शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

निव्वळ आरोपांचा धुराळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 09:00 IST

मिलिंद कुलकर्णी  राजकारणात आरोप - प्रत्यारोप होत असतात. मात्र आरोप कोण करते आणि कोणावर करते, यालादेखील महत्त्व आहे. विरोधकांनी ...

मिलिंद कुलकर्णी 

राजकारणात आरोप - प्रत्यारोप होत असतात. मात्र आरोप कोण करते आणि कोणावर करते, यालादेखील महत्त्व आहे. विरोधकांनी आरोप केले तर ते त्यांच्या भूमिकेनुसार ते आरोप करणारच असे म्हटले जाते, पण सत्ताधारी मंडळींनी आरोप केले तर त्यांनी पुरावे द्यायला हवे, तरच त्यांच्या आरोपात तथ्य आहे, असे जनतेला वाटेल. अन्यथा आरोपांचा निव्वळ धुराळा उडवल्यापलिकडे काहीही साधले जात नाही. 

देशातील राजकीय स्थिती विचित्र  आहे. केद्र सरकार भाजपचे आहे, महाराष्टÑात शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस या तीन राजकीय पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्था या भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सत्तासंतुलन साधले गेले तरी प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेत्याकडे सत्ताधारी आणि विरोधक अशी भूमिका येते. ही भूमिका वठवत असताना निव्वळ हवेत वार करण्यापेक्षा पुराव्यासह आरोप केले तर त्याला वजन प्राप्त होते आणि प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पडते. जळगाव जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे या बहुदा एकमेव सदस्या आहेत, ज्या सत्ताधारी भाजपच्या सदस्या असूनही पुराव्यासह गैरव्यवहार उघडकीस आणतात. मग तो स्वस्त धान्य दुकानातील मापाचे पाप असो की, तलावातील गाळ, गौण खनीज उचलण्यात झालेला गैरव्यवहार असो, त्यांनी पुराव्यासह आरोप केले. प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि कारवाई करण्यास भाग पाडले. बाकी मंडळी आरोप खूप करतात, पण त्याच्या पुराव्यांचा पत्ता नसतो. राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे हे आरोपांचा धुराळा उडविण्यात माहीर आहेत. त्यांनी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील गांजाशेतीविषयी पत्रकार परिषद घेऊन महसूल, वन, कृषी आणि पोलीस विभागावर गंभीर आरोप केले आहेत. कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी पीक पाहणी करायला शेतात जातात, तेव्हा त्यांना गांजाची शेती लक्षात येत नाही काय? पेरा वेगळा का दाखविला जातो, ही कोणाची शेती आहे आणि त्यांची नावे का लपवली जातात, हा त्यांचा मुद्दा रास्त आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीदेखील योग्य आहे. मात्र त्यांनी जे इतर आरोप केले त्याविषयी खरेतर त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी करायला हवी. चौकशीसाठी पाठपुरावा करायला हवा. तसे न करता गोटे हे पत्रकार परिषद घेऊन नेमके काय साधू इच्छितात, हे कळायला मार्ग नाही. गोटे यांनी पोलीस दलातील बदलीचा मुद्दा उपस्थित करुन आरोप केला की, शिरपूर विभागात पोलीस निरीक्षक म्हणून बदली होण्यासाठी ५० लाख ते एक कोटीची बिदागी द्यावी लागते.  शिरपूर, सांगवी व थाळनेर येथील पोलीस ठाण्यात बदलीसाठी २५ ते ८० लाख रुपये मोजावे लागतात. तलाठी बदलीचा दर किमान दोन ते पाच लाखापर्यंत आहे. असे जर असेल तर गोटे हे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, माजी आमदार आहेत. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करावी, पुरावे असतील तर ते द्यावे, आणि कारवाईसाठी आपल्याच सरकारला भाग पाडावे. असाच आरोप जळगावातील राष्टÑवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज देऊन केला आहे. चार पोलीस कर्मचाºयांची नावे देऊन हे कर्मचारी एका माजी मंत्र्याच्या सेवेत आहेत, आणि त्यांच्याविषयी तक्रारी असल्याचे नमूद केले आहे. पुन्हा तेच, गृहमंत्री अनिल देशमुख हे वर्षभरात तीनवेळा जळगाव जिल्ह्यात येऊन गेले. दर आठवडयाला त्यांचा जनता दरबार मुंबईत होत असतो. राष्टÑवादीचे अनेक पदाधिकारी तेथे जाऊन निवेदने देतात. मग पाटील, यांनी हा मार्ग का चोखाळला नाही? असाच आरोप त्यांनी जळगाव महापालिकेतील भाजप नगरसेवकांवर वॉटरग्रेस या स्वच्छता कामाच्या ठेकेदार कंपनीकडून दरमहा बक्षीसी मिळत असल्याबद्दल केला होता. निव्वळ आरोप करण्यापेक्षा महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुराव्यासह तक्रार केली तर चौकशी लागू शकते. शिवसेनेचे जळगावातील नगरसेवक देखील भाजपच्या कारभाराविरोधात कधी आंदोलन करतात तर कधी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे जाऊन तक्रारी करतात. पण पुरावा हाती घेऊन एखादे प्रकरण धसास लावले, असे काही घडत नाही. यामुळे होते काय, जनतेला या आरोपांमध्ये तथ्य वाटत नाही. आरोप होतात, प्रसिध्दी मिळते आणि चार दिवसांनी सगळे शांत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते स्व.रामदास नायक यांनी प्रतिभा प्रतिष्ठानमधील गैरव्यवहार उघडकीस आणला आणि तत्कालीन मुख्यमंत्री अ.र.अंतुले यांना पायउतार होण्यास भाग पाडले होते. या प्रकरणाची आठवण याप्रसंगी होते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव