शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

निव्वळ आरोपांचा धुराळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 09:00 IST

मिलिंद कुलकर्णी  राजकारणात आरोप - प्रत्यारोप होत असतात. मात्र आरोप कोण करते आणि कोणावर करते, यालादेखील महत्त्व आहे. विरोधकांनी ...

मिलिंद कुलकर्णी 

राजकारणात आरोप - प्रत्यारोप होत असतात. मात्र आरोप कोण करते आणि कोणावर करते, यालादेखील महत्त्व आहे. विरोधकांनी आरोप केले तर ते त्यांच्या भूमिकेनुसार ते आरोप करणारच असे म्हटले जाते, पण सत्ताधारी मंडळींनी आरोप केले तर त्यांनी पुरावे द्यायला हवे, तरच त्यांच्या आरोपात तथ्य आहे, असे जनतेला वाटेल. अन्यथा आरोपांचा निव्वळ धुराळा उडवल्यापलिकडे काहीही साधले जात नाही. 

देशातील राजकीय स्थिती विचित्र  आहे. केद्र सरकार भाजपचे आहे, महाराष्टÑात शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस या तीन राजकीय पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्था या भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सत्तासंतुलन साधले गेले तरी प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेत्याकडे सत्ताधारी आणि विरोधक अशी भूमिका येते. ही भूमिका वठवत असताना निव्वळ हवेत वार करण्यापेक्षा पुराव्यासह आरोप केले तर त्याला वजन प्राप्त होते आणि प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पडते. जळगाव जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे या बहुदा एकमेव सदस्या आहेत, ज्या सत्ताधारी भाजपच्या सदस्या असूनही पुराव्यासह गैरव्यवहार उघडकीस आणतात. मग तो स्वस्त धान्य दुकानातील मापाचे पाप असो की, तलावातील गाळ, गौण खनीज उचलण्यात झालेला गैरव्यवहार असो, त्यांनी पुराव्यासह आरोप केले. प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि कारवाई करण्यास भाग पाडले. बाकी मंडळी आरोप खूप करतात, पण त्याच्या पुराव्यांचा पत्ता नसतो. राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे हे आरोपांचा धुराळा उडविण्यात माहीर आहेत. त्यांनी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील गांजाशेतीविषयी पत्रकार परिषद घेऊन महसूल, वन, कृषी आणि पोलीस विभागावर गंभीर आरोप केले आहेत. कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी पीक पाहणी करायला शेतात जातात, तेव्हा त्यांना गांजाची शेती लक्षात येत नाही काय? पेरा वेगळा का दाखविला जातो, ही कोणाची शेती आहे आणि त्यांची नावे का लपवली जातात, हा त्यांचा मुद्दा रास्त आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीदेखील योग्य आहे. मात्र त्यांनी जे इतर आरोप केले त्याविषयी खरेतर त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी करायला हवी. चौकशीसाठी पाठपुरावा करायला हवा. तसे न करता गोटे हे पत्रकार परिषद घेऊन नेमके काय साधू इच्छितात, हे कळायला मार्ग नाही. गोटे यांनी पोलीस दलातील बदलीचा मुद्दा उपस्थित करुन आरोप केला की, शिरपूर विभागात पोलीस निरीक्षक म्हणून बदली होण्यासाठी ५० लाख ते एक कोटीची बिदागी द्यावी लागते.  शिरपूर, सांगवी व थाळनेर येथील पोलीस ठाण्यात बदलीसाठी २५ ते ८० लाख रुपये मोजावे लागतात. तलाठी बदलीचा दर किमान दोन ते पाच लाखापर्यंत आहे. असे जर असेल तर गोटे हे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, माजी आमदार आहेत. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करावी, पुरावे असतील तर ते द्यावे, आणि कारवाईसाठी आपल्याच सरकारला भाग पाडावे. असाच आरोप जळगावातील राष्टÑवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज देऊन केला आहे. चार पोलीस कर्मचाºयांची नावे देऊन हे कर्मचारी एका माजी मंत्र्याच्या सेवेत आहेत, आणि त्यांच्याविषयी तक्रारी असल्याचे नमूद केले आहे. पुन्हा तेच, गृहमंत्री अनिल देशमुख हे वर्षभरात तीनवेळा जळगाव जिल्ह्यात येऊन गेले. दर आठवडयाला त्यांचा जनता दरबार मुंबईत होत असतो. राष्टÑवादीचे अनेक पदाधिकारी तेथे जाऊन निवेदने देतात. मग पाटील, यांनी हा मार्ग का चोखाळला नाही? असाच आरोप त्यांनी जळगाव महापालिकेतील भाजप नगरसेवकांवर वॉटरग्रेस या स्वच्छता कामाच्या ठेकेदार कंपनीकडून दरमहा बक्षीसी मिळत असल्याबद्दल केला होता. निव्वळ आरोप करण्यापेक्षा महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुराव्यासह तक्रार केली तर चौकशी लागू शकते. शिवसेनेचे जळगावातील नगरसेवक देखील भाजपच्या कारभाराविरोधात कधी आंदोलन करतात तर कधी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे जाऊन तक्रारी करतात. पण पुरावा हाती घेऊन एखादे प्रकरण धसास लावले, असे काही घडत नाही. यामुळे होते काय, जनतेला या आरोपांमध्ये तथ्य वाटत नाही. आरोप होतात, प्रसिध्दी मिळते आणि चार दिवसांनी सगळे शांत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते स्व.रामदास नायक यांनी प्रतिभा प्रतिष्ठानमधील गैरव्यवहार उघडकीस आणला आणि तत्कालीन मुख्यमंत्री अ.र.अंतुले यांना पायउतार होण्यास भाग पाडले होते. या प्रकरणाची आठवण याप्रसंगी होते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव