शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘संवेदना’च नाहीशी होणार असेल तर ‘जिवंत माणसाचं काम काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 08:08 IST

मी काही जाणकार लोकांना विचारलं ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स- ही कृत्रिम बुद्धिमत्ता नावाची काय गोष्ट आहे?

मी काही जाणकार लोकांना विचारलं ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स- ही कृत्रिम बुद्धिमत्ता नावाची काय गोष्ट आहे?’ त्या त्या क्षेत्रातल्या काही  लोकांनी मला जे सांगितले,  त्याचे सार मग मी माझ्या अल्प मतीप्रमाणे काढण्याचा प्रयत्न केला. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय?- आजपर्यंत सजीव माणूस आपलं डोकं चालवून जे काही नवं जुनं असेल ते ठरवत होता. मी लेखक असेन तर माझं लेखन जे काही बरं वाईट असेल ते माझं मी करीत असे.  आता  माणसाच्या कर्तृत्वशक्तीची बंधने संपणार आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्स नावाची गोष्ट  तुमच्या बुद्धिच्यापेक्षा जास्त क्षमतेने काम करणार... त्यामुळे ती तुमच्या बुद्धिमत्तेच्या पलीकडे जाणार. आर्टिफिशियल इंटिलिजन्सपुढे माणूस तोकडा पडणार.  म्हणजे मला स्थानच नाही काही.

मी एक लेखक असेन, मी काही बरा वाईट अनुभव घेऊन समजा एखादी कथा लिहिली तर आर्टिफिशियल इंटिलिजन्स त्याच्याहीपेक्षा मोठ्या गोष्टी आपोआप लिहू शकेल म्हणतात. म्हणजे तारा भवाळकर यांनी केले त्याला काहीच अर्थ नाहीये, मोडीत गेली ती!  मग माणसाच्या अस्तित्वाला किंमत राहणार की नाही? माणसाच्या हरेक कृतीमागे त्याचा अभ्यास, विचार आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याची संवेदना असते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जर ती संवेदनाच नाहीशी होणार असेल तर मग जिवंत माणसाचं काम काय?