शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; दहशतवादी अजहरनं बहिणीवर सोपवली जबाबदारी
2
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
3
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
4
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
5
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
6
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
7
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
8
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?
9
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
10
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव
11
VIRAL VIDEO : महिलेच्या केसांत अडकला हेअर कर्लर अन् पुढे जे झालं ते बघून तुम्हीही व्हाल हैराण!
12
महिला वर्ल्डकपमध्ये आता सेमीफायनलच्या एका जागेसाठी ३ संघांमध्ये चुरस, भारतासाठी असं आहे समीकरण
13
"सांसें उधार हैं... दिल तो महाकाल का है"; भस्म आरतीआधी भक्ताला हार्ट अटॅक, स्टेटसची चर्चा
14
जो जीव तोडून मेहनत घेतोय त्याला BCCI नं येड्यात काढलं? मुंबईकरासाठी बड्या राजकीय नेत्याची बॅटिंग
15
सलग ८८ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ₹१ लाखाचे झाले ₹२,६०,०००; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?
16
७ राशींवर कायम लक्ष्मी-कुबेर कृपा, पैसे कमीच पडत नाही; शुभ तेच घडते, तुमची रास आहे का यात?
17
समोश्यावरून वाद सुरू झाला अन् तलवारीच बाहेर निघाल्या! शेतकऱ्याच्या मृत्यूने परिसर हादरला
18
चित्रांगदा सिंह रुग्णालयात दाखल, ऐन दिवाळीत अभिनेत्रीची तब्येत बिघडली; नक्की झालं तरी काय?
19
IND vs AUS : 'मी सचिनपेक्षाही अधिक धावा केल्या असत्या!' पण… ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा मोठा दावा
20
Happy Bhaubeej 2025 Wishes: भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या प्रेमळ नात्याच्या लडिवाळ शुभेच्छा!

निव्वळ आरोपांचा धुराळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 09:00 IST

मिलिंद कुलकर्णी  राजकारणात आरोप - प्रत्यारोप होत असतात. मात्र आरोप कोण करते आणि कोणावर करते, यालादेखील महत्त्व आहे. विरोधकांनी ...

मिलिंद कुलकर्णी 

राजकारणात आरोप - प्रत्यारोप होत असतात. मात्र आरोप कोण करते आणि कोणावर करते, यालादेखील महत्त्व आहे. विरोधकांनी आरोप केले तर ते त्यांच्या भूमिकेनुसार ते आरोप करणारच असे म्हटले जाते, पण सत्ताधारी मंडळींनी आरोप केले तर त्यांनी पुरावे द्यायला हवे, तरच त्यांच्या आरोपात तथ्य आहे, असे जनतेला वाटेल. अन्यथा आरोपांचा निव्वळ धुराळा उडवल्यापलिकडे काहीही साधले जात नाही. 

देशातील राजकीय स्थिती विचित्र  आहे. केद्र सरकार भाजपचे आहे, महाराष्टÑात शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस या तीन राजकीय पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्था या भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सत्तासंतुलन साधले गेले तरी प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेत्याकडे सत्ताधारी आणि विरोधक अशी भूमिका येते. ही भूमिका वठवत असताना निव्वळ हवेत वार करण्यापेक्षा पुराव्यासह आरोप केले तर त्याला वजन प्राप्त होते आणि प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पडते. जळगाव जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे या बहुदा एकमेव सदस्या आहेत, ज्या सत्ताधारी भाजपच्या सदस्या असूनही पुराव्यासह गैरव्यवहार उघडकीस आणतात. मग तो स्वस्त धान्य दुकानातील मापाचे पाप असो की, तलावातील गाळ, गौण खनीज उचलण्यात झालेला गैरव्यवहार असो, त्यांनी पुराव्यासह आरोप केले. प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि कारवाई करण्यास भाग पाडले. बाकी मंडळी आरोप खूप करतात, पण त्याच्या पुराव्यांचा पत्ता नसतो. राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे हे आरोपांचा धुराळा उडविण्यात माहीर आहेत. त्यांनी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील गांजाशेतीविषयी पत्रकार परिषद घेऊन महसूल, वन, कृषी आणि पोलीस विभागावर गंभीर आरोप केले आहेत. कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी पीक पाहणी करायला शेतात जातात, तेव्हा त्यांना गांजाची शेती लक्षात येत नाही काय? पेरा वेगळा का दाखविला जातो, ही कोणाची शेती आहे आणि त्यांची नावे का लपवली जातात, हा त्यांचा मुद्दा रास्त आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीदेखील योग्य आहे. मात्र त्यांनी जे इतर आरोप केले त्याविषयी खरेतर त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी करायला हवी. चौकशीसाठी पाठपुरावा करायला हवा. तसे न करता गोटे हे पत्रकार परिषद घेऊन नेमके काय साधू इच्छितात, हे कळायला मार्ग नाही. गोटे यांनी पोलीस दलातील बदलीचा मुद्दा उपस्थित करुन आरोप केला की, शिरपूर विभागात पोलीस निरीक्षक म्हणून बदली होण्यासाठी ५० लाख ते एक कोटीची बिदागी द्यावी लागते.  शिरपूर, सांगवी व थाळनेर येथील पोलीस ठाण्यात बदलीसाठी २५ ते ८० लाख रुपये मोजावे लागतात. तलाठी बदलीचा दर किमान दोन ते पाच लाखापर्यंत आहे. असे जर असेल तर गोटे हे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, माजी आमदार आहेत. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करावी, पुरावे असतील तर ते द्यावे, आणि कारवाईसाठी आपल्याच सरकारला भाग पाडावे. असाच आरोप जळगावातील राष्टÑवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज देऊन केला आहे. चार पोलीस कर्मचाºयांची नावे देऊन हे कर्मचारी एका माजी मंत्र्याच्या सेवेत आहेत, आणि त्यांच्याविषयी तक्रारी असल्याचे नमूद केले आहे. पुन्हा तेच, गृहमंत्री अनिल देशमुख हे वर्षभरात तीनवेळा जळगाव जिल्ह्यात येऊन गेले. दर आठवडयाला त्यांचा जनता दरबार मुंबईत होत असतो. राष्टÑवादीचे अनेक पदाधिकारी तेथे जाऊन निवेदने देतात. मग पाटील, यांनी हा मार्ग का चोखाळला नाही? असाच आरोप त्यांनी जळगाव महापालिकेतील भाजप नगरसेवकांवर वॉटरग्रेस या स्वच्छता कामाच्या ठेकेदार कंपनीकडून दरमहा बक्षीसी मिळत असल्याबद्दल केला होता. निव्वळ आरोप करण्यापेक्षा महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुराव्यासह तक्रार केली तर चौकशी लागू शकते. शिवसेनेचे जळगावातील नगरसेवक देखील भाजपच्या कारभाराविरोधात कधी आंदोलन करतात तर कधी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे जाऊन तक्रारी करतात. पण पुरावा हाती घेऊन एखादे प्रकरण धसास लावले, असे काही घडत नाही. यामुळे होते काय, जनतेला या आरोपांमध्ये तथ्य वाटत नाही. आरोप होतात, प्रसिध्दी मिळते आणि चार दिवसांनी सगळे शांत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते स्व.रामदास नायक यांनी प्रतिभा प्रतिष्ठानमधील गैरव्यवहार उघडकीस आणला आणि तत्कालीन मुख्यमंत्री अ.र.अंतुले यांना पायउतार होण्यास भाग पाडले होते. या प्रकरणाची आठवण याप्रसंगी होते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव