शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

बुद्धीवर चढलेला गंज घातक!

By किरण अग्रवाल | Updated: January 17, 2019 09:41 IST

प्रयत्न करून व परिश्रम घेऊनही यश लाभत नाही तेव्हा निराशेची काजळी दाटणे स्वाभाविक असते. अशा स्थितीत कोणत्याही व्यक्तीचे अंधश्रद्धीय उपायांकडे झुकणे घडीभर समजूनही घेता यावे, पण विशेषत: तरुण पिढी प्रयत्नच करण्याचे आणि संधीची कवाडे उघडण्याचे सोडून तसे करताना दिसते तेव्हा आश्चर्य वाटून गेल्याखेरीज राहत नाही.

किरण अग्रवाल

प्रयत्न करून व परिश्रम घेऊनही यश लाभत नाही तेव्हा निराशेची काजळी दाटणे स्वाभाविक असते. अशा स्थितीत कोणत्याही व्यक्तीचे अंधश्रद्धीय उपायांकडे झुकणे घडीभर समजूनही घेता यावे, पण विशेषत: तरुण पिढी प्रयत्नच करण्याचे आणि संधीची कवाडे उघडण्याचे सोडून तसे करताना दिसते तेव्हा आश्चर्य वाटून गेल्याखेरीज राहत नाही. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात दिसणारे त्याचसंदर्भातले चित्र विषण्ण करणारे आहे.कुठल्याही व कुणाच्याही निमंत्रणाशिवाय लाखो, करोडो भाविक एकत्र येणे हीच खरी तर कुंभमेळ्याची आजच्या युगातही टिकून असलेली खासियत म्हणता यावी. श्रद्धा आणि आस्थेचे पर्व असलेल्या कुंभमेळ्याची ख्याती त्यामुळे विदेशातही पोहोचली आहे. साधू संतांची राहणी, भक्ती पंथाचा जागर यामुळे तर कुंभमेळा आकर्षणाचे केंद्र बनतोच पण नागा संन्याशींचे अचाट प्रयोगही अनेकांना खुणावत असतात. ठिकठिकाणच्या कुंभ व सिंहस्थ पर्वात त्याचे प्रत्यंतरही येत असते. प्रयागराजमध्येही शेकडो विदेशी पर्यटकच काय देशातील भाविकही त्या उत्सुकतेतून आलेले दिसत आहेत.कुंभग्राममध्ये एकीकडे आखाडे व साधू संतांच्या शिबिरात प्रवचने, कथा व भजनादी धार्मिक कार्यक्र म होत असताना दुसरीकडे छोट्या-छोट्या राहुट्या उभारून बसलेल्या नागा संन्याशींकडे आपल्या समस्या व अडचणींचे कुंभ रिते करताना भाबडे भाविक दिसत आहेत. समोरच्या यज्ञकुंडातील विभूती कपाळाला लावत अशांना त्यांच्या दान दक्षिणेच्या प्रमाणात समस्यामुक्तीचे अंधश्रद्धीय मार्ग सांगितले जातात व त्याने नवा आशावाद घेऊन सदर भाबडे भक्त चेहऱ्यावर समाधान दर्शविताना आढळून येतात. त्यांना भाबडे यासाठी म्हणायचे की, समस्यामुक्तीसाठी प्रयत्न करण्याचे सोडून ते नशिबावर विसंबून व कुणाच्या तरी आशीर्वादाच्या भरवशावर तरून जाण्यात विश्वास बाळगतात. हा भाबडेपणा आशिक्षिततेतून येतो तसा सारे पर्याय चाचपून थकल्यावरही येतो हा भाग वेगळा; पण तो भाबडा आशावाद असतो हेच खरे, अन्यथा सा-या शंकांचे समाधान असेच कुणाच्या चरणी शोधता आले असते, तर प्रयत्नांची गरजच उरली नसती.यातील विशेष अगर क्लेशदायी बाब अशी की, थिजलेल्या विचारांच्या व प्रयत्नांती हरलेल्या लोकांच्या अशा धडपडी एकवेळ समजूनही घेता याव्यात; पण तरुण मुलंदेखील मोठ्या संख्येने यात विश्वास दाखविताना दिसून आलेत. नोकरीचा प्रश्न असेल, मनाजोग्या सहचारिणीचा शोध असेल किंवा व्यवसायाशी संबंधित विषय, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या संन्याशींकडून मिळविले जाते. घरी शेती करावी की शहरात जावे याबाबतचा सल्लाही मोठ्या अधिकारवाणीने ते देताना दिसतात. असा सल्ला देणाऱ्यांना स्वत:च्या अंगाला राख फासण्याची वेळ का आली असावी याचा विचार मात्र तरुण मुलं करत नाहीत. खरे तर तरुणाई म्हणजे लाथ मारीन तिथे पाणी काढण्याची क्षमता असलेली पिढी, आव्हानाचे आकाश कवेत घेत स्वत:साठी स्वत:चे नवीन रस्ते बनविणारी व स्वप्नांना पंख लावून ती सत्यात उतरविण्याची धमक ठेवणारी पिढी; पण तरुणपणातच ती आत्मविश्वास गमावून कुण्या साधूच्या पुढ्यात समस्यामुक्तीचा मार्ग शोधताना दिसून येते म्हटल्यावर कपाळावर हात मारण्याची वेळ येते. कशातून घडून येते हे, तर अज्ञानातून व भाबड्या समजातून. विचारांची प्रक्रिया खुंटली व बुद्धीला गंज चढला की यापेक्षा दुसरे काही होणे नसते. त्यातून कपाळमोक्षच ओढवण्याची शक्यता असते. प्रयत्न, परिश्रम सोडून अशी कपाळमोक्ष करून घेऊ पाहणाऱ्यांची मोठी संख्या प्रयागराजच्या रस्त्यावरील साधूंसमोर बसलेली आढळून येते हे म्हणूनच आश्चर्यकारी आहे.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळा