शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात काय जादू केली?; महाजन व मुंडे यांच्यापेक्षाही दोन पावले पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 07:39 IST

फडणवीस यांनी गोव्यातील बंडकऱ्यांना तर शांत केलेच, पण विरोधी पक्षांची मते विभागली जातील याचीही काळजी घेतली. त्याचा भाजपला फायदा झाला.

- सद्गुरू पाटील

मुख्यमंत्रिपदासाठी तुमच्याकडे अनेक नेते आहेत, मग तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताना प्रत्येक नेत्याला कसे सांभाळणार, असा प्रश्न मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या एका गोवा भेटीवेळी विचारला होता. त्यावेळी गोवा विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नव्हती; पण पूर्वतयारीसाठी फडणवीस आले होते. मात्र, गोव्यातील भाजपमधील कुरबुरींची, मंत्र्यांमधील स्पर्धेची आणि समाजाच्या काही घटकांमध्ये सरकारविषयी असलेल्या कडवट भावनेची फडणवीस यांना कल्पना होती. आम्ही निवडणुकीला सामोरे जाताना गोमंतकीयांसमोर युनायटेड लीडरशिप ठेवू, असे उत्तर फडणवीस यांनी दिले होते. फडणवीस यांनी आपले तेच सूत्र मग निवडणूक प्रचाराच्या पूर्ण काळात वापरले. 

प्रमोद सावंत हे जरी मुख्यमंत्रीपदी होते तरी फडणवीस यांनी स्वत: व्यासपीठावरून कधीच सावंत हेच यापुढेही मुख्यमंत्री होतील असे ठासून सांगितले नाही. सध्या मुख्यमंत्रिपदी सावंत असल्याने आम्ही सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतोय असे खासगीत फडणवीस पत्रकारांना सांगायचे. एकदा निवडणूक जाहीर झाल्यानंतर फडणवीस हे एक महिना गोव्यात तळ ठोकून होते. भाजपच्या पूर्ण निवडणूक रणनीतीचे व्यवस्थापन फडणवीस यांनी केले. एक काळ असा होता, १९९० च्या दशकात स्वर्गीय प्रमोद महाजन व स्व. गोपीनाथ मुंडे हे गोव्यात भाजपची निवडणूक रणनीती ठरवायचे. त्यांचा प्रभाव त्यावेळी गोवा भाजपाच्या कामावर असायचा. यावेळी फडणवीस यांनी तीच जबाबदारी पार पाडली, पण फडणवीस यांनी महाजन व मुंडे यांच्यापेक्षाही दोन पावले पुढे टाकली. 

यावेळी जे छोटे पक्ष भाजपाच्या विरोधात लढले, त्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी व अपक्षांशी फडणवीस यांनी स्वत:चे व्यक्तिगत संबंध ठेवले होते. निवडणूक निकालानंतर भाजपाला जेव्हा या छोट्या पक्षांची व अपक्षांची गरज पडेल तेव्हा ते आपल्या संबंधांमुळे भाजपासोबत येतील व मग भाजपाची आरामात सत्ता स्थापन होईल हे फडणवीस यांचे गणित होते. हे गणित कामी आले. यावेळी निवडणूक निकाल लागला व भाजपाला एक जागा कमी पडली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने लगेच पाठिंब्याचे पत्र भाजपाला दिले, तसेच तिघा नव्या अपक्ष आमदारांनीही पाठिंब्याची हमी दिली.

भाजपाने स्वबळावर निवडणुका लढविल्या तरी, भाजपाला यावेळी गोव्यात एकूण ३ लाख १६ हजार मते मिळाली. फडणवीस यांच्या रणनीतीला व मुत्सद्देगिरीला याचे श्रेय जाते. विरोधी काँग्रेसची मते तीन-चार पक्षांमध्ये फुटतील, विभागून जातील याची काळजी फडणवीस यांनी घेतली. रिव्होल्युशनरी गोवन्स या संघटनेने काँग्रेसची मते फोडली. यामुळे दहा मतदारसंघांमध्ये तरी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. शिवाय आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस यांनीही काँग्रेसचीच मते फोडली. 

गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसला किमान दोन उमेदवार तरी, फडणवीस यांच्याच शिफारशीवरून मिळाले. उदाहरणार्थ फिलिप नेरी रॉड्रीग्ज. फिलिप नेरी हे गोव्यातील भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, त्यांचा वेळ्ळी हा पूर्णपणे ख्रिस्तीबहुल मतदासंघ आहे. तिथे भाजपाच्या तिकिटावर फिलिप नेरी जिंकू शकत नसल्याने फडणवीस यांनीच नेरी यांना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट घ्या, असा सल्ला दिला.  मुख्यमंत्रिपदासाठी भाजपामध्ये विश्वजित राणे, बाबू कवळेकर, माविन गुदिन्हो असे काही नेते इच्छुक होते. त्यामुळे निवडणूक प्रचार काळात फडणवीस यांनी युनायटेड नेतृत्वावर भर दिला. जे नेते आपल्याला पक्षात महत्त्व मिळत नाही अशी तक्रार करीत होते, त्यांची समजूत फडणवीस यांनी काढली. 

मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी बंड करू नये म्हणूनही फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, उत्पल यांनी फडणवीस यांचे म्हणणे ऐकले नाही. उत्पलने बंड केले व निवडणुकीत उत्पलचा पराभव झाला. भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही बंड करू नये म्हणून फडणवीस यांनी गळ घातली होती, पार्सेकर यांनीही फडणवीस यांचे प्रस्ताव फेटाळले. पार्सेकर निवडणुकीत पराभूत झाले. 

प्रमोद महाजन यांच्यानंतर फडणवीस हे अल्पावधीत गोव्यात लोकप्रिय बनले हे नमूद करावे लागेल. ममता बॅनर्जींच्या पक्षाची म्हणजे तृणमूल काँग्रेसची सगळी रणनीती प्रशांत किशोर ठरवत होते, त्या रणनीतीला फडणवीस तंत्राने शह दिला. तृणमूल एकही जागा गोव्यात जिंकू शकला नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे गोव्यातील यश मर्यादित राहील याचीही काळजी फडणवीस यांनी घेतली. आप केवळ दोन जागा जिंकला. फडणवीस तंत्रासमोर शिवसेना नेते संजय राऊत यांची डाळ किंचित देखील शिजू शकली नाही, हेही नमूद करावे लागेल..

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgoaगोवा