शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नशामुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 00:18 IST

आधुनिक समाजामध्ये नशा असणे ही एक फार मोठी समस्या बनली आहे. विशेष करून युवकवर्ग यास बळी पडत आहे ही बाब खूपच चिंता करायला लावणारी आहे. युवक हे समाजाचे आधारस्तंभ असतात. शेवटी नशेच्या कारणामुळे नष्ट होणाऱ्या तरुण पिढीचा अर्थ आहे समाजाचाच नाश.

- डॉ. भूषण कुमार उपाध्यायआधुनिक समाजामध्ये नशा असणे ही एक फार मोठी समस्या बनली आहे. विशेष करून युवकवर्ग यास बळी पडत आहे ही बाब खूपच चिंता करायला लावणारी आहे. युवक हे समाजाचे आधारस्तंभ असतात. शेवटी नशेच्या कारणामुळे नष्ट होणाऱ्या तरुण पिढीचा अर्थ आहे समाजाचाच नाश.नशा करण्याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत- मौज-मजा करण्यासाठी किंवा तणावातून मुक्त होण्यासाठी. नशेची ही दोन्ही कारणे या बाबीला सिद्ध करतात की नशा करणाºया व्यक्ती या कोणत्यातरी आनंद अथवा मस्तीच्या शोधात असतात. जोपर्यंत नशेची धुंदी असते, तो पर्यंत चांगले वाटते आणि ज्यावेळी नशेची धुंदी उतरून समाप्त होते, त्यावेळी त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये होणाºया रासायनिक बदलामुळे त्याला खूपच बेचैन वाटायला लागते आणि तो पुन्हा मादक पदार्थांकडे ओढला जातो. याप्रकारे नशा करणारी व्यक्ती एका चक्र व्यूहात फसली जाते ज्यातून त्याला बाहेर पडणे फारच अवघड असते. व्यसनमुक्तीकरिता अनेक प्रकारच्या समुपदेशनाच्या पद्धती प्रचलित आहेत आणि त्यासाठी अनेक प्रकारच्या औषधांचा देखील उपयोग केला जातो. तथापि या सर्व पद्धतींना मर्यादा आहेत. या भौतिक नशेच्या पदार्थां व्यतिरिक्त अन्य तीन व्यसन/नशेंचे वर्णन भारतीय शास्त्रांमध्ये मिळते. ते तीन व्यसन आहेत- धन, नाव आणि कामवासना. असे म्हटले जाते की ही तीन व्यसने फारच खतरनाक आणि व्यक्ती तसेच समाजासाठी धोक्याची आहेत. धन, नाव आणि कामवासना या तीन बाबींचासुद्धा उद्देश हा आनंद मिळविणे हाच आहे.भारतीय अध्यात्मशास्त्रानुसार मनुष्याची मूळ चेतना पूर्णपणे शुद्ध आणि निर्मळ आहे. जेव्हा मनुष्य या चेतनेमध्ये आपल्याला स्थापित करतो, तेव्हा त्याला अक्षय आनंद प्राप्त होतो. हा अंतर्मुखी आनंद कोणत्याही बाहेरील वस्तू किंवा अवस्थेवर निर्भर करत नाही. तो आपल्या आत असतो, त्याचा आपण केवळ अनुभव करतो. जेव्हा ध्यानाच्या पद्धतीद्वारा आपण आपल्या विचारांना नियंत्रित करून आपल्या मूळ स्वरूपात आपल्याला स्थापित करतो, तेव्हा आपल्याला त्या परम आनंदाचा अनुभव होतो. शेवटी अध्यात्मशास्त्राचा उपयोग व्यसनमुक्तीमध्ये खूपच होऊ शकतो. जेव्हा मनुष्याला आतमधून आनंद येऊ लागतो तेव्हा त्याला बाहेरील कृत्रिम आनंदाची आवश्यकता राहत नाही. शेवटी सुरुवातीच्या काळापासूनच लहान मुले किंवा युवकांना अध्यात्माकडे आकर्षित करून त्यांना या राक्षसी वृत्तीपासून वाचवू शकतो. अध्यात्म हे मुळात कोणत्याही विशिष्ट उपासना पद्धतीशी संबंधित नाही.

टॅग्स :newsबातम्या