शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठामागचं शुक्लकाष्ठ संपेना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 04:35 IST

मुंबई विद्यापीठामागचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. आॅनलाइन तपासणीचे कवित्व संपलेले नसतानाच पेपरफुटीचे प्रकरण उजेडात आले आहे.

मुंबई विद्यापीठामागचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. आॅनलाइन तपासणीचे कवित्व संपलेले नसतानाच पेपरफुटीचे प्रकरण उजेडात आले आहे. विद्यापीठाने आपल्या १५०व्या वर्षांत पदार्पण करताना ‘गौरवशाली’ इतिहास, परंपरेचा वारसा सांगत कार्यक्रम केले. एकीकडे विद्यापीठ इतिहासाच्या स्मरणरंजनात गुंतलेले असताना उद्योगविश्वाने आपली भलतीच अडचण मांडली होती. विद्यापीठाच्या फॅक्टरीतून पदवी वगैरे घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी पुरेसे तयार नसतात. पदव्यांची गुंडाळी घेऊन बाहेर पडणाºया विद्यार्थ्यांचे कुशल मनुष्यबळात रूपांतर करण्यासाठी आम्हालाच परत त्यांना प्रशिक्षित करावे लागते. मग, पदवी किंवा अन्य अभ्यासक्र मांचा उपयोगच काय, असा रोकडा सवाल उद्योगविश्वाने उपस्थित केला होता. त्याला आता दहा वर्षे उलटली. पण, प्रश्न तसाच आहे. गेल्याच वर्षी ‘फिक्की’ या उद्योगविश्वातील अग्रणी संस्थेने एक अहवाल सादर केला. भविष्यातील रोजगारांच्या संधींचा वेध घेणाºया अहवालाने आपल्याकडील उच्चशिक्षणाची तकलादू अवस्था आणि त्याच्या ढिम्मपणावर चिंता व्यक्त केली होती. मात्र, गौरवशाली वारसा सांगत स्वत:ची पाठ थोपटून घेणाºया विद्यापीठाला दहा वर्षांत या समस्येकडे पाहावेसे वाटले नाही. १६० वर्षांच्या मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात एकाही कुलगुरूची हकालपट्टी झाली नव्हती. ती या वर्षी झाली इतकेच काय ते घडले. त्यातही विद्यापीठीय राजकारणाचा बेरकीपणा असा की आॅनलाइन तपासणीत जो काही गदारोळ झाला त्याला फक्त कुलगुरूच जबाबदार. त्यांची हकालपट्टी झाली म्हणजे आता विषय संपला. आॅनलाइन तपासणीची संकल्पना मांडणाºया संजय देशमुखांना त्याची कालबद्ध अंमलबजावणी करता आली नाही; म्हणून त्यांची संकल्पना चुकीची ठरत नाही. त्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅनलाइन तपासणीच्या गदारोळाला ‘इष्टापत्ती’ म्हटले आहे. विद्यापीठाच्या दगडी भिंतींआड जे बिनबोभाट सुरू होते ते आॅनलाइनमुळे उजेडात आले. शासनकर्त्यांनाही अचंबा वाटावा इतक्या गडबडी वर्षानुवर्षे होत होत्या. विद्यापीठाने स्वत:चा वारसा सांगायचा नसतो. त्यांनी ज्यांना घडविले त्यांच्या कर्तृत्वातून तो आपसूक मिरवला जातो. हे साधायचे असेल तर परीक्षा, पेपर, उत्तरपत्रिका आणि निकाल इतक्या लघुदृष्टीच्या विद्यापीठ प्रशासनाला जागे करावे लागेल. त्यापुढे पाहण्याची, त्यासाठी झटण्याची सवय आम्हाला लावून घ्यावी लागेल. तरच, अभिमान बाळगावा, वारसा सांगण्याजोगे विद्यापीठाकडे काही शिल्लक असेल. पेपरफुटीसह इतर प्रश्नांनीही विद्यापीठाला घेरले आहे. ते सर्व प्रश्न तातडीने सोडविले नाही, तर पदव्या वाटणाºया देशातील अनेक संस्थांपैकी एक एवढीच तिची ओळख असेल.