शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कृषी पर्यटनालाही वाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:58 IST

शेतमालाला भाव नाही. शेती परवडत नाही म्हणून निराश झालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी पर्यटन हा फार मोठा पर्याय आहे.

- बाळासाहेब बोचरेशेतमालाला भाव नाही. शेती परवडत नाही म्हणून निराश झालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी पर्यटन हा फार मोठा पर्याय आहे. यासाठी सरकारने ठोस धोरण अवलंबले तर हा व्यवसाय रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करू शकतो.शेतमालाला भाव नाही. शेती परवडत नाही म्हणून निराश झालेल्या शेतकºयांना कृषी पर्यटन हा फार मोठा पर्याय आज उपलब्ध झाला आहे. यासाठी शेतकºयांची मोट बांधणे आणि त्यांना प्रोत्साहन देणारे धोरण अवलंबले तर देशात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. अनेक तरुण आणि सुशिक्षित शेतकरी उद्योजक म्हणून उदयास येतील.रानातला रानमेवा रानातच खावा. त्याची चव निसर्गासोबतच चाखली तर त्याच्यासारखा आनंद नाही. अनेक शहरी लोकांना पर्यटनाला निघाल्यावर अस्सल ग्रामीण खाद्यपदार्थांची चव हवी असते. भारताची प्राचीन संस्कृती व चालीरीती, पेहराव याचा अभ्यास करणाºयांना हे सगळं ग्रामीण भागातच पाहायला मिळतं आणि तेही शेतकºयांच्या वावरातच, त्यामुळे शेत शिवाराला भेट देणाºयांची संख्या वाढू लागली आहे. अगदी परदेशी पर्यटकही कृषी पर्यटनाकडे आकृष्ट होऊ लागले आहेत.बारामतीजवळ सुनेत्राताई पवार यांनी महाराष्टÑ राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित (मार्ट) ही संस्था स्थापन केली आहे. संस्थेच्या माध्यमातून कृषी पर्यटनामध्ये उतरू इच्छिणाºया शेतकºयांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते. गेल्या १० वर्षांत कृषी पर्यटन कार्यशाळा, परिषदा, संमेलन, प्रदर्शने त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून कृषी पर्यटनाचा गवगवा केला जात आहे. त्यामुळे परदेशी पर्यटकांमध्ये ही केंद्रे लोकप्रिय होऊ लागली आहेत. सध्या बाळासाहेब बराटे हे या संस्थेचे चेअरमन आहेत. शेतकºयांनी शहरातील पर्यटकांना आपली शेती व उपक्रम दाखवणे, त्यांचे सशुल्क आदरातिथ्य करणे यालाच कृषी पर्यटन म्हणतात. महाराष्टÑ राज्य यामध्ये आघाडीवर असून आजमितीस राज्यात ३७५ कृषी पर्यटन केंद्रे आहेत. सोलापूरसारख्या ऊस उत्पादक जिल्ह्यात पाच कृषी पर्यटन केंद्रे आहेत. या केंद्रांना परराज्यासह परदेशातील पर्यटकांनीही भेटी दिल्या आहेत. सेंद्रीय शेती, नैसर्गिक जीवन, विषमुक्त अन्न, देशी गाईचे महत्त्व, पर्यावरणपूरक वातावरण निर्मिती व शरीराला आनंद देणारे निसर्गरम्य वातावरण यामुळे या पर्यटन केंद्रांनी पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. गेल्या तीन वर्षांत कृषी पर्यटन केंद्रांना आवर्जून भेट देणाºया हौशी पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे. सुमारे ७० लाख पर्यटकांनी खास पर्यटन केंद्रांना भेटी दिल्या असून त्यामधून शेतकºयांना चांगले चार कोटीपर्यंत उत्पन्न मिळाले आहे.शेती टिकवणे, ती फायद्यात आणणे आणि शेतकºयांना चांगला मोबदला मिळवून देणे यासाठी कृषी पर्यटन हा चांगला पर्याय आहे. नोकरीच्या शोधात असलेला सुशिक्षित तरुण कृषी पर्यटनामुळे स्वत:च्या पायावर उभा राहू शकतो. पण सरकारने याबाबत अजूनही गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. शेतकºयांना शेतीदराने वीज दिली जाते; मात्र कृषी पर्यटन केंद्रांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जातो, असा अनुभव सोलापूरच्या वानप्रस्थ कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका व मार्टच्या संचालक सोनाली जाधव यांचा अनुभव आहे. मार्टने पाच वर्षांपूर्वी सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव दिला असून सरकारने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. नाबार्डची मदत, सहलींसाठी प्राधान्य यापलीकडे सरकारने कृषी पर्यटनासाठी पूरक असे ठोस धोरण तयार केलेले नाही. कृषी पर्यटनातून रोजगार निर्मितीला प्रचंड वाव आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी