शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक घबराट

By admin | Updated: December 28, 2016 02:48 IST

पंतप्रधान सूचकतेने एक जाहीर विधान करतात, माध्यमे त्यातून योग्य तोच अर्थ काढतात, त्यावर पंतप्रधान तसे बोललेच नाहीत किंवा त्यांनी तसे सूचितही केले नाही असा खुलासा

पंतप्रधान सूचकतेने एक जाहीर विधान करतात, माध्यमे त्यातून योग्य तोच अर्थ काढतात, त्यावर पंतप्रधान तसे बोललेच नाहीत किंवा त्यांनी तसे सूचितही केले नाही असा खुलासा घाईघाईने अर्थमंत्री करतात पण पंतप्रधानांच्या विधानापायी निर्माण झालेल्या घबराटीवर काहीही परिणाम होत नाही आणि भांडवली बाजार कोसळायचा तो कोसळतोच. हा अजब अनुभव देशवासीयांना किंवा देशातील गुंतवणूकदारांना आला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी ायंनी केलेले विधान आणि त्यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेला खुलासा यामुळे. भांडवली बाजारात जे लोक पैसे कमावतात त्यांच्याकडून सरकारला करापोटी खूपच कमी उत्पन्न मिळते तेव्हां हे उत्पन्न वाढावे यासाठी सरकारने त्वरित, कार्यक्षम आणि पारदर्शी कृती केली पाहिजे, असे विधान पंतप्रधानांनी त्यांच्या मुंबई दौऱ्यात बोलताना केले होते. भांडवली बाजारात दीर्घ मुदतीसाठी म्हणजे बारा महिन्यांहून अधिक काळासाठी जी गुंतवणूक केली जाते, ती या निर्धारित मुदतीनंतर पूर्णपणे वा अंशत: काढून घेतली तर गुंतवणूकदाराच्या हातात पडणाऱ्या रकमेवर कोणताही कर लावला जात नाही. पण अल्प मुदतीची म्हणजे बारा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक केली गेली असेल वा करताना दीर्घ मुदतीसाठी केली पण मध्येच काढून घेतली तर परत मिळण्यावर रकमेवर पंधरा टक्के दराने कर भरावा लागतो. साहजिकच जेव्हां पंतप्रधानांनी बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांकडून सरकारला कररुपे खूपच कमी उत्पन्न मिळते असे विधान केले तेव्हां त्याचा अर्थ एक तर अल्प मुदतीच्या गुंतवणुकीवरील उत्पन्नास लागू असलेला पंधरा टक्के करदर वाढविणे किंवा दीर्घ मुदतीची गुंतवणूकदेखील कराच्या जाळ्यात आणणे. यातील पहिली शक्यता मोडीत निघते कारण पंधरा टक्के हा करदर अजिबात कमी नाही. सबब त्यात वाढ करायला वाव नाही. परिणामी शिल्लक राहते ती दीर्घ मुदतीची गुंतवणूक. ती करमाफ आहे हाच तर मुळात तिच्या मुख्य आकर्षणाचा भाग आहे. त्यावरच आघात होणार म्हटल्यावर घबराट होणारच. त्यामुळे जेटलींनी घाईघाईने केलेला खुलासा बाजाराचे कोसळणे थांबवू शकला नाही. अर्थात हे कोसळणे सावरलेदेखील जाईल, पण यातून एकच शंका पुन्हा जाणवते व ती म्हणजे विद्यमान पंतप्रधान कोणतीही महत्वाची घोषणा करण्यापूर्वी कोणाशीही विचारविनिमय करीत नसावेत की काय?