शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

अग्रलेख: चकाके कोर चंद्राची.... भारताकडे कुत्सित नजरेने पाहणारे जग झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 07:26 IST

तरीदेखील भारताच्या संदर्भाने थोडेसे कटू असले तरी एक वास्तव नोंदवायलाच हवे...

राखेतून जन्म घेणाऱ्या फिनिक्स या मिथकामधील पक्ष्याप्रमाणे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चार वर्षांपूर्वीच्या अपयशातून पुन्हा नव्या उमेदीने चंद्राकडे झेप घेतली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या टापूवर विक्रम लंडर उतरविण्याचे अशक्य काम शक्य करून दाखविले. आधीच्या अंतराळ मोहिमा, विशेषतः चंद्रयान व मंगळयानावेळी भारताकडे कुत्सित नजरेने पाहणारे जग अवाक् झाले. बुधवारच्या चंद्रयान- ३ च्या यशाची दखल जगभरातल्या नामांकित वृत्तपत्रांनी घेतली. देशोदेशीची सरकारे व अंतराळ विज्ञान संस्थांनी इस्रो व भारत सरकारचे अभिनंदन केले. या अलौकिक व अद्भुत यशामुळे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ, यू. आर. राव उपग्रह केंद्राचे संचालक एम. शंकरन, चंद्रयान -३ चे प्रकल्प संचालक पी. वीरमुथ्थुवेल, सहयोगी प्रकल्प संचालक के कल्पना, मिशन ऑपरेशन संचालक श्रीकांत ही प्रमुख नावे जगभर पोहोचली.

मानवी स्वभावातील अज्ञाताबद्दलचे कुतूहल आणि जे जे अज्ञात त्याचा शोध घेण्याची मूलभूत मानवी प्रेरणा हाच विज्ञानाचा आधार असल्यामुळे तसेही या क्षेत्रात अपयश हा गुन्हा किंवा पाप मानले जात नाही. यशाच्या वाटेवरील तो नैसर्गिक विसावा मानला जातो. त्यामुळेच चंद्रयान- २ मोहिमेवेळचे इस्रोचे अध्यक्ष के. सिवन, तसेच अनेक निवृत्त शास्त्रज्ञही नव्या मोहिमेत सहभागी होते. या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांनीच सोनेरी इतिहास लिहिला गेला. आता, प्रियतमेला 'चौदवी का चांद'ची उपमा देणाऱ्या रसिक भारतीयांच्या नजरा पुढचे चौदा दिवस चंद्राकडे असतील. कारण, चंद्राचा एक दिवस आपल्या चौदा दिवसांच्या कालावधीचा असतो. विक्रम लँडरच्या कुशीतून वेगळा झालेला प्रग्यान रोव्हर चंद्रावर कोणत्या ना कोणत्या अवस्थेत पाणी उपलब्ध आहे का, याचा शोध घेईल. चंद्रावरील मानवी वस्तीचे वेध यापूर्वीच जगाला लागले आहेत; पण ती शक्यता पाण्याच्या उपलब्धतेवरच अवलंबून आहे.

सूर्यमालेतील अन्य ग्रहांच्या तुलनेत पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह म्हणून चंद्र खूप जवळ आहे. तो पृथ्वीभोवती फिरतो व सूर्याभोवतीही फिरतो. पृथ्वीभोवती फिरताना पुन्हा त्याच स्थितीत येण्यासाठी चंद्राला जवळपास १२८ दिवस लागतात. त्यामुळे चंद्रावर दिवस व रात्र पृथ्वीवरील १४ दिवसांच्या कालावधीची आहे. तसा फिरतानाच जेव्हा तो पृथ्वी व सूर्याच्या मध्ये अडथळा बनतो तेव्हा सूर्यग्रहण घडते तर जेव्हा चंद्र व सूर्याच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण अनुभवास येते. चंद्र व सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळेच पृथ्वीवर समुद्राला भरती व ओहोटी येते. चंद्राचे परिवलन व परिभ्रमण थोडे कललेल्या स्थितीत असल्याने, तसेच स्वतःभोवती व पृथ्वीभोवती फिरण्याचा कालावधी एकसारखा असल्याने त्याचा काही भाग कधीच पृथ्वीवरून दिसत नाही. चंद्राच्या ज्या भागात सूर्याची किरणे पोहोचतात तिथे प्रचंड तापमान, तर जिथे ती पोहोचत नाहीत तिथे प्रचंड थंडी असे विषम हवामान चंद्रावर आहे. कारण, पृथ्वीसारखा अतिनील सूर्यकिरणांपासून बचाव करणारा ओझोन थर चंद्रावर नाही. उष्णता व थंडीच्या अशा तीव्र हवामानाचा चंद्रावर रेडिओ लहरी परावर्तित करणारा आयनोस्पिअर, तसेच एकूण वातावरणावर होणारा परिणाम रोव्हरवरील 'रंभा' नावाचे उपकरण अभ्यासणार आहे. यातून निघणारे निष्कर्ष केवळ भारतच नव्हे, तर आपल्या सूर्यमालेच्या टोकापर्यंत, तसेच त्याहीपलीकडे अन्य सूर्यांच्या परिवाराचा अभ्यास करू पाहणाऱ्या जगाला एकूणच मानवी समुदायाला उपयोगी ठरतील. म्हणूनच, चंद्रयान-३ चे ऐतिहासिक यश केवळ भारताचे नाही, समस्त मानवजातीचे आहे.

तरीदेखील भारताच्या संदर्भाने थोडेसे कटू असले तरी एक वास्तव नोंदवायलाच हवे. चंद्रयान- ३ च्या रूपाने आपण देदीप्यमान यश मिळविले, प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली, ते स्वाभाविक आहे. कारण, असे अभिमानाचे क्षण आयुष्यात कधीतरीच येतात. देशप्रेम दाटून आल्यामुळे चंद्रावरील मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना, यज्ञ वगैरे ठीक असले तरी मिळालेले यश हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे आहे, हे विसरायचे नाही. यशाचा जल्लोष करताना देशातील एकूणच वैज्ञानिक दृष्टिकोनाचे काय, हा प्रश्न उपस्थित होतोच. अलीकडच्या काळात देशात छद्मविज्ञान जोरात आहे. प्राचीन भारतीय इतिहासाचे, संस्कृतीचे गोडवे गाताना आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञानाचा दुस्वास करण्याचे, ते नाकारण्याचे, अभ्यासक्रमातून चार्लस डार्विनचा उत्क्रांतीवाद किंवा तत्सम मूलभूत गोष्टी वगळण्याचे वेड वाढीस लागले आहे. हे असे होत राहिले, तर चंद्रयान- ३ सारख्या मोहिमांचे यश विद्यार्थी ढोल वाजवून साजरे करताना दिसतील. त्यामागील गणित, विज्ञान, तंत्रज्ञान त्यांना मुळात समजून घेता येणार नाही.

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रो