शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

बिघडलेले वेळीच सावरा! ...अशा परिस्थितीत सामाजिक सलोखा महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 09:40 IST

रामनवमी किंवा हनुमान जयंतीच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकांवर दगडफेकीचे प्रकार होणे, या समारंभात अडथळे निर्माण करणे असे प्रकार जाणूनबुजून केले जात आहेत. जेणेकरून विविध समुदायामध्ये गैरसमज निर्माण होईल, तणाव निर्माण होईल. अशा प्रकारांची केंद्र सरकारने गांभीर्याने नोंद घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे.

आपल्या देशातील तेरा प्रमुख राजकीय पक्षांनी देशातील सामाजिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना यावर केंद्र सरकारने वेळीच पावले उचलली पाहिजेत, असे मत व्यक्त केले आहे. या राजकीय पक्षांनी तशा आशयाचे निवेदन प्रसिद्धीस देऊन आपल्या साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. सरकारबरोबर देशाच्या सर्व संवेदनशील नागरिकांनी, विचारवंतांनी, संपादक, माध्यमांनी विचार करण्यासारखी स्थिती आली आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, डाव्या पक्षाचे नेते, आदींनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यांचे म्हणणे असे आहे की, देशात सणासुदीचे दिवस असताना आणि अनेक महापुरुषांच्या जयंती साजऱ्या होत असताना सामाजिक सलोखा बिघडेल असे वातावरण बनविले जात आहे.

रामनवमी किंवा हनुमान जयंतीच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकांवर दगडफेकीचे प्रकार होणे, या समारंभात अडथळे निर्माण करणे असे प्रकार जाणूनबुजून केले जात आहेत. जेणेकरून विविध समुदायामध्ये गैरसमज निर्माण होईल, तणाव निर्माण होईल. अशा प्रकारांची केंद्र सरकारने गांभीर्याने नोंद घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे. जातीय किंवा सामाजिक सलोखा बिघडणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे, याकडे सरकारचे आणि समाजाचेही लक्ष त्यांनी वेधले आहे. वास्तविक, विरोधी पक्षांचे हे कर्तव्यच आहे. त्यांची ही जबाबदारीच आहे की, समाजातील शांतता भंग पावत असेल तेव्हा सरकारचे लक्ष वेधून घेतले पाहिजे. शासन आणि प्रशासन याची नोंद घेत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांनाही सतर्क करणे, ही विरोधी पक्षांची जबाबदारी आहे. ज्या तेरा राजकीय पक्षांनी हे निवेदन प्रसिद्ध केले आहे त्यांच्या नेत्यांनी सरकारमध्ये महत्त्वाची पदे भूषविली आहेत.

ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन आणि हेमंत साेरेन हे प्रमुख तीन राज्यांचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मतास महत्त्व आहे. यावर सरकारने खुलासा करून निवेदनाचा स्वीकार करून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा समाजकंटकांना दिला पाहिजे. केंद्र किंवा विविध राज्यांची सुरक्षा यंत्रणा गुप्तपणे अनेक प्रकारची माहिती घेत असते. त्यांना वातावरणातील बिघाडाचा अंदाज येत असतो. त्यांनी तसे अहवाल सरकारच्या पातळीवर वेळोवेळी दिलेले असतात. त्यावर संवेदनशील पद्धतीने विचार होणे अपेक्षित असते. दिल्लीच्या काही भागात, उत्तर प्रदेशातील काही शहरांत, कर्नाटकात अशा घटना घडलेल्या आहेत. याची नोंद सरकारने अगोदरच घ्यायला हवी होती. काही समाजविघातक शक्ती याचा गैरफायदा घेऊन जात-पंथ किंवा धर्मावरून दोन समुदायामध्ये कधी तंटा-बखेडा होईल, याची वाटच पाहत असतात.

सध्या अनेक धार्मिक नेते प्रक्षोभक भाषणे देताना दिसतात. अनेक राजकीय पक्षांचे नेतेदेखील धार्मिक विषयांचा राजकारणासाठी सर्रास वापर करीत आहेत. राजकीय नेते धार्मिक प्रमुखांसारखे कधी बोलू लागले, धर्म आणि राजकारणाचे सरळसोटपणे मिश्रण ते कसे करू शकतात, असा प्रश्न पडावा, असे वातावरण बनले आहे. याला विविध धर्मांचे प्रमुखदेखील जबाबदार आहेत. राजकारण्यांच्या वळचणीला जाऊन शासकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न केला जातो आणि राजकारण्यांना धर्मांच्या व्यासपीठाचा वापर करू दिला जातो. यात दोन्ही बाजूच्या प्रमुखांना भूषण वाटते. वास्तविक, धर्म आणि राजकारण याची गल्लत करता कामा नये, धार्मिक बाबींमध्ये राजकारण्यांनी लुडबुड करता कामा नये. यासाठी या तेरा राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही दक्षता घेण्याची गरज आहे.

या सर्व चिंतनीय परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत, असा सवालही या निवेदनात उपस्थित केला आहे. अशा संवेदनशील विषयात राजकीय भाषा वापरली जाऊ नये; मात्र त्याचवेळी देशाचे प्रमुख म्हणून जनतेला सलोखा राखण्याचे आवाहनही केले पाहिजे. गुप्तचर संस्थांकडून आलेल्या अहवालांचे अवलोकन करून विरोधी पक्ष म्हणतात त्यात तथ्य आहे का, याची शहानिशा केली पाहिजे. प्रसंगी सर्वच राजकीय पक्षांची संयुक्त बैठक घेऊन शांततेच्या वातावरणासाठी आवाहन केले पाहिजे. देशात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय अशांतता असेल तर काय होते आहे हे पाकिस्तान आणि श्रीलंकेतील परिस्थितीवरून लक्षात येते. आता कोठे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव संपुष्टात आला आहे, अशा परिस्थितीत सामाजिक सलोखा महत्त्वाचा आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारSonia Gandhiसोनिया गांधी