शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
3
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
4
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
5
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
6
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
7
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
8
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
9
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
10
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
11
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
12
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
13
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
14
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
15
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
16
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
17
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
18
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
19
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
20
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

वाडवडिलांनी कमावून ठेवलेल्या मालमत्ता विकून पोट भरण्याचा आरोप होऊ नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 03:15 IST

खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीकरण या दोन स्वतंत्र संज्ञा आहेत. सत्तेत असताना सरकारी कंपन्यांच्या खासगीकरण, निर्गुंतवणुकीकरणाची वकिली करणारा पक्ष सत्तेतून पायउतार होताच त्याविरोधात शंख करू लागतो!

आगामी आर्थिक वर्षात कोणत्याही परिस्थितीत एअर इंडियाचे जोखड झुगारायचेच, असा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. त्यासाठी एअर इंडियावरील सुमारे ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज स्वत: फेडण्याची तयारीही सरकारने केली आहे. दररोज सुमारे २६ कोटी रुपयांचा तोटा सहन करीत असलेल्या या सरकारी कंपनीपासून सुटका मिळविण्याची सरकारला किती घाई झाली आहे, हे यावरून दिसून येते. यानिमित्ताने सरकारी कंपन्यांचे खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा मुद्दा सर्वप्रथम चर्चेत आला तो १९९१ मध्ये भारताने खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाची कास धरल्यानंतर! त्यानंतर देशात या विषयावर बरेच चर्वितचर्वण झाले. देशातील प्रमुख राजकीय पक्ष या विषयावर कशी संधीसाधू भूमिका घेतात, हेदेखील देशाने अनुभवले.

मुळात खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीकरण या दोन स्वतंत्र संज्ञा आहेत; मात्र आपल्या देशात त्या सरसकट समानार्थी वापरल्या जातात. सरकारने एखाद्या सरकारी कंपनीतील ५१ टक्के अथवा त्यापेक्षा जास्त हिस्सा खासगी क्षेत्रास विकल्यास, त्या कंपनीचे व्यवस्थापन सरकारच्या हातून निसटते. त्याला खासगीकरण असे म्हणतात. दुसरीकडे सरकारने त्या सरकारी कंपनीतील आपला काही वाटा विकूनही ५१ टक्के अथवा त्यापेक्षा जास्त मालकी स्वत:कडे ठेवल्यास त्यास निर्गुंतवणुकीकरण असे संबोधले जाते. माजी निर्गुंतवणुकीकरण मंत्री अरुण शौरी यांनी खासगीकरण कसे असावे, याचे सुंदर उदाहरण प्रस्तुत केले होते. त्या वेळी हिंदुस्तान झिंक या तोट्यातील सरकारी कंपनीचा ४५ टक्के हिस्सा स्टरलाइट या खासगी कंपनीस सुमारे ७७० कोटी रुपयांना विकण्यात आला होता. त्यानंतरही हिंदुस्तान झिंकचे ३० टक्के समभाग सरकारकडे आहेत आणि आज त्यांचे बाजारमूल्य २७ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे.

शिवाय खासगीकरणानंतर कंपनीचा नफा एवढा वाढला आहे, की सरकारला वार्षिक सुमारे दहा हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते! अशा प्रकारे खासगीकरण अथवा निर्गुंतवणुकीकरण झाल्यास विरोध होण्याचे कारणच शिल्लक राहत नाही; तथापि नेहमीच तसे होत नाही. खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीकरणाच्या मुद्द्यावर देशात दोन मतप्रवाह आहेत. एका मतप्रवाहानुसार, मुळात उद्योग-व्यवसाय करणे हे सरकारचे कामच नाही आणि त्यामुळे सरकारने तातडीने त्यामधून बाहेर पडायला हवे! दुसरा मतप्रवाह असा आहे की, सरकारी कंपन्यांची विक्री आणि वाडवडिलांनी कमावून ठेवलेल्या मालमत्ता विकत पोट भरणे यात काहीही फरक नाही! या मतप्रवाहाचा पुरस्कार करणाऱ्या मंडळींचा खासगीकरणास सरसकट विरोध आहे, तर पहिल्या मतप्रवाहाचे समर्थक सरकारने सर्वच सरकारी कंपन्या संपूर्णपणे विकून टाकाव्या या मताचे आहेत.

हे दोन्ही टोकाचे मतप्रवाह चुकीचे आहेत. सरकारने उद्योग-व्यवसायात पडण्याचे काही कारणच नाही हे मत आज भले अगदी योग्य वाटत असेल; परंतु देश स्वतंत्र झाला तेव्हा देशात उद्योग-व्यवसायाचे वातावरण अजिबात नव्हते आणि तेव्हा सरकारने पुढाकार घेणे ही त्या काळाची गरज होती. त्या वेळी तसा पुढाकार घेण्यात आला म्हणूनच आज सरकारकडे विकण्यासाठी अनेक कंपन्या आहेत, ही बाब नजरेआड करता येणार नाही. राजकोषीय तोटा भरून काढण्यासाठी सरकारी कंपन्यांचे खासगीकरण अथवा निर्गुंतवणुकीकरण ही जर आजच्या काळाची गरज असेल, तर देशाला प्रगतिपथावर अग्रेसर करण्यासाठी, देशाची गरज भागविण्यासाठी, सरकारने उद्योग-व्यवसायात उतरणे, ही तेव्हाच्या काळाची गरज होती, ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल! आजच्या युगात सरकारी कंपन्या खासगी कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत, हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सरकारी कंपन्यांची विक्री अपरिहार्य आहे; परंतु ती करताना, वाडवडिलांनी कमावून ठेवलेल्या मालमत्ता विकून पोट भरण्याचा आरोप होऊ नये, एवढी काळजी सरकारने घ्यायलाच हवी. अर्थात ते वाटते तेवढे सोपे नाही!

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन