शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

पाकिस्तान अन् श्रीलंका, भारताचे शेजारी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 05:42 IST

दोन्ही शेजारी देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे भारताचा तिसरा शेजारी चीन!

पाकिस्तान आणि श्रीलंका हे आपले दोन्ही शेजारी देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे उभे राहिले आहे. पाकिस्तानने जन्मापासूनच भारताशी उभे वैर मांडलेले! आपला आकार, वकूब आणि कुवत विचारता न घेता, प्रत्येक बाबतीत भारताशी बरोबरी करण्याच्या पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या ईर्ष्येचा त्या देशाला नादारीप्रत पोहोचविण्यात मोठा हात आहे. श्रीलंकेचे मात्र तसे नाही. भारताच्या आगेमागेच स्वतंत्र झालेल्या या देशाचे भारताशी प्राचीन ऋणानुबंध आहेत. दोघांचा सांस्कृतिक वारसाही एकच! उभय देशांदरम्यान बराच काळापर्यंत सौहार्दपूर्ण संबंध होते; परंतु प्रारंभी त्या देशातील सिंहली-तामिळ वांशिक वादाची किनार आणि पुढे श्रीलंकन राज्यकर्त्यांच्या अवास्तव महत्त्वाकांक्षांपोटी संबंध काहीसे दुरावत गेले. हे दोन्ही शेजारी देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे भारताचा तिसरा शेजारी चीन!केवळ पाकिस्तान व श्रीलंकाच नव्हे, तर आफ्रिका खंडातीलही काही गरीब देशांना चीननेच दिवाळखोरीच्या उंबऱ्यावर नेऊन उभे केले आहे. चीन हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील सावकार आहे. सावकाराच्या कर्जाच्या सापळ्यात अडकलेली व्यक्ती कितीही परतफेड केली तरी कचाट्यातून मुक्त होऊ शकत नाही, त्याप्रमाणेच चीनकडून कर्ज घेतलेला देशही व्याजाच्या दलदलीतून बाहेर पडू शकत नाही. काही वर्षांपूर्वी चीनचे महत्त्वाकांक्षी नेते शी जिनपिंग यांच्या डोक्यातून ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ नावाची कल्पना बाहेर पडली. प्राचीन रेशीम मार्गाच्या धर्तीवर आशिया खंडातील देशांना रस्ते आणि रेल्वेमार्गाने पार युरोपला जोडायचे, अशी ही वरकरणी अत्यंत आकर्षक  योजना! प्रत्यक्षात तो गरीब देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवून त्या देशांमधील नैसर्गिक संसाधनांचे दोहन करण्याचा आणि सर्वदूर लष्करी प्रभाव वाढविण्याचा चीनचा कुटिल डाव होता, हे आता ध्यानी येऊ लागले आहे.

पाकिस्तान, श्रीलंकेसारख्या देशांच्या दृष्टीने तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अर्थात, चीनच्या पुरता कच्छपी लागलेला पाकिस्तान ते कदापिही मान्य करणार नाही. ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’अंतर्गत चीनने पायाभूत सुविधा विकासासाठी मोठी कर्जे वाटली. त्या कर्जांचा व्याजदर बराच जास्त आहे. त्यामुळे बरेच देश वेळेत कर्जांचे हप्ते फेडू शकले नाहीत आणि मग त्याचा लाभ घेत, चीनने त्या देशांमधील बंदरे, विमानतळ, जमिनी हडपण्यास प्रारंभ केला. श्रीलंकेतील हंबनटोटा बंदर चीनने अशाच प्रकारे तब्बल ९९ वर्षांसाठी घशात घातले आहे. त्यामुळे भारताच्या सुरक्षेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रकरण तेवढ्यावरच थांबले नाही, तर श्रीलंका कधीही दिवाळखोर होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेला आगामी वर्षभरात जवळपास साडेसात अब्ज डॉलर्स एवढे विदेशी कर्ज चुकवायचे आहे. महागाईचा दर ११ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे आणि श्रीलंकेची अर्थव्यवस्था ज्या पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे, तो उद्योग कोरोनामुळे रसातळाला गेला आहे. अशा परिस्थितीत श्रीलंका चीनचे कर्ज चुकविणार?
पाकिस्तानवर तर चीनचे सुमारे २५ अब्ज डॉलर्स एवढे प्रचंड कर्ज आहे. ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’चा पहिला प्रकल्प असलेल्या चीन- पाकिस्तान आर्थिक जोडमार्ग म्हणजेच सीपीईसीसाठी चीनने पाकिस्तानला भले थोरले कर्ज दिले. चीनचे अमेरिका अथवा भारतासोबत युद्ध झाल्यास, मलाक्काच्या सामुद्रधुनीत चिनी जहाजांचा मार्ग रोखून चीनचा खनिज तेलाचा पुरवठा खंडित केला जाऊ शकतो. त्यामुळेच चीन अनेक वर्षांपासून नव्या आयात मार्गाच्या शोधात होता. सीपीईसीच्या माध्यमातून चीनची ती गरज भागणार आहे; पण त्यासाठी चीनने पाकिस्तानला कर्जाच्या गाळात रुतवले आहे! या प्रकल्पापायी पाकिस्ताननेही ग्वादर बंदर चीनच्या घशात घातले आहेच आणि तो देश जवळपास दिवाळखोर झाल्याचे त्या देशातील प्रसारमाध्यमेच कंठशोष करून सांगत आहेत. भारतात त्यामुळे अनेकांना आनंद होत असला तरी, सीमेवर एक अण्वस्त्रधारी व दहशतवादाचे नंदनवन असलेला दिवाळखोर देश असणे भारताला परवडण्यासारखे नाही. श्रीलंका तर एवीतेवी आपला अति प्राचीन काळापासूनचा मित्र आहे. मित्र भरकटला तरी त्याला मदत करणे हे सच्च्या मित्राचे कर्तव्यच असते. त्यामुळे आपल्या दोन्ही शेजारी देशांमध्ये जे घडत आहे, त्याकडे त्रयस्थपणे न बघता परिस्थितीचा योग्य लाभ कसा घेता येईल, या दृष्टीने भारताने विचार करायला हवा!

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाchinaचीनPakistanपाकिस्तान