शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Holi 2020: आनंदाच्या रंगांनी आयुष्याचाच उत्सव होवो!

By विजय दर्डा | Updated: March 9, 2020 06:27 IST

होळी हा केवळ सण नव्हे, तर सद्भावनेच्या थोर परंपरेचे प्रतीक

विजय दर्डाकोरोनाच्या भयंकर साथीने आपणा सर्वांनाच घोर चिंता लागली आहे. या चिंताग्रस्त अवस्थेतच आपणा सर्वांचा आवडता होळीचा सण साजरा करणार आहोत. होळी हा रंगांचा उत्सव आहे, परस्परांच्या भेटीगाठींचा सण आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी कशी साजरी करावी, याची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. मला वाटते, बस्स, आपण सर्वांनी सतर्क राहण्याची खरी गरज आहे. आणखी हेही लक्षात घ्या की, उत्सव साजरा करणे ही प्रफुल्लित मनाची अवस्था आहे. त्यासाठी स्वत: आणि इतरांना रासायनिक रंगांनी माखविण्याची थोडीच गरज आहे? कोरड्या होळीसारखी उत्तम होळी अन्य कोणती असू शकते?

शिवाय यंदाच्या होळीला दिल्लीतील भीषण दंगलींच्या विषण्णतेची झालर आहे. दंगलींमुळे समाजात पसरलेला विखार अद्याप गेलेला नाही. त्यामुळे या होळीत आपण प्रेम व ममतेच्या रंगातच न्हाऊन निघू या! होळी हा केवळ रंगांचा सण नाही. सामाजिक सद््भाव व बंधुभावाची मुळे खोलवर रुजलेल्या आपल्या संस्कृतीचा तो प्रातिनिधिक उत्सवही आहे. होळी हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. समाजातील भेदभाव संपवून एकोप्याने राहण्याचा हा सण आहे. होळीच्या दिवशी जात व धर्माची सर्व बंधने गळून पडतात. नवोदित कवी संजय वर्मा यांनी लिहिलेल्या या ओळी किती समर्पक आहेत पाहा:

रंगों की कोई जात नहीं होतीभाईचारे के देश में दुश्मनी की बात नहीं होतीये खेल है प्रेम की होली कामिलकर रहते इसलिए टकराव की बात नहीं होती.

होळीच्या दिवशी वैर आणि शत्रुत्व विसरून सर्वांनी गळ्यात गळे घालण्याची भारताची जुनी परंपरा आहे. याचाच अर्थ असा की, तुम्ही दोस्तीचा रंग जेवढा गडद कराल तेवढेच वैमनस्य फिके होत जाईल. होळी साजरी करण्याच्या परंपरेविषयी अनेक किस्से आपल्या समाजात रूढ आहेत. पण मला असे वाटते की, समाजात प्रेम आणि बंधुभावाची भावना रुजविण्यासाठीच या सणाची सुरुवात झाली असावी. या सणाची परंपरा जुनी असली तरी आपण आजही तो तेवढ्याच उत्साहाने साजरा करतो याचे कारणच हे की, रंगांबद्दल आपल्या मनात मनापासून ओढ आहे.

आर्यांच्या काळातही होळी प्रचलित होती. नारद पुराण व भविष्य पुराणाच्या प्राचीन हस्तलिखितांमध्येही होळीचा उल्लेख आढळतो. प्रसिद्ध मुस्लीम पर्यटक अलबरुनीच्या प्रवासवर्णनातही या सणाचे वर्णन आहे. रंगांच्या या ताकदीमुळेच हा सण मुघलकाळातही टिकून राहिला. अकबर जोधाबाईसोबत व जहांगिर नूरजहाँशी होळी खेळत असे, असे इतिहासात नमूद आहे. शहाजहाँच्या काळात होळीला ईद-ए-गुलाबी व आब-ए-पाशी (रंगांचे फवारे) असे म्हटले जायचे. अंतिम मुघल बादशहा

बहादूरशहा जफर यांना होळीच्या दिवशी अनेक मंत्री रंग लावायचे. आपल्या समाजात बंधुभाव दृढ होण्यात होळीचे योगदान किती मोठे आहे, हे समजावे म्हणून मी इतिहासातील हे दाखले मुद्दाम दिले. एवढेच नव्हे, मुस्लीम कवींनी होळीवर सुंदर काव्यरचना केलेल्या आहेत. नझीर अकबराबादी यांची ही रचना माहीत नाही, असा भारतीय अभावानेच आढळेल:जब फागुन रंग झमकते हों,तब देख बहारें होली कीऔर डफ के शोर खड़कते हों,तब देख बहारें होली कीपरियों के रंग दमकते हों,तब देख बहारें होली कीकुछ घुंघरू ताल छनकते हों,तब देख बहारें होली की

नझीर अकबराबादी यांची ही रचना सुमारे १०० वर्षांपूर्वीची आहे. नझीर बनारसी यांचे हे ८० वर्षांपूर्वीचे काव्यही याहून कमी सरस नाही:कहीं पड़े न मोहब्बत की मार होली मेंअदा से प्रेम करो दिल से प्यार होली मेंगले में डाल दो बांहों का हार होली मेंउतारो एक बरस का खुमार होली मेंमिलो गले से गले बार बार होली मेंहोली मिलन हे खरे तर वैमनस्य दूर सारून समाजात दोस्तीचा रंग पक्का, अधिक गहीरा करण्याचे प्रतीक आहे. तेव्हा यंदाच्या होळीमध्ये आपण मैत्रीचा रंग एवढा गडद करू या, प्रेमाचा गुलाल एवढा दूरवर उधळू या की, वैराचे बीज समाजात अंकुरित व्हायलाही संधी मिळू नये! मग आनंदाची खरी रंगवर्षा होईल व संपूर्ण जीवनच जणू उत्सव होऊन जाईल! या पृथ्वीतलावर माणुसकीच्या रंगाहून सुंदर रंग कोणताही रंग नाही, हे पक्के लक्षात ठेवा.

तुम्हा सर्वांना होळीच्या मनापासून भरपूर शुभेच्छा! स्वस्थ राहा, आनंदी राहा. 

(लेखक लोकमत समूह एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत)

(vijaydarda@lokmat.com)

टॅग्स :Holiहोळीcolourरंग