शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठामागचं शुक्लकाष्ठ संपेना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 04:35 IST

मुंबई विद्यापीठामागचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. आॅनलाइन तपासणीचे कवित्व संपलेले नसतानाच पेपरफुटीचे प्रकरण उजेडात आले आहे.

मुंबई विद्यापीठामागचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. आॅनलाइन तपासणीचे कवित्व संपलेले नसतानाच पेपरफुटीचे प्रकरण उजेडात आले आहे. विद्यापीठाने आपल्या १५०व्या वर्षांत पदार्पण करताना ‘गौरवशाली’ इतिहास, परंपरेचा वारसा सांगत कार्यक्रम केले. एकीकडे विद्यापीठ इतिहासाच्या स्मरणरंजनात गुंतलेले असताना उद्योगविश्वाने आपली भलतीच अडचण मांडली होती. विद्यापीठाच्या फॅक्टरीतून पदवी वगैरे घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी पुरेसे तयार नसतात. पदव्यांची गुंडाळी घेऊन बाहेर पडणाºया विद्यार्थ्यांचे कुशल मनुष्यबळात रूपांतर करण्यासाठी आम्हालाच परत त्यांना प्रशिक्षित करावे लागते. मग, पदवी किंवा अन्य अभ्यासक्र मांचा उपयोगच काय, असा रोकडा सवाल उद्योगविश्वाने उपस्थित केला होता. त्याला आता दहा वर्षे उलटली. पण, प्रश्न तसाच आहे. गेल्याच वर्षी ‘फिक्की’ या उद्योगविश्वातील अग्रणी संस्थेने एक अहवाल सादर केला. भविष्यातील रोजगारांच्या संधींचा वेध घेणाºया अहवालाने आपल्याकडील उच्चशिक्षणाची तकलादू अवस्था आणि त्याच्या ढिम्मपणावर चिंता व्यक्त केली होती. मात्र, गौरवशाली वारसा सांगत स्वत:ची पाठ थोपटून घेणाºया विद्यापीठाला दहा वर्षांत या समस्येकडे पाहावेसे वाटले नाही. १६० वर्षांच्या मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात एकाही कुलगुरूची हकालपट्टी झाली नव्हती. ती या वर्षी झाली इतकेच काय ते घडले. त्यातही विद्यापीठीय राजकारणाचा बेरकीपणा असा की आॅनलाइन तपासणीत जो काही गदारोळ झाला त्याला फक्त कुलगुरूच जबाबदार. त्यांची हकालपट्टी झाली म्हणजे आता विषय संपला. आॅनलाइन तपासणीची संकल्पना मांडणाºया संजय देशमुखांना त्याची कालबद्ध अंमलबजावणी करता आली नाही; म्हणून त्यांची संकल्पना चुकीची ठरत नाही. त्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅनलाइन तपासणीच्या गदारोळाला ‘इष्टापत्ती’ म्हटले आहे. विद्यापीठाच्या दगडी भिंतींआड जे बिनबोभाट सुरू होते ते आॅनलाइनमुळे उजेडात आले. शासनकर्त्यांनाही अचंबा वाटावा इतक्या गडबडी वर्षानुवर्षे होत होत्या. विद्यापीठाने स्वत:चा वारसा सांगायचा नसतो. त्यांनी ज्यांना घडविले त्यांच्या कर्तृत्वातून तो आपसूक मिरवला जातो. हे साधायचे असेल तर परीक्षा, पेपर, उत्तरपत्रिका आणि निकाल इतक्या लघुदृष्टीच्या विद्यापीठ प्रशासनाला जागे करावे लागेल. त्यापुढे पाहण्याची, त्यासाठी झटण्याची सवय आम्हाला लावून घ्यावी लागेल. तरच, अभिमान बाळगावा, वारसा सांगण्याजोगे विद्यापीठाकडे काही शिल्लक असेल. पेपरफुटीसह इतर प्रश्नांनीही विद्यापीठाला घेरले आहे. ते सर्व प्रश्न तातडीने सोडविले नाही, तर पदव्या वाटणाºया देशातील अनेक संस्थांपैकी एक एवढीच तिची ओळख असेल.