शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

Holi 2020: आनंदाच्या रंगांनी आयुष्याचाच उत्सव होवो!

By विजय दर्डा | Updated: March 9, 2020 06:27 IST

होळी हा केवळ सण नव्हे, तर सद्भावनेच्या थोर परंपरेचे प्रतीक

विजय दर्डाकोरोनाच्या भयंकर साथीने आपणा सर्वांनाच घोर चिंता लागली आहे. या चिंताग्रस्त अवस्थेतच आपणा सर्वांचा आवडता होळीचा सण साजरा करणार आहोत. होळी हा रंगांचा उत्सव आहे, परस्परांच्या भेटीगाठींचा सण आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी कशी साजरी करावी, याची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. मला वाटते, बस्स, आपण सर्वांनी सतर्क राहण्याची खरी गरज आहे. आणखी हेही लक्षात घ्या की, उत्सव साजरा करणे ही प्रफुल्लित मनाची अवस्था आहे. त्यासाठी स्वत: आणि इतरांना रासायनिक रंगांनी माखविण्याची थोडीच गरज आहे? कोरड्या होळीसारखी उत्तम होळी अन्य कोणती असू शकते?

शिवाय यंदाच्या होळीला दिल्लीतील भीषण दंगलींच्या विषण्णतेची झालर आहे. दंगलींमुळे समाजात पसरलेला विखार अद्याप गेलेला नाही. त्यामुळे या होळीत आपण प्रेम व ममतेच्या रंगातच न्हाऊन निघू या! होळी हा केवळ रंगांचा सण नाही. सामाजिक सद््भाव व बंधुभावाची मुळे खोलवर रुजलेल्या आपल्या संस्कृतीचा तो प्रातिनिधिक उत्सवही आहे. होळी हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. समाजातील भेदभाव संपवून एकोप्याने राहण्याचा हा सण आहे. होळीच्या दिवशी जात व धर्माची सर्व बंधने गळून पडतात. नवोदित कवी संजय वर्मा यांनी लिहिलेल्या या ओळी किती समर्पक आहेत पाहा:

रंगों की कोई जात नहीं होतीभाईचारे के देश में दुश्मनी की बात नहीं होतीये खेल है प्रेम की होली कामिलकर रहते इसलिए टकराव की बात नहीं होती.

होळीच्या दिवशी वैर आणि शत्रुत्व विसरून सर्वांनी गळ्यात गळे घालण्याची भारताची जुनी परंपरा आहे. याचाच अर्थ असा की, तुम्ही दोस्तीचा रंग जेवढा गडद कराल तेवढेच वैमनस्य फिके होत जाईल. होळी साजरी करण्याच्या परंपरेविषयी अनेक किस्से आपल्या समाजात रूढ आहेत. पण मला असे वाटते की, समाजात प्रेम आणि बंधुभावाची भावना रुजविण्यासाठीच या सणाची सुरुवात झाली असावी. या सणाची परंपरा जुनी असली तरी आपण आजही तो तेवढ्याच उत्साहाने साजरा करतो याचे कारणच हे की, रंगांबद्दल आपल्या मनात मनापासून ओढ आहे.

आर्यांच्या काळातही होळी प्रचलित होती. नारद पुराण व भविष्य पुराणाच्या प्राचीन हस्तलिखितांमध्येही होळीचा उल्लेख आढळतो. प्रसिद्ध मुस्लीम पर्यटक अलबरुनीच्या प्रवासवर्णनातही या सणाचे वर्णन आहे. रंगांच्या या ताकदीमुळेच हा सण मुघलकाळातही टिकून राहिला. अकबर जोधाबाईसोबत व जहांगिर नूरजहाँशी होळी खेळत असे, असे इतिहासात नमूद आहे. शहाजहाँच्या काळात होळीला ईद-ए-गुलाबी व आब-ए-पाशी (रंगांचे फवारे) असे म्हटले जायचे. अंतिम मुघल बादशहा

बहादूरशहा जफर यांना होळीच्या दिवशी अनेक मंत्री रंग लावायचे. आपल्या समाजात बंधुभाव दृढ होण्यात होळीचे योगदान किती मोठे आहे, हे समजावे म्हणून मी इतिहासातील हे दाखले मुद्दाम दिले. एवढेच नव्हे, मुस्लीम कवींनी होळीवर सुंदर काव्यरचना केलेल्या आहेत. नझीर अकबराबादी यांची ही रचना माहीत नाही, असा भारतीय अभावानेच आढळेल:जब फागुन रंग झमकते हों,तब देख बहारें होली कीऔर डफ के शोर खड़कते हों,तब देख बहारें होली कीपरियों के रंग दमकते हों,तब देख बहारें होली कीकुछ घुंघरू ताल छनकते हों,तब देख बहारें होली की

नझीर अकबराबादी यांची ही रचना सुमारे १०० वर्षांपूर्वीची आहे. नझीर बनारसी यांचे हे ८० वर्षांपूर्वीचे काव्यही याहून कमी सरस नाही:कहीं पड़े न मोहब्बत की मार होली मेंअदा से प्रेम करो दिल से प्यार होली मेंगले में डाल दो बांहों का हार होली मेंउतारो एक बरस का खुमार होली मेंमिलो गले से गले बार बार होली मेंहोली मिलन हे खरे तर वैमनस्य दूर सारून समाजात दोस्तीचा रंग पक्का, अधिक गहीरा करण्याचे प्रतीक आहे. तेव्हा यंदाच्या होळीमध्ये आपण मैत्रीचा रंग एवढा गडद करू या, प्रेमाचा गुलाल एवढा दूरवर उधळू या की, वैराचे बीज समाजात अंकुरित व्हायलाही संधी मिळू नये! मग आनंदाची खरी रंगवर्षा होईल व संपूर्ण जीवनच जणू उत्सव होऊन जाईल! या पृथ्वीतलावर माणुसकीच्या रंगाहून सुंदर रंग कोणताही रंग नाही, हे पक्के लक्षात ठेवा.

तुम्हा सर्वांना होळीच्या मनापासून भरपूर शुभेच्छा! स्वस्थ राहा, आनंदी राहा. 

(लेखक लोकमत समूह एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत)

(vijaydarda@lokmat.com)

टॅग्स :Holiहोळीcolourरंग