शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचा फेरा

By admin | Updated: November 21, 2014 00:48 IST

गेल्या तीन वर्षांत दुष्काळाने महाराष्ट्राची पाठ सोडलेली नाही. २०१२मध्ये अवर्षण झाले

गेल्या तीन वर्षांत दुष्काळाने महाराष्ट्राची पाठ सोडलेली नाही. २०१२मध्ये अवर्षण झाले, गेल्या वर्षी पाऊस आणि गारपिटीच्या मारात शेतकरी गारद झाला आणि या वर्षी पुन्हा एकदा अवर्षणाचा फटका बसला. या संकटाने महाराष्ट्रातील शेतकरी होरपळून गेला आहे. सरकारने अजून दुष्काळ जाहीर केलेला नाही. त्यांनी दुष्काळातही फरक केला आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष नाही, असे सरकारचे मत असल्याने या वर्षीचा दुष्काळ हा ‘शेतीचा दुष्काळ’ आहे, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले. खरे म्हणजे हा शब्दच्छल आहे. त्यामुळे परिस्थितीत थोडाच फरक पडेल? कालच औरंगाबादला विभागीय बैठक झाली आणि मार्चपर्यंत पाण्यासाठी ५०० टँकर लागतील, असा अंदाज व्यक्त झाला. आज खडसे म्हणतात तो ‘अ‍ॅग्रिकल्चरल ड्राऊट’ उद्या दोन-चार महिन्यांत परिपूर्ण दुष्काळामध्ये रूपांतरित होईल. शब्दच्छलच करायचा तर त्याला परिपूर्ण दुष्काळ म्हणू या. महाराष्ट्रात सरकार नवे आहे. अजून ते पुरते स्थिरावलेले नाही. मधुचंद्राचा काळ म्हणावा तर कालच पवारांनी गुगली टाकली आणि आम्ही विरोधात बसणार, असा ताठा उद्धव ठाकरेंनी दाखविला. त्यामुळे हनिमून मूडमध्ये असणारे सरकार गोंधळले. धड आनंदही साजरा करता येत नाही, घड्याळाच्या टिक्टिक्वर नाडी पाहण्यासारखी गत म्हणावी. अशातच दुष्काळाची जाणीव झाली ती यासाठी, की दुष्काळ उंबरठ्यावर आला हे सरकारला आता कळले. सरकार नवीन असले तरी प्रशासकीय यंत्रणा पूर्वीचीच आहे, ती काय करीत होती? जूनपासून बिघडत चाललेल्या परिस्थितीचा अंदाज या यंत्रणेला आला नाही का? ठोकळेबाज कार्यपद्धतीत नजर पैसेवारी, प्रत्यक्ष पाहणी, असे सोपस्कार करीत राहिले. राज्यातील १९,०५९ गावांतील पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे; पण हे ठरविताना आधार कोणता तर तलाठी. तलाठी आता शेतात जाऊन पाहणी करतो का, हा प्रश्नच आहे. मुळातच तलाठी गावात येतो का, येथून खरा प्रश्न सुरू होतो. गावातील जमीन महसुलाचे दफ्तर खासगी मदतनिसाच्या ताब्यात आहे. तलाठ्याचे कामही खासगी यंत्रणा करते. टंचाईग्रस्त गावांची संख्या यापेक्षा निश्चित मोठी आहे. दुसरा मुद्दा पावसाच्या नोंदीचा. ही नोंद प्रमाण कशी मानाचयी? शिवाय लहरी पावसाने वेगळीच समस्या निर्माण केली. तालुक्याच्या काही भागात तो बरसला आणि काही भाग कोरडा ठेवला. तालुक्याच्या सरासरीने मात्र चांगली नोंद गाठली; पण ज्या भागात पाऊस पडला नाही, तेथे दुष्काळी स्थिती आहे. याचा नव्याने विचार झाला पाहिजे. काही भागात पीक आले; पण त्याचा उतारा पार घसरला म्हणजे मुद्दलसुद्धा हाती आले नाही. त्यांचे काय करायचे, हाही प्रश्नच आहे. ‘अ‍ॅग्रिकल्चरल ड्राऊट’ हा पीक आलेच नाही या निकषावर मोजणार की पीक हातात पडले नाही, हा निकष ग्राह्य धरणार? हा धराधरीचा खेळ खेळताना दिवसामाजी परिस्थिती गंभीर होत जात आहे. १९९४मध्ये दुष्काळी परिस्थितीचा निकष ठरविताना सुब्रह्मण्यम समितीने महाराष्ट्रातील ९४ तालुके कायम अवर्षणग्रस्त ठरविले होते. याला आता २० वर्षे होऊन गेली. अवर्षणग्रस्त तालुक्यांच्या विकासाचा आराखडाही तयार करण्यात आला होता; परंतु यांपैकी एकही तालुका दुष्काळाचा सामना करण्याइतपत सक्षम झालेला नाही. यानंतर बरेच दुष्काळ पडले. निधीही खर्च झाला; पण तो कारणी लागलेला नाही. ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात औरंगाबाद जिल्ह्यात पाहणी केली असता, फार विदारक चित्र आहे. दुष्काळाच्या या माऱ्याने शेतकरी पार रस्त्यावर आला. देशोधडीला लागला. मजुरांचे लोंढे शहरातून दिसायला लागले. परिस्थिती एवढी वाईट असताना सरकारपर्यंत का पोहोचली नाही? महसूलमंत्री आता दौरा करणार आहेत. ‘ई-गव्हर्नन्स’च्या काळात असे दौरे बिनमहत्त्वाचे ठरतात. कारण सरकारी यंत्रणा इतकी अत्याधुनिक आहे, की सर्व काही मंत्रालयात बसूनच ठरवता येते. संगणकाची एक कळ दाबली, की सारे चित्र समोर असते. त्यामुळे दौरे हे गैरलागू आहेत. लोकांच्या भेटी होतील; पण त्या नंतर घेतल्या तरी चालतील. त्याअगोदर त्यांना दिलासा देणारे निर्णय घेऊन राबविणे आवश्यक आहे. दुष्काळाशी लढण्यासाठी दीड हजार कोटींची गरज आहे, असे सरकार म्हणते; पण हे पैसे दुष्काळ निवारणार्थ कारणी लागले पाहिजेत, नसता काही लोकांसाठी दुष्काळ ही पर्वणी ठरावी. चारा छावण्या, दुष्काळी कामे यांतून अनेक जण पिढ्यांचे कोटकल्याण करतात. आजवर हेच झाले आहे. दुष्काळाच्या निधीला या घुशींपासून सांभाळावे लागेल. त्याचबरोबर, सरकारी यंत्रणा नावाचा सुस्त अजगर गतिमान करावा लागेल. हे नव्या सरकारसमोर आव्हान आहे.