शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
2
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
3
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
4
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
5
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
6
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
7
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
8
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
9
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
10
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
11
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
13
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
14
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
15
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
16
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
17
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
18
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
19
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
20
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट

आर्थिक घबराट

By admin | Updated: December 28, 2016 02:48 IST

पंतप्रधान सूचकतेने एक जाहीर विधान करतात, माध्यमे त्यातून योग्य तोच अर्थ काढतात, त्यावर पंतप्रधान तसे बोललेच नाहीत किंवा त्यांनी तसे सूचितही केले नाही असा खुलासा

पंतप्रधान सूचकतेने एक जाहीर विधान करतात, माध्यमे त्यातून योग्य तोच अर्थ काढतात, त्यावर पंतप्रधान तसे बोललेच नाहीत किंवा त्यांनी तसे सूचितही केले नाही असा खुलासा घाईघाईने अर्थमंत्री करतात पण पंतप्रधानांच्या विधानापायी निर्माण झालेल्या घबराटीवर काहीही परिणाम होत नाही आणि भांडवली बाजार कोसळायचा तो कोसळतोच. हा अजब अनुभव देशवासीयांना किंवा देशातील गुंतवणूकदारांना आला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी ायंनी केलेले विधान आणि त्यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेला खुलासा यामुळे. भांडवली बाजारात जे लोक पैसे कमावतात त्यांच्याकडून सरकारला करापोटी खूपच कमी उत्पन्न मिळते तेव्हां हे उत्पन्न वाढावे यासाठी सरकारने त्वरित, कार्यक्षम आणि पारदर्शी कृती केली पाहिजे, असे विधान पंतप्रधानांनी त्यांच्या मुंबई दौऱ्यात बोलताना केले होते. भांडवली बाजारात दीर्घ मुदतीसाठी म्हणजे बारा महिन्यांहून अधिक काळासाठी जी गुंतवणूक केली जाते, ती या निर्धारित मुदतीनंतर पूर्णपणे वा अंशत: काढून घेतली तर गुंतवणूकदाराच्या हातात पडणाऱ्या रकमेवर कोणताही कर लावला जात नाही. पण अल्प मुदतीची म्हणजे बारा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक केली गेली असेल वा करताना दीर्घ मुदतीसाठी केली पण मध्येच काढून घेतली तर परत मिळण्यावर रकमेवर पंधरा टक्के दराने कर भरावा लागतो. साहजिकच जेव्हां पंतप्रधानांनी बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांकडून सरकारला कररुपे खूपच कमी उत्पन्न मिळते असे विधान केले तेव्हां त्याचा अर्थ एक तर अल्प मुदतीच्या गुंतवणुकीवरील उत्पन्नास लागू असलेला पंधरा टक्के करदर वाढविणे किंवा दीर्घ मुदतीची गुंतवणूकदेखील कराच्या जाळ्यात आणणे. यातील पहिली शक्यता मोडीत निघते कारण पंधरा टक्के हा करदर अजिबात कमी नाही. सबब त्यात वाढ करायला वाव नाही. परिणामी शिल्लक राहते ती दीर्घ मुदतीची गुंतवणूक. ती करमाफ आहे हाच तर मुळात तिच्या मुख्य आकर्षणाचा भाग आहे. त्यावरच आघात होणार म्हटल्यावर घबराट होणारच. त्यामुळे जेटलींनी घाईघाईने केलेला खुलासा बाजाराचे कोसळणे थांबवू शकला नाही. अर्थात हे कोसळणे सावरलेदेखील जाईल, पण यातून एकच शंका पुन्हा जाणवते व ती म्हणजे विद्यमान पंतप्रधान कोणतीही महत्वाची घोषणा करण्यापूर्वी कोणाशीही विचारविनिमय करीत नसावेत की काय?