शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाण्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:23 IST

विदर्भातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे; पण गत काही वर्षांपासून पाऊस साथ देत नसल्याने ही अर्थव्यस्था ढासळली आहे.

विदर्भातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे; पण गत काही वर्षांपासून पाऊस साथ देत नसल्याने ही अर्थव्यस्था ढासळली आहे. तरीदेखील शेती कसण्याशिवाय दुसरा पर्यायच नसल्याने, शेतकरी दरवर्षी नव्या उमेदीने शेतात राबतो. कमी खर्चात भरपूर उत्पादन मिळावे यासाठी शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान, बियाण्यांच्या शोधात असतो. दुसरीकडे त्याच्या गरजेत स्वत:चा फायदा शोधणारे टपलेलेच असतात. त्याचाच प्रत्यय मागील काही वर्षांपासून येत आहे. भरघोस उत्पादनाची प्रलोभने देऊन, कापूस व सोयाबीनची बोगस, अप्रमाणित बियाणे विदर्भातील शेतकऱ्यांच्या माथी मारली जात असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. विदर्भ ही अप्रमाणित बोगस बियाणे व निविष्ठा विक्रीची मोठी बाजारपेठच झाली आहे. यावर्षी तर खरीप हंगाम सुरू होण्याआधीच, ‘एचटी’ तणनाशक तंत्रज्ञानयुक्त बोगस बीटी कापसाचे बियाणे बाजारात दाखल झाले आहे. तेलंगणा राज्याच्या सीमेवर हे बियाणे पकडण्यात आले. खरीप हंगामास अद्याप दीड ते दोन महिने अवकाश आहे. बाजारपेठेत १५ मेनंतरच अल्प प्रमाणात बियाण्यांची मागणी सुरू होते. गत पाच-सहा वर्षांपासून पेरणीसाठी पूरक पाऊस झाल्याशिवाय शेतकरी बियाणे खरेदी करीतच नाही. यावर्षी मात्र शेतकºयांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचे आमिष दाखवून बोगस बियाणे त्यांच्या माथी मारले जात आहे. तणनाशक तंत्रज्ञानयुक्त बीटी बियाणे अस्तित्वातच नाही; पण मागील पाच वर्षांपासून या बीटीची विक्री सुरू आहे. बीटी कापसासोबतच सोयाबीनच्याही बोगस व अप्रमाणित बियाण्याची दरवर्षी विक्री करण्यात येत आहे. गतवर्षी पश्चिम विदर्भात अप्रमाणित खते, कीटकनाशकांचे साठे सापडले. अकोल्यात तब्बल २६ लाख रुपये किमतीच्या अप्रमाणित कीटकनाशकांची जप्ती करण्यात आली. अकोट, मूर्तिजापूर येथेही बोगस बियाणे, खतांचे साठे आढळून आले. कृषी विभागातर्फे दरवर्षी भरारी पथके नियुक्त केली जातात. विभागीय पथकाचे त्यावर नियंत्रण असते; पण त्या यंत्रणेला हुलकावणी देऊन, बोगस कृषी निविष्ठा पोहोचतातच कशा, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. बोगस कृषी निविष्ठांची विक्री करणाºयांवर कधीच ठोस कारवाई होत नाही. अस्मानी व सुल्तानी संकटांचा सामना करताना आधीच गलितगात्र झालेला गरीब बिचारा शेतकरी अशा ठगांमुळे आणखीच गाळात जातो. शेतकरीवर्गास ‘अच्छे दिन’ केव्हा दिसतील कोण जाणे; पण किमान त्यांच्या पाठीमागचे बोगस बियाण्यांचे ग्रहण तरी सुटायला हवे!