शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

साखरेचे खाणार, त्याला आयकर नसणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 11:31 IST

सहकारी साखर कारखानदारी शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. नफ्याचे काय करायचे हे ठरविण्यासाठी विविध मार्ग तयार ठेवले तर साखरेचे खाणाऱ्यांना चाप लागेल.

- वसंत भोसले

केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने सहकारी साखर उद्योगाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. ऊस खरेदी करून शेतकऱ्यांना देण्यात येणारा पैसा हा उत्पादनाचा खर्च, असे गृहित धरून सहकारी साखर कारखान्यांचा हिशेब मांडला जात होता. शेतकऱ्यांच्या उसाला किती पैसे द्यावेत, याचे कृषी मूल्य आयोगाने घातलेले सूत्र म्हणजे  एफआरपी (रास्त आणि वाजवी किंमत). त्यापेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिल्यास तो ऊस या कच्च्या मालाचा खर्च म्हणून गृहित न धरता साखर कारखान्याचा नफा असे मानून त्यावर आयकर लावला जात होता.  हा निर्णय झाल्यापासून (१९८५) महाराष्ट्रातील ११६ साखर कारखान्यांना सुमारे नऊ हजार कोटी रुपये भरण्याच्या नोटिसा निघाल्या आहेत.

महाराष्ट्र साखर संघ आणि विविध शेतकरी संघटना या आदेशाविरुद्ध १९८५ पासून संघर्ष करीत आहेत. अनेक पक्षांची सरकारे आली अन् गेली. मात्र यावर निर्णय होत नव्हता. काही साखर कारखाने एमएसपी किंवा एफआरपीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे टाळत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू सहकारी साखर कारखान्याने आयकर भरून नफा दाखविला आणि ते पैसे भांडवल म्हणून जमा केले. सांगली जिल्ह्यातील हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम देण्याचा निर्धार कायम केला.

ताज्या निर्णयाने साखर कारखानदारीला मोठा दिलासा मिळाला आहे. कायद्याने शेतकऱ्यांना रास्त आणि वाजवी किंमत (भाव) देऊन उर्वरित पैसा नफ्यातून भांडवल निर्मितीत वर्ग करता येऊ शकतो. त्यावर आयकर बसणार की, नाही, हे मात्र स्पष्ट होत नाही. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना ही रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागेल. तो नफा असला तरी, खर्चातील रक्कम गृहित करून आयकर लागू होणार नाही. वास्तविक एफआरपी देणे कायद्याने  बंधनकारक आहे. ती दिल्यानंतर जी अतिरिक्त रक्कम राहते, त्या नफ्यावरही आयकर असता कामा नये. ती रक्कम शेतकऱ्यांच्या आणि पर्यायाने साखर कारखान्यांच्या मजबुतीसाठी खर्च करता येऊ शकते.

सहकारी साखर कारखान्यांचे स्वभांडवल खूपच कमी असते. परिणामी खर्चापासून शेतकऱ्यांच्या उसाला पैसा देण्यापर्यंत रक्कम उभारताना भक्कम व्याजाचे कर्ज काढावे लागते. शाहू सहकारी साखर कारखान्याने नफ्यावर आयकर भरून सुमारे सत्तर कोटी रुपये बाजूला काढून ठेवले होते. नवा प्रकल्प उभारताना कर्ज काढण्याऐवजी ही रक्कम वापरता आली. त्यामुळे कर्ज आणि  व्याजाचा भुर्दंड टाळता आला.

१९८५ पासून एमएसपीपेक्षा अधिक भाव शेतकऱ्यांना देण्याची प्रथा सांगली जिल्ह्यातील क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखालील हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने सुरू केली. तेव्हापासून सहकारी साखर कारखान्यांचे ताळेबंद तपासताना कायद्याने जो भाव द्यावा लागतो, त्यापेक्षा अधिक रक्कम दिली; म्हणजे उत्पादन खर्चात कच्च्या मालावर अधिक खर्च केला. तो पैसा शिल्लक होता म्हणून खर्च केला म्हणजे नफा होता. तो नफा असेल, तर त्यावर आयकर लागू करता येणार, असा शोधअर्थ खात्याने काढला होता. त्याविरोधात पहिला बंडाचा निर्णय नागनाथअण्णा नायकवडी यांनी ३७ वर्षांपूर्वी घेतला होता. 

आता या निर्णयाने साखर कारखानदारीवर राजकारण करणाऱ्यांना हा पैसा हवा तसा वापरता येणार नाही. तो शेतकऱ्यांना द्यावा लागेल, पण, आयकरच नाही, हे गृहित धरून विविध प्रकारचे खर्च वाढून दाखवून आपला हिस्सा बाजूला काढण्याची प्रवृत्ती वाढीस लागू शकते. एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले की, त्यांची मागणी संपते. उर्वरित पैशाचा विनियोग कसाही करायला सहकारी साखर कारखाने मोकळे होतील. यातून कारखानदारीचे भले व्हायचे असेल, तर, एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देण्याची तरतूद असू द्यावी किंवा ही रक्कम शेतकऱ्यांकडून मिळालेले भांडवल म्हणून वापरता येईल. त्यासाठी बाजूला काढून ठेवण्याची, त्यावर आयकर न लावण्याची तरतूद करावी लागणार आहे. तेव्हाच या निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना होईल. सहकारी साखर कारखानदारी शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. त्यांना त्यांच्या नफ्याचे काय करायचे हे ठरविण्यासाठी विविध मार्ग तयार ठेवले, तर साखरेचे खाणाऱ्यांना चाप लागेल. अन्यथा साखरेचे खाऊनही आयकरातही सूट, हे बरोबर होणार नाही.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने