शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

बेघर होऊ या भीतीने लाखो मुंबईकर धोकादायक इमारतींमध्ये मृत्यूच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 05:30 IST

मुंबईत डोक्यावर छप्पर असणे हेच मोठ्या भाग्याचे मानले जाते. हक्काचा निवारा हिरावला तर कायमचे बेघर होऊ या भीतीने हजारो धोकादायक इमारतींमध्ये लाखो मुंबईकर मृत्यूच्या छायेत दिवस काढत आहेत.

मुंबईत डोक्यावर छप्पर असणे हेच मोठ्या भाग्याचे मानले जाते. हक्काचा निवारा हिरावला तर कायमचे बेघर होऊ या भीतीने हजारो धोकादायक इमारतींमध्ये लाखो मुंबईकर मृत्यूच्या छायेत दिवस काढत आहेत. अशा इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट सक्तीचे झाल्यावर बनावट आॅडिट अहवालाद्वारे इमारतींच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांवर दबाव टाकणे इमारत मालकांनी सुरू केले. या मनमानीला चाप लावून धोकादायक इमारतींच्या विकासाला गती देणारे धोरण अखेर मुंबई महापालिकेने आणले आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) अनुसार २००१ ते २०१५ या कालावधीत देशातील इमारत दुर्घटनांमध्ये ३८ हजार ३६३ लोकांचा मृत्यू झाला. गेल्या तीन महिन्यांतच घाटकोपर आणि भेंडी बाजारातील इमारत दुर्घटनांत पन्नासहून अधिक बळी गेले. सप्टेंबर २०१३मध्ये डॉकयार्ड इमारत दुर्घटनेने काळजाचा ठोका चुकविला. त्यात ६१ रहिवाशांचा बळी गेला. त्यानंतर ३० वर्षांवरील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट सक्तीचे करण्यात आले. परंतु बिल्डरांनी प्रशासनातील अधिका-यांना हाताशी धरून खोटे अहवाल बनवण्याचा नवा धंदा सुरू केला. जागरूक रहिवाशांनी स्वतंत्र स्ट्रक्चरल आॅडिट करीत इमारत मालकांचे बिंग फोडले. यामुळे दोन आॅडिट अहवालाचा वाद निर्माण झाला. हा तिढा सोडविण्यासाठी पालिका आयुक्त अजय मेहता यांनी उचललेले पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे. नवीन धोरणामुळे तीन प्रमुख प्रश्न सुटणार आहेत. इमारत मालकाने पालिकेकडे जमा केलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल संकेतस्थळाच्या माध्यमातून रहिवाशांपर्यंत पोहोचणार आहे. या पारदर्शकतेमुळे दोन आॅडिट अहवालांचा गोंधळ संपणार आहे. रहिवाशांचा काही आक्षेप असल्यास त्यांना तत्काळ दाद मागता येणार आहे. दुसरे म्हणजे, जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना जुन्या घराच्या क्षेत्रफळाइतकेच क्षेत्रफळ देणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इमारत दुर्घटनेसाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सुस्थितीत असल्याचा अहवाल दिल्यानंतर ती इमारत पडल्यास संबंधित स्ट्रक्चरल अभियंत्याची नोंदणी रद्द होणार आहे. डॉकयार्ड इमारत दुर्घटनेनंतर पालिकेच्या अभियंत्यांवर कारवाई झाली. मात्र या इमारतीच्या दुरुस्तीच्या फाईलवर दीड वर्ष कोणताही निर्णय न घेणाºया सनदी अधिकाºयाला अभय मिळाले होते. कायद्यातील पळवाटा शोधून सहीसलामत सुटणाºया वरिष्ठ अधिकाºयांभोवतीही फास आवळण्याची तरतूद या धोरणात होणे आवश्यक आहे. त्यानंतरच खºया अर्थाने धोकादायक इमारतींचा तिढा सुटेल.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाMumbaiमुंबई