शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली
2
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
3
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
4
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
5
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
6
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
7
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
8
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
9
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
10
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
11
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
12
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
13
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
14
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
15
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
16
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
17
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
18
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
19
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
20
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाण्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:23 IST

विदर्भातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे; पण गत काही वर्षांपासून पाऊस साथ देत नसल्याने ही अर्थव्यस्था ढासळली आहे.

विदर्भातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे; पण गत काही वर्षांपासून पाऊस साथ देत नसल्याने ही अर्थव्यस्था ढासळली आहे. तरीदेखील शेती कसण्याशिवाय दुसरा पर्यायच नसल्याने, शेतकरी दरवर्षी नव्या उमेदीने शेतात राबतो. कमी खर्चात भरपूर उत्पादन मिळावे यासाठी शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान, बियाण्यांच्या शोधात असतो. दुसरीकडे त्याच्या गरजेत स्वत:चा फायदा शोधणारे टपलेलेच असतात. त्याचाच प्रत्यय मागील काही वर्षांपासून येत आहे. भरघोस उत्पादनाची प्रलोभने देऊन, कापूस व सोयाबीनची बोगस, अप्रमाणित बियाणे विदर्भातील शेतकऱ्यांच्या माथी मारली जात असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. विदर्भ ही अप्रमाणित बोगस बियाणे व निविष्ठा विक्रीची मोठी बाजारपेठच झाली आहे. यावर्षी तर खरीप हंगाम सुरू होण्याआधीच, ‘एचटी’ तणनाशक तंत्रज्ञानयुक्त बोगस बीटी कापसाचे बियाणे बाजारात दाखल झाले आहे. तेलंगणा राज्याच्या सीमेवर हे बियाणे पकडण्यात आले. खरीप हंगामास अद्याप दीड ते दोन महिने अवकाश आहे. बाजारपेठेत १५ मेनंतरच अल्प प्रमाणात बियाण्यांची मागणी सुरू होते. गत पाच-सहा वर्षांपासून पेरणीसाठी पूरक पाऊस झाल्याशिवाय शेतकरी बियाणे खरेदी करीतच नाही. यावर्षी मात्र शेतकºयांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचे आमिष दाखवून बोगस बियाणे त्यांच्या माथी मारले जात आहे. तणनाशक तंत्रज्ञानयुक्त बीटी बियाणे अस्तित्वातच नाही; पण मागील पाच वर्षांपासून या बीटीची विक्री सुरू आहे. बीटी कापसासोबतच सोयाबीनच्याही बोगस व अप्रमाणित बियाण्याची दरवर्षी विक्री करण्यात येत आहे. गतवर्षी पश्चिम विदर्भात अप्रमाणित खते, कीटकनाशकांचे साठे सापडले. अकोल्यात तब्बल २६ लाख रुपये किमतीच्या अप्रमाणित कीटकनाशकांची जप्ती करण्यात आली. अकोट, मूर्तिजापूर येथेही बोगस बियाणे, खतांचे साठे आढळून आले. कृषी विभागातर्फे दरवर्षी भरारी पथके नियुक्त केली जातात. विभागीय पथकाचे त्यावर नियंत्रण असते; पण त्या यंत्रणेला हुलकावणी देऊन, बोगस कृषी निविष्ठा पोहोचतातच कशा, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. बोगस कृषी निविष्ठांची विक्री करणाºयांवर कधीच ठोस कारवाई होत नाही. अस्मानी व सुल्तानी संकटांचा सामना करताना आधीच गलितगात्र झालेला गरीब बिचारा शेतकरी अशा ठगांमुळे आणखीच गाळात जातो. शेतकरीवर्गास ‘अच्छे दिन’ केव्हा दिसतील कोण जाणे; पण किमान त्यांच्या पाठीमागचे बोगस बियाण्यांचे ग्रहण तरी सुटायला हवे!