शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

घरचे बंद, अंगणातल्यांना प्रवेश बंद, मात्र बाहेरच्यांना निमंत्रण अशी काश्मीरची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 03:04 IST

काश्मिरात खरोखरच शांतता असेल तर तिची पाहणी भारतीय नेत्यांना करू देण्यात सरकारची अडचण कोणती होती? प्रत्यक्षात काश्मिरात अशांतता आहे. ८० लक्ष लोक महिनोन्महिने बंद राखले जात असतील तर तेथील शांततेला स्मशानशांतता म्हणणेच अधिक योग्य ठरेल.

देशात विदेशी पाहुण्यांचा सन्मान तर स्वदेशी मान्यवरांचा अपमान आहे. काश्मीरला भेट देण्यासाठी युरोपियन कॉमन मार्केटच्या निमंत्रित संसद सदस्यांचे भारतात आगमन झाले आहे. नरेंद्र मोदी व त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी त्याचे स्वागत केले आहे. त्यांना काश्मीरची माहिती देण्याची जबाबदारी संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांनी पार पाडली आहे. आता हे सदस्य काश्मिरात गेले असून तेथे ते सरकारी अधिकारी, राज्यपाल व काही निवडक पुढाऱ्यांच्या भेटी घेऊन तेथील परिस्थितीची पाहणी करत आहेत. प्रत्यक्षात त्या प्रदेशातील ८० लक्ष भारतीय गेले अडीच महिने कर्फ्यूच्या तडाख्यात बंद आहेत. शिवाय त्या प्रदेशात लष्करी कायद्याचा अंमल आहे. माध्यमे व सोशल मीडिया त्यांच्यावरील बंदीमुळे तेथील खरी परिस्थिती देशाला सांगत नाहीत. त्यात तेथे पत्रकारांना प्रवेश नाही. विदेशात आपली प्रतिमा चांगली राहावी यासाठी या विदेशी शिष्टमंडळाचा सध्याचा ‘कंडक्टेड टूर’ आहे. (एका निमंत्रित सदस्याने ‘मला जनतेला भेटता येईल काय’ असा प्रश्न सरकारला विचारला तेव्हा मोदींनी त्याला दिलेले निमंत्रणच रद्द केले.) काही आठवड्यांपूर्वी देशातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी काश्मीरला भेट देण्याची तयारी केली.

प्रत्यक्षात तेथील राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणावरून हे नेते तेथे जाणार होते. त्यात राहुल गांधींसोबत मायावती, अखिलेश यादव, तेजप्रसाद, सीताराम येचुरी, सिद्धरामय्या यासारखे जबाबदार राष्ट्रीय नेते होते. हे नेते दिल्लीहून श्रीनगरच्या विमानतळावर पोहोचले. तेव्हा तेथे त्यांच्यावर परतीचा हुकूम बजावून त्याच विमानाने त्यांना थेट दिल्लीला पाठवण्यात आले. या नेत्यांनी तेथे राहण्याचा आग्रह धरला असता तर त्यांच्यावर देशद्रोहापासून अतिरेक्यांना मदत करण्यापर्यंतचे सारे गुन्हे लादले गेले असते. मात्र हे सारे नेते संसद व राज्य विधिमंडळात दीर्घकाळ काम केलेले जबाबदार पुढारी असल्याने ते सरळ व शांतपणे दिल्लीला आले. स्वदेशी नेत्यांना अशी अपमानास्पद वागणूक देणारे सरकार विदेशी पाहुण्यांची सरबराई जोरात करीत असेल तर त्याचा अर्थ साऱ्यांना समजणारा आहे. या विदेशी लोकांनी आपापल्या देशात जाऊन काश्मीरची स्थिती शांत आहे व मोदींचे सरकार तेथे चांगले काम करीत असल्याची जाहिरात करावी हा त्यामागचा हेतू आहे. काश्मिरात खरोखरच शांतता असेल तर तिची पाहणी भारतीय नेत्यांना करू देण्यात सरकारची अडचण कोणती होती?

काश्मीरचे तीन माजी मुख्यमंत्री, त्यांच्या मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य व राजकीय संघटनांचे सर्व नेते नजरबंद आहेत. त्यांना माध्यमांशी बोलता येत नाही आणि देशालाही काही सांगता येत नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासात अशी बंदी प्रथमच लागू झालेली आहे. ज्या काळात युद्ध होते, पाकिस्तानचे टोळीवाले भारतात घुसले होते त्याही काळात तेथील बातम्या देशाला कळत होत्या. शिवाय देशातील नागरिक तेव्हाही काश्मिरात जाऊ शकत असत. आता विदेशी पाहुणे ठरवून दिलेल्या जागी व ठरवून दिलेल्या माणसांनाच भेटतात. ते भारतात काही बोलत नाहीत. विदेशात मात्र ते भारत सरकारच्या चांगल्या यजमानपदाची तारीफ केल्याखेरीज राहणार नाहीत. दु:ख याचे की या अन्यायाविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणताही पक्ष वा वृत्तपत्र आज करीत नाही. समाजालाही त्या प्रदेशातील लोकांविषयी फारशी आस्था असल्याचे दिसत नाही. त्यामुळे एवढी वर्षे जे मणिपूर, नागालँड आणि मिझोरममध्ये चालले तेच यापुढे काश्मिरातही चालण्याची भीती आहे. वास्तविक फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मुफ्ती महम्मद हे काश्मिरी नेते देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात राहिले आहेत. तेथे परवापर्यंत अधिकारावर असलेले मेहबुबा सरकार भाजपच्या मदतीने सत्तारूढ झाले होते. प्रत्यक्षात तो पक्षही वाजपेयींच्या पुढाकाराने स्थापन झाला होता. घरचे बंद, अंगणातल्यांना प्रवेश बंद, मात्र बाहेरच्यांना निमंत्रण अशी त्रिविध स्थिती आहे. हे दिवस जावे व देशाचे सारे प्रदेश पूर्वीसारखेच पुन्हा मुक्त व्हावे एवढेच.

टॅग्स :Narendra Ghuleनरेंद्र घुलेArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर