शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

२० रुपये किलोच्या ८०० ग्रॅम बटाट्यांचे किती पैसे झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 07:56 IST

अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी रस्त्यावर काहीबाही विकणारी मुले आणि त्याच वयाच्या शाळकरी मुलांच्या गणिती क्षमता तपासल्या, तेव्हा काय दिसले? 

नीलेश नीमकर, संस्थापक, संचालक, ‘क्वेस्ट’ 

नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी व त्यांच्या सहकाऱ्यांचा मुलांच्या अंकगणितातील कौशल्यांविषयीचा एक अभ्यास ‘नेचर’ या नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासामुळे शाळेतील गणित-शिक्षणाची पद्धत हा बराचसा दुर्लक्षित असलेला मुद्दा चर्चेत आला आहे. या संशोधकांनी असे दाखवून दिले आहे की, जी मुले व्यवहारात बऱ्यापैकी गुंतागुंतीचे अंकगणित करू शकतात, ती मुले शाळेच्या अभ्यासक्रमातील तुलनेने कमी गुंतागुंत असणारे अंकगणितही करू शकत नाहीत. याउलट जी मुले फक्त शाळेत गणित शिकतात त्यांना अभ्यासक्रमातले गणित बऱ्यापैकी जमले तरी त्यांना ते व्यावहारिक परिस्थितीत वापरता येतेच असे नाही.

या विस्तृत अभ्यासातील सर्व बारकाव्यांची चर्चा जागेअभावी करणे शक्य नसले तरी काही ठळक निरीक्षणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. हा अभ्यास करताना संशोधकांनी कोलकाता व दिल्ली येथील बाजारात खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या मुलांसोबत, ती प्रत्यक्ष दुकानात उभी असताना, बऱ्यापैकी गुंतागुंत असलेली आकडेमोड करायला लागेल असे व्यवहार केले.  संशोधक ग्राहक बनून मुलांच्या दुकानात गेले आणि त्यांनी २० रुपये किलो भावाचे ८०० ग्रॅम बटाटे मागितले. जोडीला १५ रुपये किलो भावाचे १ किलो ४०० ग्रॅम कांदे त्यांनी विकत घेतले व ‘एकूण किती पैसे द्यायचे?’ हे मुलांना विचारले. त्यानंतर दोनशे रुपयांची नोट देऊन मुलांकडून उरलेली रक्कम परत मागितली. अशा प्रकारच्या गणितातील  एकूण रक्कम किती झाली, हे सांगण्याची आकडेमोड दिल्लीतील साधारण ९५% (विक्रेत्या) मुलांनी यशस्वीरीत्या केली. मात्र, बाजारात उभे राहून यशस्वीरीत्या व्यवहार करणाऱ्या या मुलांना भागाकाराच्या मांडणीत लिहिलेली तीनअंकी संख्या भागिले एक अंकी संख्या असे गणित सोडवायला दिले तर ते १५ टक्केच मुलांना येते, असे दिसले.

यानंतर संशोधकांनी जी मुले  बाजारातील व्यवहार करत नाहीत; पण शाळेत गणित शिकतात अशा मुलांसोबत असेच प्रयोग करून पाहिले. त्यात असे दिसले की या गटातील ५६ टक्के मुलांनी भागाकाराच्या मांडणीतील गणित योग्यप्रकारे सोडवले; पण खेळातल्या बाजारात उभे राहून व्यवहार करताना लागणारी आकडमोड मात्र साधारण ६३ टक्केच मुलांना जमली.

बाजारात उभे राहून गुंतागुंतीची आकडेमोड करणाऱ्या मुलांचा गणिताचा विचार हा ते करत असलेल्या व्यवहारांशी घट्टपणे जोडलेला आहे. त्यासंदर्भात गुंतागुंतीची आकडेमोड जरी समोर आली तरी ती करण्याइतके गणित या मुलांनी त्यांच्या जीवनानुभवातून अवगत केले आहे; मात्र व्यावहारिक संदर्भ आसपास नसेल तर अमूर्त अंकगणिती विचार करणे त्यांना अवघड जाते आहे. असा विचार करता येण्यासाठी गणितातील संबोध, रीती, संख्या व चिन्हांचे संकेत यावर उत्तम पकड असणे गरजेचे आहे. अर्थातच ही पकड येण्यासाठी मुलांचा सांस्कृतिक संदर्भ, त्यांनी जीवनानुभवातून कमावलेले गणिताचे ज्ञान यांचा आधार घेत गणित शिक्षण सुरू करायला हवे आणि हळूहळू संदर्भमुक्त विचार करायला शिकवायला हवे.

फक्त शाळेत गणित शिकणाऱ्या गटातील मुलांना काही प्रमाणात संख्या व चिन्हांची गणिती भाषा कळत असली तरी त्यांचे या प्रणालीचे ज्ञान फारच प्राथमिक असल्याचे दिसते. ही मुले आकडेमोड करताना बहुतेकवेळा रेषा काढणे, टप्प्याने मोजणे अशा अगदी प्राथमिक रीतीच गुंतागुंतीच्या आकडेमोडीसाठी वापरत होती, असे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले आहे. दोन्ही गटांतील मुलांना बाजाराशी संबंधित व्यवहाराचे शाब्दिक उदाहरण तोंडी सांगितले असता, प्रत्यक्ष विक्री करणाऱ्या ३६ टक्के मुलांनी ते सोडवले; पण केवळ शाळेत शिकणाऱ्या १ टक्का मुलांनाच ते सोडवता आले. एकूणच परीक्षेतल्या गणितावर काही प्रमाणात प्रभुत्व मिळवणाऱ्या या मुलांना त्यांचे ज्ञान प्रत्यक्ष व्यवहारात वापरणे अवघड जाते आहे.

यातली बरीचशी निरीक्षणे  गणित शिक्षणात सखोल काम करणाऱ्यांच्या अनुभवाशी जुळणारी आहेत. वर्गात गणित कसे शिकवले तर या अडचणींवर मात करता येईल, याबाबत बरेच संशोधन उपलब्धही आहे; मात्र ते तळागाळात काम करणाऱ्या शिक्षकांपर्यंत पोहोचवायला हवे, ही गरज अजून समाजात प्रस्थापित झालेली नाही. आता प्रथितयश व्यक्तींनी या विषयाची अभ्यासपूर्ण दखल घेतल्याने या दिशेने काही विचारमंथन सुरू होईल, अशी आशा आहे.    nilesh.nimkar@quest.org.in

टॅग्स :Economyअर्थव्यवस्था