शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

बेघर होऊ या भीतीने लाखो मुंबईकर धोकादायक इमारतींमध्ये मृत्यूच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 05:30 IST

मुंबईत डोक्यावर छप्पर असणे हेच मोठ्या भाग्याचे मानले जाते. हक्काचा निवारा हिरावला तर कायमचे बेघर होऊ या भीतीने हजारो धोकादायक इमारतींमध्ये लाखो मुंबईकर मृत्यूच्या छायेत दिवस काढत आहेत.

मुंबईत डोक्यावर छप्पर असणे हेच मोठ्या भाग्याचे मानले जाते. हक्काचा निवारा हिरावला तर कायमचे बेघर होऊ या भीतीने हजारो धोकादायक इमारतींमध्ये लाखो मुंबईकर मृत्यूच्या छायेत दिवस काढत आहेत. अशा इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट सक्तीचे झाल्यावर बनावट आॅडिट अहवालाद्वारे इमारतींच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांवर दबाव टाकणे इमारत मालकांनी सुरू केले. या मनमानीला चाप लावून धोकादायक इमारतींच्या विकासाला गती देणारे धोरण अखेर मुंबई महापालिकेने आणले आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) अनुसार २००१ ते २०१५ या कालावधीत देशातील इमारत दुर्घटनांमध्ये ३८ हजार ३६३ लोकांचा मृत्यू झाला. गेल्या तीन महिन्यांतच घाटकोपर आणि भेंडी बाजारातील इमारत दुर्घटनांत पन्नासहून अधिक बळी गेले. सप्टेंबर २०१३मध्ये डॉकयार्ड इमारत दुर्घटनेने काळजाचा ठोका चुकविला. त्यात ६१ रहिवाशांचा बळी गेला. त्यानंतर ३० वर्षांवरील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट सक्तीचे करण्यात आले. परंतु बिल्डरांनी प्रशासनातील अधिका-यांना हाताशी धरून खोटे अहवाल बनवण्याचा नवा धंदा सुरू केला. जागरूक रहिवाशांनी स्वतंत्र स्ट्रक्चरल आॅडिट करीत इमारत मालकांचे बिंग फोडले. यामुळे दोन आॅडिट अहवालाचा वाद निर्माण झाला. हा तिढा सोडविण्यासाठी पालिका आयुक्त अजय मेहता यांनी उचललेले पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे. नवीन धोरणामुळे तीन प्रमुख प्रश्न सुटणार आहेत. इमारत मालकाने पालिकेकडे जमा केलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल संकेतस्थळाच्या माध्यमातून रहिवाशांपर्यंत पोहोचणार आहे. या पारदर्शकतेमुळे दोन आॅडिट अहवालांचा गोंधळ संपणार आहे. रहिवाशांचा काही आक्षेप असल्यास त्यांना तत्काळ दाद मागता येणार आहे. दुसरे म्हणजे, जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना जुन्या घराच्या क्षेत्रफळाइतकेच क्षेत्रफळ देणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इमारत दुर्घटनेसाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सुस्थितीत असल्याचा अहवाल दिल्यानंतर ती इमारत पडल्यास संबंधित स्ट्रक्चरल अभियंत्याची नोंदणी रद्द होणार आहे. डॉकयार्ड इमारत दुर्घटनेनंतर पालिकेच्या अभियंत्यांवर कारवाई झाली. मात्र या इमारतीच्या दुरुस्तीच्या फाईलवर दीड वर्ष कोणताही निर्णय न घेणाºया सनदी अधिकाºयाला अभय मिळाले होते. कायद्यातील पळवाटा शोधून सहीसलामत सुटणाºया वरिष्ठ अधिकाºयांभोवतीही फास आवळण्याची तरतूद या धोरणात होणे आवश्यक आहे. त्यानंतरच खºया अर्थाने धोकादायक इमारतींचा तिढा सुटेल.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाMumbaiमुंबई