शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

निव्वळ आरोपांचा धुराळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 09:00 IST

मिलिंद कुलकर्णी  राजकारणात आरोप - प्रत्यारोप होत असतात. मात्र आरोप कोण करते आणि कोणावर करते, यालादेखील महत्त्व आहे. विरोधकांनी ...

मिलिंद कुलकर्णी 

राजकारणात आरोप - प्रत्यारोप होत असतात. मात्र आरोप कोण करते आणि कोणावर करते, यालादेखील महत्त्व आहे. विरोधकांनी आरोप केले तर ते त्यांच्या भूमिकेनुसार ते आरोप करणारच असे म्हटले जाते, पण सत्ताधारी मंडळींनी आरोप केले तर त्यांनी पुरावे द्यायला हवे, तरच त्यांच्या आरोपात तथ्य आहे, असे जनतेला वाटेल. अन्यथा आरोपांचा निव्वळ धुराळा उडवल्यापलिकडे काहीही साधले जात नाही. 

देशातील राजकीय स्थिती विचित्र  आहे. केद्र सरकार भाजपचे आहे, महाराष्टÑात शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस या तीन राजकीय पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्था या भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सत्तासंतुलन साधले गेले तरी प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेत्याकडे सत्ताधारी आणि विरोधक अशी भूमिका येते. ही भूमिका वठवत असताना निव्वळ हवेत वार करण्यापेक्षा पुराव्यासह आरोप केले तर त्याला वजन प्राप्त होते आणि प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पडते. जळगाव जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे या बहुदा एकमेव सदस्या आहेत, ज्या सत्ताधारी भाजपच्या सदस्या असूनही पुराव्यासह गैरव्यवहार उघडकीस आणतात. मग तो स्वस्त धान्य दुकानातील मापाचे पाप असो की, तलावातील गाळ, गौण खनीज उचलण्यात झालेला गैरव्यवहार असो, त्यांनी पुराव्यासह आरोप केले. प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि कारवाई करण्यास भाग पाडले. बाकी मंडळी आरोप खूप करतात, पण त्याच्या पुराव्यांचा पत्ता नसतो. राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे हे आरोपांचा धुराळा उडविण्यात माहीर आहेत. त्यांनी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील गांजाशेतीविषयी पत्रकार परिषद घेऊन महसूल, वन, कृषी आणि पोलीस विभागावर गंभीर आरोप केले आहेत. कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी पीक पाहणी करायला शेतात जातात, तेव्हा त्यांना गांजाची शेती लक्षात येत नाही काय? पेरा वेगळा का दाखविला जातो, ही कोणाची शेती आहे आणि त्यांची नावे का लपवली जातात, हा त्यांचा मुद्दा रास्त आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीदेखील योग्य आहे. मात्र त्यांनी जे इतर आरोप केले त्याविषयी खरेतर त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी करायला हवी. चौकशीसाठी पाठपुरावा करायला हवा. तसे न करता गोटे हे पत्रकार परिषद घेऊन नेमके काय साधू इच्छितात, हे कळायला मार्ग नाही. गोटे यांनी पोलीस दलातील बदलीचा मुद्दा उपस्थित करुन आरोप केला की, शिरपूर विभागात पोलीस निरीक्षक म्हणून बदली होण्यासाठी ५० लाख ते एक कोटीची बिदागी द्यावी लागते.  शिरपूर, सांगवी व थाळनेर येथील पोलीस ठाण्यात बदलीसाठी २५ ते ८० लाख रुपये मोजावे लागतात. तलाठी बदलीचा दर किमान दोन ते पाच लाखापर्यंत आहे. असे जर असेल तर गोटे हे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, माजी आमदार आहेत. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करावी, पुरावे असतील तर ते द्यावे, आणि कारवाईसाठी आपल्याच सरकारला भाग पाडावे. असाच आरोप जळगावातील राष्टÑवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज देऊन केला आहे. चार पोलीस कर्मचाºयांची नावे देऊन हे कर्मचारी एका माजी मंत्र्याच्या सेवेत आहेत, आणि त्यांच्याविषयी तक्रारी असल्याचे नमूद केले आहे. पुन्हा तेच, गृहमंत्री अनिल देशमुख हे वर्षभरात तीनवेळा जळगाव जिल्ह्यात येऊन गेले. दर आठवडयाला त्यांचा जनता दरबार मुंबईत होत असतो. राष्टÑवादीचे अनेक पदाधिकारी तेथे जाऊन निवेदने देतात. मग पाटील, यांनी हा मार्ग का चोखाळला नाही? असाच आरोप त्यांनी जळगाव महापालिकेतील भाजप नगरसेवकांवर वॉटरग्रेस या स्वच्छता कामाच्या ठेकेदार कंपनीकडून दरमहा बक्षीसी मिळत असल्याबद्दल केला होता. निव्वळ आरोप करण्यापेक्षा महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुराव्यासह तक्रार केली तर चौकशी लागू शकते. शिवसेनेचे जळगावातील नगरसेवक देखील भाजपच्या कारभाराविरोधात कधी आंदोलन करतात तर कधी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे जाऊन तक्रारी करतात. पण पुरावा हाती घेऊन एखादे प्रकरण धसास लावले, असे काही घडत नाही. यामुळे होते काय, जनतेला या आरोपांमध्ये तथ्य वाटत नाही. आरोप होतात, प्रसिध्दी मिळते आणि चार दिवसांनी सगळे शांत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते स्व.रामदास नायक यांनी प्रतिभा प्रतिष्ठानमधील गैरव्यवहार उघडकीस आणला आणि तत्कालीन मुख्यमंत्री अ.र.अंतुले यांना पायउतार होण्यास भाग पाडले होते. या प्रकरणाची आठवण याप्रसंगी होते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव