शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नशामुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 00:18 IST

आधुनिक समाजामध्ये नशा असणे ही एक फार मोठी समस्या बनली आहे. विशेष करून युवकवर्ग यास बळी पडत आहे ही बाब खूपच चिंता करायला लावणारी आहे. युवक हे समाजाचे आधारस्तंभ असतात. शेवटी नशेच्या कारणामुळे नष्ट होणाऱ्या तरुण पिढीचा अर्थ आहे समाजाचाच नाश.

- डॉ. भूषण कुमार उपाध्यायआधुनिक समाजामध्ये नशा असणे ही एक फार मोठी समस्या बनली आहे. विशेष करून युवकवर्ग यास बळी पडत आहे ही बाब खूपच चिंता करायला लावणारी आहे. युवक हे समाजाचे आधारस्तंभ असतात. शेवटी नशेच्या कारणामुळे नष्ट होणाऱ्या तरुण पिढीचा अर्थ आहे समाजाचाच नाश.नशा करण्याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत- मौज-मजा करण्यासाठी किंवा तणावातून मुक्त होण्यासाठी. नशेची ही दोन्ही कारणे या बाबीला सिद्ध करतात की नशा करणाºया व्यक्ती या कोणत्यातरी आनंद अथवा मस्तीच्या शोधात असतात. जोपर्यंत नशेची धुंदी असते, तो पर्यंत चांगले वाटते आणि ज्यावेळी नशेची धुंदी उतरून समाप्त होते, त्यावेळी त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये होणाºया रासायनिक बदलामुळे त्याला खूपच बेचैन वाटायला लागते आणि तो पुन्हा मादक पदार्थांकडे ओढला जातो. याप्रकारे नशा करणारी व्यक्ती एका चक्र व्यूहात फसली जाते ज्यातून त्याला बाहेर पडणे फारच अवघड असते. व्यसनमुक्तीकरिता अनेक प्रकारच्या समुपदेशनाच्या पद्धती प्रचलित आहेत आणि त्यासाठी अनेक प्रकारच्या औषधांचा देखील उपयोग केला जातो. तथापि या सर्व पद्धतींना मर्यादा आहेत. या भौतिक नशेच्या पदार्थां व्यतिरिक्त अन्य तीन व्यसन/नशेंचे वर्णन भारतीय शास्त्रांमध्ये मिळते. ते तीन व्यसन आहेत- धन, नाव आणि कामवासना. असे म्हटले जाते की ही तीन व्यसने फारच खतरनाक आणि व्यक्ती तसेच समाजासाठी धोक्याची आहेत. धन, नाव आणि कामवासना या तीन बाबींचासुद्धा उद्देश हा आनंद मिळविणे हाच आहे.भारतीय अध्यात्मशास्त्रानुसार मनुष्याची मूळ चेतना पूर्णपणे शुद्ध आणि निर्मळ आहे. जेव्हा मनुष्य या चेतनेमध्ये आपल्याला स्थापित करतो, तेव्हा त्याला अक्षय आनंद प्राप्त होतो. हा अंतर्मुखी आनंद कोणत्याही बाहेरील वस्तू किंवा अवस्थेवर निर्भर करत नाही. तो आपल्या आत असतो, त्याचा आपण केवळ अनुभव करतो. जेव्हा ध्यानाच्या पद्धतीद्वारा आपण आपल्या विचारांना नियंत्रित करून आपल्या मूळ स्वरूपात आपल्याला स्थापित करतो, तेव्हा आपल्याला त्या परम आनंदाचा अनुभव होतो. शेवटी अध्यात्मशास्त्राचा उपयोग व्यसनमुक्तीमध्ये खूपच होऊ शकतो. जेव्हा मनुष्याला आतमधून आनंद येऊ लागतो तेव्हा त्याला बाहेरील कृत्रिम आनंदाची आवश्यकता राहत नाही. शेवटी सुरुवातीच्या काळापासूनच लहान मुले किंवा युवकांना अध्यात्माकडे आकर्षित करून त्यांना या राक्षसी वृत्तीपासून वाचवू शकतो. अध्यात्म हे मुळात कोणत्याही विशिष्ट उपासना पद्धतीशी संबंधित नाही.

टॅग्स :newsबातम्या