शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

मुंबई विद्यापीठामागचं शुक्लकाष्ठ संपेना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 04:35 IST

मुंबई विद्यापीठामागचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. आॅनलाइन तपासणीचे कवित्व संपलेले नसतानाच पेपरफुटीचे प्रकरण उजेडात आले आहे.

मुंबई विद्यापीठामागचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. आॅनलाइन तपासणीचे कवित्व संपलेले नसतानाच पेपरफुटीचे प्रकरण उजेडात आले आहे. विद्यापीठाने आपल्या १५०व्या वर्षांत पदार्पण करताना ‘गौरवशाली’ इतिहास, परंपरेचा वारसा सांगत कार्यक्रम केले. एकीकडे विद्यापीठ इतिहासाच्या स्मरणरंजनात गुंतलेले असताना उद्योगविश्वाने आपली भलतीच अडचण मांडली होती. विद्यापीठाच्या फॅक्टरीतून पदवी वगैरे घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी पुरेसे तयार नसतात. पदव्यांची गुंडाळी घेऊन बाहेर पडणाºया विद्यार्थ्यांचे कुशल मनुष्यबळात रूपांतर करण्यासाठी आम्हालाच परत त्यांना प्रशिक्षित करावे लागते. मग, पदवी किंवा अन्य अभ्यासक्र मांचा उपयोगच काय, असा रोकडा सवाल उद्योगविश्वाने उपस्थित केला होता. त्याला आता दहा वर्षे उलटली. पण, प्रश्न तसाच आहे. गेल्याच वर्षी ‘फिक्की’ या उद्योगविश्वातील अग्रणी संस्थेने एक अहवाल सादर केला. भविष्यातील रोजगारांच्या संधींचा वेध घेणाºया अहवालाने आपल्याकडील उच्चशिक्षणाची तकलादू अवस्था आणि त्याच्या ढिम्मपणावर चिंता व्यक्त केली होती. मात्र, गौरवशाली वारसा सांगत स्वत:ची पाठ थोपटून घेणाºया विद्यापीठाला दहा वर्षांत या समस्येकडे पाहावेसे वाटले नाही. १६० वर्षांच्या मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात एकाही कुलगुरूची हकालपट्टी झाली नव्हती. ती या वर्षी झाली इतकेच काय ते घडले. त्यातही विद्यापीठीय राजकारणाचा बेरकीपणा असा की आॅनलाइन तपासणीत जो काही गदारोळ झाला त्याला फक्त कुलगुरूच जबाबदार. त्यांची हकालपट्टी झाली म्हणजे आता विषय संपला. आॅनलाइन तपासणीची संकल्पना मांडणाºया संजय देशमुखांना त्याची कालबद्ध अंमलबजावणी करता आली नाही; म्हणून त्यांची संकल्पना चुकीची ठरत नाही. त्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅनलाइन तपासणीच्या गदारोळाला ‘इष्टापत्ती’ म्हटले आहे. विद्यापीठाच्या दगडी भिंतींआड जे बिनबोभाट सुरू होते ते आॅनलाइनमुळे उजेडात आले. शासनकर्त्यांनाही अचंबा वाटावा इतक्या गडबडी वर्षानुवर्षे होत होत्या. विद्यापीठाने स्वत:चा वारसा सांगायचा नसतो. त्यांनी ज्यांना घडविले त्यांच्या कर्तृत्वातून तो आपसूक मिरवला जातो. हे साधायचे असेल तर परीक्षा, पेपर, उत्तरपत्रिका आणि निकाल इतक्या लघुदृष्टीच्या विद्यापीठ प्रशासनाला जागे करावे लागेल. त्यापुढे पाहण्याची, त्यासाठी झटण्याची सवय आम्हाला लावून घ्यावी लागेल. तरच, अभिमान बाळगावा, वारसा सांगण्याजोगे विद्यापीठाकडे काही शिल्लक असेल. पेपरफुटीसह इतर प्रश्नांनीही विद्यापीठाला घेरले आहे. ते सर्व प्रश्न तातडीने सोडविले नाही, तर पदव्या वाटणाºया देशातील अनेक संस्थांपैकी एक एवढीच तिची ओळख असेल.