शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Holi 2020: आनंदाच्या रंगांनी आयुष्याचाच उत्सव होवो!

By विजय दर्डा | Updated: March 9, 2020 06:27 IST

होळी हा केवळ सण नव्हे, तर सद्भावनेच्या थोर परंपरेचे प्रतीक

विजय दर्डाकोरोनाच्या भयंकर साथीने आपणा सर्वांनाच घोर चिंता लागली आहे. या चिंताग्रस्त अवस्थेतच आपणा सर्वांचा आवडता होळीचा सण साजरा करणार आहोत. होळी हा रंगांचा उत्सव आहे, परस्परांच्या भेटीगाठींचा सण आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी कशी साजरी करावी, याची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. मला वाटते, बस्स, आपण सर्वांनी सतर्क राहण्याची खरी गरज आहे. आणखी हेही लक्षात घ्या की, उत्सव साजरा करणे ही प्रफुल्लित मनाची अवस्था आहे. त्यासाठी स्वत: आणि इतरांना रासायनिक रंगांनी माखविण्याची थोडीच गरज आहे? कोरड्या होळीसारखी उत्तम होळी अन्य कोणती असू शकते?

शिवाय यंदाच्या होळीला दिल्लीतील भीषण दंगलींच्या विषण्णतेची झालर आहे. दंगलींमुळे समाजात पसरलेला विखार अद्याप गेलेला नाही. त्यामुळे या होळीत आपण प्रेम व ममतेच्या रंगातच न्हाऊन निघू या! होळी हा केवळ रंगांचा सण नाही. सामाजिक सद््भाव व बंधुभावाची मुळे खोलवर रुजलेल्या आपल्या संस्कृतीचा तो प्रातिनिधिक उत्सवही आहे. होळी हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. समाजातील भेदभाव संपवून एकोप्याने राहण्याचा हा सण आहे. होळीच्या दिवशी जात व धर्माची सर्व बंधने गळून पडतात. नवोदित कवी संजय वर्मा यांनी लिहिलेल्या या ओळी किती समर्पक आहेत पाहा:

रंगों की कोई जात नहीं होतीभाईचारे के देश में दुश्मनी की बात नहीं होतीये खेल है प्रेम की होली कामिलकर रहते इसलिए टकराव की बात नहीं होती.

होळीच्या दिवशी वैर आणि शत्रुत्व विसरून सर्वांनी गळ्यात गळे घालण्याची भारताची जुनी परंपरा आहे. याचाच अर्थ असा की, तुम्ही दोस्तीचा रंग जेवढा गडद कराल तेवढेच वैमनस्य फिके होत जाईल. होळी साजरी करण्याच्या परंपरेविषयी अनेक किस्से आपल्या समाजात रूढ आहेत. पण मला असे वाटते की, समाजात प्रेम आणि बंधुभावाची भावना रुजविण्यासाठीच या सणाची सुरुवात झाली असावी. या सणाची परंपरा जुनी असली तरी आपण आजही तो तेवढ्याच उत्साहाने साजरा करतो याचे कारणच हे की, रंगांबद्दल आपल्या मनात मनापासून ओढ आहे.

आर्यांच्या काळातही होळी प्रचलित होती. नारद पुराण व भविष्य पुराणाच्या प्राचीन हस्तलिखितांमध्येही होळीचा उल्लेख आढळतो. प्रसिद्ध मुस्लीम पर्यटक अलबरुनीच्या प्रवासवर्णनातही या सणाचे वर्णन आहे. रंगांच्या या ताकदीमुळेच हा सण मुघलकाळातही टिकून राहिला. अकबर जोधाबाईसोबत व जहांगिर नूरजहाँशी होळी खेळत असे, असे इतिहासात नमूद आहे. शहाजहाँच्या काळात होळीला ईद-ए-गुलाबी व आब-ए-पाशी (रंगांचे फवारे) असे म्हटले जायचे. अंतिम मुघल बादशहा

बहादूरशहा जफर यांना होळीच्या दिवशी अनेक मंत्री रंग लावायचे. आपल्या समाजात बंधुभाव दृढ होण्यात होळीचे योगदान किती मोठे आहे, हे समजावे म्हणून मी इतिहासातील हे दाखले मुद्दाम दिले. एवढेच नव्हे, मुस्लीम कवींनी होळीवर सुंदर काव्यरचना केलेल्या आहेत. नझीर अकबराबादी यांची ही रचना माहीत नाही, असा भारतीय अभावानेच आढळेल:जब फागुन रंग झमकते हों,तब देख बहारें होली कीऔर डफ के शोर खड़कते हों,तब देख बहारें होली कीपरियों के रंग दमकते हों,तब देख बहारें होली कीकुछ घुंघरू ताल छनकते हों,तब देख बहारें होली की

नझीर अकबराबादी यांची ही रचना सुमारे १०० वर्षांपूर्वीची आहे. नझीर बनारसी यांचे हे ८० वर्षांपूर्वीचे काव्यही याहून कमी सरस नाही:कहीं पड़े न मोहब्बत की मार होली मेंअदा से प्रेम करो दिल से प्यार होली मेंगले में डाल दो बांहों का हार होली मेंउतारो एक बरस का खुमार होली मेंमिलो गले से गले बार बार होली मेंहोली मिलन हे खरे तर वैमनस्य दूर सारून समाजात दोस्तीचा रंग पक्का, अधिक गहीरा करण्याचे प्रतीक आहे. तेव्हा यंदाच्या होळीमध्ये आपण मैत्रीचा रंग एवढा गडद करू या, प्रेमाचा गुलाल एवढा दूरवर उधळू या की, वैराचे बीज समाजात अंकुरित व्हायलाही संधी मिळू नये! मग आनंदाची खरी रंगवर्षा होईल व संपूर्ण जीवनच जणू उत्सव होऊन जाईल! या पृथ्वीतलावर माणुसकीच्या रंगाहून सुंदर रंग कोणताही रंग नाही, हे पक्के लक्षात ठेवा.

तुम्हा सर्वांना होळीच्या मनापासून भरपूर शुभेच्छा! स्वस्थ राहा, आनंदी राहा. 

(लेखक लोकमत समूह एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत)

(vijaydarda@lokmat.com)

टॅग्स :Holiहोळीcolourरंग