शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

संपादकीय: अभिजात मराठी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 08:56 IST

अभिजात भाषा ठरवण्यासाठी प्रामुख्याने चार निकष लावले जातात. त्या भाषेचे वय सांगणारे दस्तऐवज सादर करावे लागतात.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेला आणि राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पूर्वसंध्येला ही घोषणा झाली. या निर्णयाचे स्वागत करताना अवघ्या मराठी माणसांना आनंद होणे स्वाभाविक आहे. अमृतकालात ही ‘अमृताहूनि गोड’ बातमी आली आहे! २०१२ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून केंद्र सरकारला अहवाल सादर करावा यासाठीची ही समिती होती. या समितीने फेब्रुवारी २०१३ मध्ये आपला अहवाल सादर केला. तो अहवाल मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठीचा भरभक्कम स्वरूपाचा दस्तऐवज आहे.

अभिजात भाषा ठरवण्यासाठी प्रामुख्याने चार निकष लावले जातात. त्या भाषेचे वय सांगणारे दस्तऐवज सादर करावे लागतात. ते किमान दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीचे असावे लागतात. काळाच्या ओघात भाषा बदलली असेल, पण तिचा गाभा, चौकट बदलता कामा नये. वेगवेगळ्या काळात भाषेची संपूर्ण वेगळी रुपे असू नयेत. भाषेतील साहित्य श्रेष्ठ दर्जाचे असावे. इतर भाषांचा प्रभाव चालेल, पण ती स्वतंत्र भाषा असावी. हे चारही निकष मराठी भाषा पूर्ण करते, असे ठोस पुरावे या समितीच्या अहवालाने दिले. पठारे समितीने एक हजारांवर ग्रंथ, शिलालेख, ताम्रपट आदींचा संदर्भ देत मराठीचे अभिजातपण सिद्ध केले. मूळ विदर्भातील वाशिमच्या असलेल्या गुणाढ्य नावाच्या व्यक्तीने उत्तरेत जाऊन ‘बृहत्कथा’ हा ग्रंथ ‘पैशाची’ या प्राकृत भाषेत लिहिला. दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या या ग्रंथात अनेक प्रकरणे मराठी भाषेतील आहेत, तसेच श्रीलंकेत दोन हजार वर्षांपूर्वी ‘दीपवंश’ आणि ‘महावंश’ हे दोन ग्रंथ लिहिले गेले. त्यात अनेक मराठी भाषकांचा उल्लेख आहे. ‘गाथा सप्तशती’चा उल्लेख तर आवर्जून करायला हवा. ‘गाथा सप्तशती’ हा प्राकृत वाङ्‌मयातील आद्य व अग्रगण्य ग्रंथ आहे, असे अनेक संशोधक मानतात. ‘विनयपिटक’ या अडीच हजार वर्षांपूर्वी उत्तर भारतात लिहिलेल्या बौद्ध ग्रंथात ‘महाराष्ट्र’ हा प्रदेशवाचक उल्लेख आहे.

या अहवालात म्हटले आहे की, वैदिकपूर्व भाषांमधून संस्कृतचा जन्म झाला, तसाच मराठीचाही झाला. जुन्नरच्या नाणेघाटात प्राचीन शिलालेख आढळला आहे. तो ब्राह्मी लिपीत आणि महाराष्ट्री प्राकृतमध्ये आहे. २२२० वर्षांपूर्वीच्या या शिलालेखात मराठी बोलणाऱ्यांचा उल्लेख ‘मराहठीनो’ असा करण्यात आला आहे. संस्कृतपासून प्राकृत भाषा आली आणि त्यातून पुढे मराठी जन्माला आली. या गैरसमजाला यात पुराव्यासहित छेद दिला आहे. प्राकृत मराठी, महारठी, मरहट्टी, देशी, महाराष्ट्री आणि मराठी असे मराठी भाषेचे वेगवेगळे नामोल्लेख करण्यात आले असले तरी ती एकच भाषा होती, हे या अहवालाने स्पष्ट केले. मराठीच्या ज्ञात बावन्न बोलीभाषा आहेत. त्या सर्व तेवढ्याच समृद्ध आहेत. ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. बहात्तर देशांत ती बोलली जाते. या सर्व भरभक्कम पुराव्यांच्या आधारे मराठीला अभिजात दर्जा मिळाला आहे. केंद्र आणि राज्य स्तरावर मराठी भाषेतील संशोधन, विकास आदी बाबींसाठी आता भरभक्कम निधी उपलब्ध होऊ शकतो. देशभरातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. मराठीतील दस्तावेजीकरण आदी कामे वेग घेतील. या सर्व उपक्रमांमध्ये मराठी तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. मराठीच्या अभिजात दर्जामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचा प्रभाव वाढेल. हे सारे आहे छानच. मात्र, हे सर्व जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे आपोआप होईल, असे मानण्याचे कारण नाही. कोणतीही भाषा जागतिक स्तरावर पसरण्यासाठी त्या भाषेत ज्ञानाची निर्मिती होणे आवश्यक असते.

आज जगातील बहुतांश ज्ञान इंग्रजी भाषेत आहे. कारण वेगवेगळे शोध इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांनी लावलेले आहेत. उद्या मराठीला ते वैभव लाभायचे असेल तर विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र यात नवनवे शोध मराठी भाषकांनी लावले पाहिजेत. जगाला त्यांच्या भाषांमध्ये मराठी शब्द सामावून घ्यावे लागतील किंवा त्यासाठी प्रतिशब्द तयार करावे लागतील, असे मूलभूत संशोधन इथे व्हावे लागेल. बाजारपेठेत दिमाखात उभी ठाकल्याशिवाय भाषेचे तेज वाढत नाही, हेही लक्षात घ्यावे लागेल. त्यासाठी प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठांपर्यंत आणि ग्रंथालयांपासून ते प्रयोगशाळांपर्यंत सर्वदूर धोरणात्मक बदल करावे लागतील. तरच, ‘अमृताते पैजा जिंकणारी’ अक्षरे भविष्याच्या पाटीवर गिरवता येतील.

टॅग्स :marathiमराठी