शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

बोगस बियाण्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:23 IST

विदर्भातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे; पण गत काही वर्षांपासून पाऊस साथ देत नसल्याने ही अर्थव्यस्था ढासळली आहे.

विदर्भातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे; पण गत काही वर्षांपासून पाऊस साथ देत नसल्याने ही अर्थव्यस्था ढासळली आहे. तरीदेखील शेती कसण्याशिवाय दुसरा पर्यायच नसल्याने, शेतकरी दरवर्षी नव्या उमेदीने शेतात राबतो. कमी खर्चात भरपूर उत्पादन मिळावे यासाठी शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान, बियाण्यांच्या शोधात असतो. दुसरीकडे त्याच्या गरजेत स्वत:चा फायदा शोधणारे टपलेलेच असतात. त्याचाच प्रत्यय मागील काही वर्षांपासून येत आहे. भरघोस उत्पादनाची प्रलोभने देऊन, कापूस व सोयाबीनची बोगस, अप्रमाणित बियाणे विदर्भातील शेतकऱ्यांच्या माथी मारली जात असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. विदर्भ ही अप्रमाणित बोगस बियाणे व निविष्ठा विक्रीची मोठी बाजारपेठच झाली आहे. यावर्षी तर खरीप हंगाम सुरू होण्याआधीच, ‘एचटी’ तणनाशक तंत्रज्ञानयुक्त बोगस बीटी कापसाचे बियाणे बाजारात दाखल झाले आहे. तेलंगणा राज्याच्या सीमेवर हे बियाणे पकडण्यात आले. खरीप हंगामास अद्याप दीड ते दोन महिने अवकाश आहे. बाजारपेठेत १५ मेनंतरच अल्प प्रमाणात बियाण्यांची मागणी सुरू होते. गत पाच-सहा वर्षांपासून पेरणीसाठी पूरक पाऊस झाल्याशिवाय शेतकरी बियाणे खरेदी करीतच नाही. यावर्षी मात्र शेतकºयांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचे आमिष दाखवून बोगस बियाणे त्यांच्या माथी मारले जात आहे. तणनाशक तंत्रज्ञानयुक्त बीटी बियाणे अस्तित्वातच नाही; पण मागील पाच वर्षांपासून या बीटीची विक्री सुरू आहे. बीटी कापसासोबतच सोयाबीनच्याही बोगस व अप्रमाणित बियाण्याची दरवर्षी विक्री करण्यात येत आहे. गतवर्षी पश्चिम विदर्भात अप्रमाणित खते, कीटकनाशकांचे साठे सापडले. अकोल्यात तब्बल २६ लाख रुपये किमतीच्या अप्रमाणित कीटकनाशकांची जप्ती करण्यात आली. अकोट, मूर्तिजापूर येथेही बोगस बियाणे, खतांचे साठे आढळून आले. कृषी विभागातर्फे दरवर्षी भरारी पथके नियुक्त केली जातात. विभागीय पथकाचे त्यावर नियंत्रण असते; पण त्या यंत्रणेला हुलकावणी देऊन, बोगस कृषी निविष्ठा पोहोचतातच कशा, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. बोगस कृषी निविष्ठांची विक्री करणाºयांवर कधीच ठोस कारवाई होत नाही. अस्मानी व सुल्तानी संकटांचा सामना करताना आधीच गलितगात्र झालेला गरीब बिचारा शेतकरी अशा ठगांमुळे आणखीच गाळात जातो. शेतकरीवर्गास ‘अच्छे दिन’ केव्हा दिसतील कोण जाणे; पण किमान त्यांच्या पाठीमागचे बोगस बियाण्यांचे ग्रहण तरी सुटायला हवे!