि राईनपाडा येथे घडलेल्या घटनांमुळे माणुसकीला काळिमा फासला गेला. एकविसाव्या शतकात माणूस एवढा पाशवी बनू शकतो, याची कल्पना कोणी केली नसेल. का असे घडते आहे, त्यामागील नेमकी कारणे काय, याविषयी समाजामध्ये आता विचारमंथन सुरु झाले आहे. वैचारिक पातळीवर नेहमीप्रमाणे दोन गट पडले आहेत. विचारवंत आपल्या विचारसरणीच्या चष्म्यातून या घटनांकडे पाहत त्यांचे विश्लेषण करीत आहेत. या विचारमंथनातून एक बाब समोर आली आहे की, या दोन्ही घटनांमधील पीडित आणि आरोपी हे समाजातील तळागाळातील, शोषित, पीडित घटकांमधील आहेत. गावगाड्यामध्ये अजूनही किती विषमता आहे, प्रबोधनाची आवश्यकता आहे, याचे या घटना म्हणजे निदर्शक आहेत. केवळ जातीमुळेच विषमता, अन्याय, अत्याचार घडतात, असे नाही तर सत्ता, संपत्ती ज्या घटकाकडे आहे, तो प्रभावशाली ठरत आहे. ही नवी सामाजिक उतरंड ग्रामीण भागात रुढ होत चालली आहे.

आपला देश हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष असल्याचे संविधानाने निश्चित केल्यानंतरदेखील जातीयता, धर्मांधता समाजात कायम आहे. जातीयता एवढ्या टोकाला गेलेली आहे की, एखाद्या गुन्ह्यात पीडित आणि आरोपी कोणत्या जाती-धर्माचा आहे, ते शोधले जाऊ लागले आहे. जाती-धर्माचा रंग देऊन या घटनेचे राजकारण केले जात आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलने केली जात आहेत. ९९ दोषी सुटले तरी चालेल पण एका निर्दोषाला शिक्षा होऊ नये, या तत्त्वावर न्यायव्यवस्था कार्यान्वित असताना दोषी कोण, त्याला रस्त्यावर फासावर लटकवा अशा मागण्या आंदोलनकर्ता जनसमुदाय करु लागला आहे. अराजकासारखी स्थिती निर्माण होऊ पहात आहे, हे निकोप समाजासाठी भयसूचक चिन्ह आहे.

वाकडी आणि राईनपाडा येथील घटनांचा प्रशासन केवळ पोलिसी तपासापुरता पाठपुरावा करीत आहे. मुलांना पळविणाऱ्या टोळीच्या अफवेमुळे राईनपाडाची घटना घडली, असे प्रथमदर्शनी दिसत असून त्यादृष्टीने जनजागृती करण्यात येत आहे. पोलीस दलाने राईनपाड्याजवळ रोहोड या गावी पोलीस दूरक्षेत्र स्थापित करुन अधिकारी व कर्मचारी कायमस्वरुपी तैनात केले आहे. त्यासोबत फिरते पोलीस स्टेशन गठीत करुन प्रामुख्याने आदिवासी भागामध्ये अधिकारी व कर्मचारी बैठका घेऊन जागरुकता आणण्याचे कार्य करीत आहे. पोलीस दलाचे हे स्वागतार्ह असे पाऊल आहे. पोलिसांविषयी आदरयुक्त भीती समाजामध्ये असते. पण हाच पोलिसदादा जेव्हा मार्गदर्शकाच्या रुपात, सल्लागाराच्या रुपात अवतरतो, तेव्हा जनसमुदायाला ही आधार देणारी बाब ठरु शकते. हाच मुद्दा हेरुन नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरींग दोर्जे यांनी फिरत्या पोलीस स्टेशनचा प्रयोग अवलंबिला आहे. राईनपाड्याच्या घटनेनंतर दोर्जे हे तातडीने घटनास्थळी आले. त्यानंतर पुढील आठवड्यात त्यांनी तब्बल सहा तास अधिकारी व कर्मचा-यांची बैठक घेतली. नंदुरबारला देखील त्यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. तडफदार अधिकारी परिस्थितीचे अचूक निदान करुन उपाययोजना कशा करतो, त्याचा अनुभव यानिमित्ताने येतो.

शोषित, पीडित घटकांविषयी अशी तळमळ, कळकळ इतर शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचाºयांना कधी येईल? ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, डाकसेवक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, लाईनमन, एस.टी.चालक, वाहक यांचा नियमित ग्रामीण आणि आदिवासी भागाशी संपर्क येत असतो. परंतु ज्या गावात नियुक्ती असते, त्या गावात हे कर्मचारी अजिबात राहत नाही. जवळच्या तालुक्याच्या ठिकाणाहून ये-जा केली जाते. अगदी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीदेखील आळीपाळीने ये-जा करीत असतात. त्यामुळे गावाशी, गावातील लोकांशी संवाद, संपर्क व समन्वय राहत नाही. कामापुरता मामा असेच नाते राहते. गावकºयांनादेखील ये-जा करणाºया या कर्मचाºयाविषयी जिव्हाळा, आपुलकी वाटत नाही. गावकरी आणि प्रशासकीय कर्मचारी ही दरी रुंदावत जात असल्याने खºया अडचणी उद्भवल्या आहेत. शासकीय योजना, उपक्रमांना न मिळणारा प्रतिसाद, लाभार्र्थींपर्यंत योजना न पोहोचण्याची दिल्ली, मुंबईमधील ओरड याला अशा गोष्टी कारणीभूत आहेत. मध्यंतरी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी एक दिवस खेड्यात जाऊन मुक्काम करण्याचा आदेश राज्य सरकारने काढला होता. हा चांगला प्रयत्न होता. पण बहुसंख्य शासकीय योजनांप्रमाणे आरंभशूरता याठिकाणीही झाली. आणि एक चांगला उपक्रम काळाच्या पडद्याआड गेला.