शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

वैज्ञानिकांना पाठ थोपटून धीर द्यायला हवा!

By विजय दर्डा | Updated: September 9, 2019 02:31 IST

नैराश्याला थारा नाही, चंद्राला गवसणी नक्कीच घालू

विजय दर्डाचांद्रयान-२’ मोहिमेची अपेक्षेप्रमाणे सर्व उद्दिष्टे साध्य झाली नसली तरी, ही मोहीम फोल ठरली, असे कदापि म्हणता येणार नाही. २२ जुलै रोजी पृथ्वीवरून रवाना झाल्यापासून ‘चांद्रयान-२’ने सुमारे ३.८० लाख किमीचे अंतर विनाविघ्न पार केले. ‘विक्रम लॅण्डर’ने चंद्रावर उतरण्याच्या अखेरच्या टप्प्याची सुरुवातही शानदार केली. ज्या शेवटच्या १५ मिनिटांना वैज्ञानिक ‘धास्तीचा काळ’ म्हणत होते, त्यातील १३ मिनिटे ‘विक्रम’ने अचूक मार्गक्रमण केले. मात्र त्यानंतर काही तरी गडबड झाली. चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किमी उंचीवर असताना हे लॅण्डर काहीसे भरकटले आणि चंद्रावर अलगद उतरण्यास काही अंतर शिल्लक असतानाच त्याचा पृथ्वीवरील नियंत्रण केंद्राशी संपर्क तुटला. तरीही ‘चांद्रयान-२’ची मोहीम शानदार व जानदार झाली, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे .

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या (इस्रो) वैज्ञानिकांना काम करताना मी जवळून पाहिले आहे. त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करण्याचीही मला संधी मिळाली होती. मला या वैज्ञानिकांवर पूर्ण भरवसा आहे व त्याच विश्वासाने मी ठामपणे सांगू शकतो की, चंद्राला आपण लवकरच नक्की गवसणी घालू. वैज्ञानिकांची जिद्द किती बलवत्तर असते याचे एक उदाहरण सांगता येईल. चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात जेथे आजवर कोणताही देश गेलेला नाही तेथे एक ‘लॅण्डर’ व ‘रोव्हर’ पाठविण्यासाठी भारताने सन २००७ मध्ये रशियाशी एक करार केला. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सन २००८ मध्ये या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली. यात रशिया भारताला ‘लॅण्डर’ देणार होता. पण न जाणे का, सन २०१६ मध्ये रशियाने स्पष्ट नकार दिला. याने निराश न होता ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी हे एक आव्हान म्हणून स्वीकारले व स्वत:च ‘लॅण्डर’ विकसित करण्याचे ठरविले. अवघ्या दोन वर्षांत त्यांनी हा चमत्कार करूनही दाखविला! आता आपण जो ‘विक्रम लॅण्डर’ चंद्रावर पाठविला तोच हा लॅण्डर.

भारतातून अंतराळ याने सोडण्यासाठी प्रक्षेपण तळ उभारण्याच्या वेळीही ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी असाच अजोड आत्मविश्वास दाखविला होता. जेथून अंतराळ यानाचे प्रक्षेपण करणे सुलभ होईल, अशी जागा डॉ. होमी भाभा व डॉ. विक्रम साराभाई शोधत होते. शेवटी ते थिरुवनंतपूरमच्या शेजारी थुंबा या मच्छीमारांच्या छोट्याशा गावात पोहोचले. थुंबा हे पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्ताजवळ आहे म्हणून त्याची निवड केली गेली. पण अडचण अशी होती की तेथे एक प्राचीन चर्च होते. विक्रम साराभाई यांनी राजकीय नेते व अधिकाऱ्यांकडे मदत मागितली. पण चर्च तेथून हटविणे शक्य नाही, असे त्या सर्वांचे मत पडले. शेवटी साराभाई त्या चर्चचे प्रमुख बिशप बर्नार्ड परेरा यांच्याकडे गेले व त्यांनी आपल्या योजनेची त्यांना सविस्तर माहिती दिली. बिशप परेरा यांनी लगेच काही आश्वासन दिले नाही, पण त्यांनी साराभाई यांना रविवारच्या प्रार्थनेच्या वेळी हजर राहायला सांगितले! साराभाई रविवारी प्रार्थनेच्या वेळी चर्चमध्ये गेले. प्रार्थनासभेत बिशप परेरा यांनी जमलेल्या भाविकांना सांगितले की, आपल्याकडे एक प्रसिद्ध वैज्ञानिक आले आहेत व त्यांना अंतराळ संशोधनासाठी आपली ही जागा हवी आहे. बिशपने असेही सांगितले की, विज्ञान सत्याचा शोध घेते व मानवी जीवन अधिक चांगले करण्यास मदत करते. मी धर्माच्या माध्यमातून लोकांना मन:शांती देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे माझे व विक्रम साराभाई यांचे काम तसे पाहिले तर एकच आहे. ही जागा आपण त्यांना दिली तर दुसरे चर्च सहा महिन्यांत बांधून देण्याचे वचन साराभाई यांनी मला दिले आहे. असे सांगून त्यांनी, आपण साराभाई यांना आपल्या गॉडचे हे घर, तुमचे व माझे घर द्यावे का, असा प्रश्न प्रार्थनेसाठी जमलेल्या लोकांना केला. भाविकांनी लगेच ‘आमीन’ असे म्हणून एकमुखाने होकार दिला!

भारताचे अंतराळ प्रक्षेपण केंद्र थुंबा येथे उभे राहण्याचे श्रेय म्हणूनच विक्रम साराभाई यांच्याकडे जाते. सांगायचे तात्पर्य असे की, आपल्या वैज्ञानिकांमध्ये अपार चिकाटी आहे, कमालीची कुशाग्र बुद्धिमत्ता आहे. समस्यांनी ते जराही विचलित होत नाहीत. उलट नव्या दमाने, नव्या ईर्ष्येने पुन्हा कामाला लागतात. नासानेही आमच्या वैज्ञानिकांची प्रशंसा केली आहे. मला विश्वास आहे की, यावेळीही आमचे वैज्ञानिक यशस्वी होतील. आॅर्बिटरने ‘विक्रम’चा शोध तर लावलाच आहे, आता त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही ते करीत आहेत.दु:ख अनावर झालेल्या ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. आर. सिवन यांना प्रेमालिंगन देत, सांत्वन करून केवळ त्यांनाच नव्हे तर तमाम वैज्ञानिकांना धीर दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी यांची नक्कीच प्रशंसा करीन. हा एक भावनाप्रधान क्षण होता पंतप्रधानांनी या भावनात्मक वागणुकीने लोकांची मने जिंकली आहेत. आपणही या धीर देण्यात सामील व्हायला हवे. आपण वैज्ञानिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे. या जोरावर ते यापुढेही अनेक चमत्कार करत राहतील!

(लेखक लोकमत समूहच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन आहेत) 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रोNarendra Modiनरेंद्र मोदी