शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
3
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
4
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
5
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
6
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
7
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
8
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
9
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
10
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
11
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
12
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
13
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
14
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
15
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
16
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
17
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
18
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
19
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
20
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

बोगस बियाण्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:23 IST

विदर्भातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे; पण गत काही वर्षांपासून पाऊस साथ देत नसल्याने ही अर्थव्यस्था ढासळली आहे.

विदर्भातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे; पण गत काही वर्षांपासून पाऊस साथ देत नसल्याने ही अर्थव्यस्था ढासळली आहे. तरीदेखील शेती कसण्याशिवाय दुसरा पर्यायच नसल्याने, शेतकरी दरवर्षी नव्या उमेदीने शेतात राबतो. कमी खर्चात भरपूर उत्पादन मिळावे यासाठी शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान, बियाण्यांच्या शोधात असतो. दुसरीकडे त्याच्या गरजेत स्वत:चा फायदा शोधणारे टपलेलेच असतात. त्याचाच प्रत्यय मागील काही वर्षांपासून येत आहे. भरघोस उत्पादनाची प्रलोभने देऊन, कापूस व सोयाबीनची बोगस, अप्रमाणित बियाणे विदर्भातील शेतकऱ्यांच्या माथी मारली जात असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. विदर्भ ही अप्रमाणित बोगस बियाणे व निविष्ठा विक्रीची मोठी बाजारपेठच झाली आहे. यावर्षी तर खरीप हंगाम सुरू होण्याआधीच, ‘एचटी’ तणनाशक तंत्रज्ञानयुक्त बोगस बीटी कापसाचे बियाणे बाजारात दाखल झाले आहे. तेलंगणा राज्याच्या सीमेवर हे बियाणे पकडण्यात आले. खरीप हंगामास अद्याप दीड ते दोन महिने अवकाश आहे. बाजारपेठेत १५ मेनंतरच अल्प प्रमाणात बियाण्यांची मागणी सुरू होते. गत पाच-सहा वर्षांपासून पेरणीसाठी पूरक पाऊस झाल्याशिवाय शेतकरी बियाणे खरेदी करीतच नाही. यावर्षी मात्र शेतकºयांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचे आमिष दाखवून बोगस बियाणे त्यांच्या माथी मारले जात आहे. तणनाशक तंत्रज्ञानयुक्त बीटी बियाणे अस्तित्वातच नाही; पण मागील पाच वर्षांपासून या बीटीची विक्री सुरू आहे. बीटी कापसासोबतच सोयाबीनच्याही बोगस व अप्रमाणित बियाण्याची दरवर्षी विक्री करण्यात येत आहे. गतवर्षी पश्चिम विदर्भात अप्रमाणित खते, कीटकनाशकांचे साठे सापडले. अकोल्यात तब्बल २६ लाख रुपये किमतीच्या अप्रमाणित कीटकनाशकांची जप्ती करण्यात आली. अकोट, मूर्तिजापूर येथेही बोगस बियाणे, खतांचे साठे आढळून आले. कृषी विभागातर्फे दरवर्षी भरारी पथके नियुक्त केली जातात. विभागीय पथकाचे त्यावर नियंत्रण असते; पण त्या यंत्रणेला हुलकावणी देऊन, बोगस कृषी निविष्ठा पोहोचतातच कशा, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. बोगस कृषी निविष्ठांची विक्री करणाºयांवर कधीच ठोस कारवाई होत नाही. अस्मानी व सुल्तानी संकटांचा सामना करताना आधीच गलितगात्र झालेला गरीब बिचारा शेतकरी अशा ठगांमुळे आणखीच गाळात जातो. शेतकरीवर्गास ‘अच्छे दिन’ केव्हा दिसतील कोण जाणे; पण किमान त्यांच्या पाठीमागचे बोगस बियाण्यांचे ग्रहण तरी सुटायला हवे!