शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

ठिबकच्या नळीतून निधीचे सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:26 IST

खूप पाणी पिणाऱ्या उसाच्या लागवडीसाठी सरकारने आता ठिबक सिंचन सक्तीचे केले. हा निर्णय ऐकून ‘दिल बाग बाग हो गया.’ सगळीकडे हिरवळ दाटल्याचे चित्र

खूप पाणी पिणाऱ्या उसाच्या लागवडीसाठी सरकारने आता ठिबक सिंचन सक्तीचे केले. हा निर्णय ऐकून ‘दिल बाग बाग हो गया.’ सगळीकडे हिरवळ दाटल्याचे चित्र डोळ्यासमोर तरळले. दुष्काळाने पिचलेल्या विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवरही हिरवळ आली. कृषिमंत्री फुंडकरांनी कागदावर सांगितलेली ही योजनाच एवढी हुरळवून टाकणारी आहे की, शेतात विहीर नसणारा शेतकरीसुद्धा ठिबक सिंचनाच्या कर्जासाठी उतावीळ होईल. दोन टक्के व्याजाने कर्ज मिळणार असेल, तर कोणाला मोह होणार नाही? शेवटी ज्याच्या शिवारात उसाचा फड डोलतो त्या शेतकऱ्याची गावात वेगळीच वट असते. मग उसासाठी किती का पाणी लागेना, ते देण्याची त्याची तयारी असते. सरकारची ही योजना कागदावर सुबक दिसते. सव्वासात टक्के व्याजापैकी चार टक्के सरकार आणि सव्वाटक्का भार साखर कारखाने उचलणार असल्याने शेतकऱ्यांना अवघे दोन टक्के व्याज द्यावे लागेल. ठिबक सिंचनामुळे उसाची उत्पादकता २५ टक्क्यांनी वाढणार, तर विजेची ४० टक्के बचत होईल, असेही पाण्याबरोबरच्या बचतीचे स्वरूप आहे; परंतु जे कागदावर सुबक दिसते तेथे प्रत्यक्षात खाचखळगे असतात आणि ठिबकचे थेंब अडविण्यासाठी अनेक शुक्राचार्य आहेत. उसाची लागवड आणि उत्पादनाचा विचार करतेवेळी महाराष्ट्रातील साखर कारखानदारीकडे डोळसपणे पाहावे लागेल. साखरेचे उत्पादन १०५ लाख टनांवरून ४०.५० टनांवर आले. लहरी निसर्ग आणि पाणीटंचाई ही कारणे असली तरी साखर कारखान्यांची संख्या ४० वरून ७० वर पोहोचली. ४० साखर कारखान्यांचा तोटा १,२२३ कोटींवरून वाढत २,४४२ कोटींवर पोहोचला. ही कारखानदारी नुसतीच अडचणीत नाही, तर बुडण्याच्या बेतात आहे. उसाला भाव देता येत नाही, हे वास्तव आहे. सहकारी कारखान्यांची ही अवस्था असल्याने अनेक कारखाने मोडीत निघाले व त्यांची विक्री झाली. राजकीय नेत्यांनीच ते खरेदी केले आणि आता हे खासगी कारखाने नफ्यात चालताना दिसतात. उसाचे उत्पादन कमी होऊनही भाव मिळत नसताना ठिबक सिंचनामुळे क्षेत्र वाढले तर भाव मिळण्याची हमी नाही. म्हणजे ऊस लावल्यानंतर पैसा मिळणार नाही; पण पाणी तर वापरले जाणार. सरकारच्या या योजनेने उसाच्या क्षेत्रात निश्चितच वाढ होईल; परंतु ठिबकमुळे वाचणारे पाणी गरजू शेतकऱ्यांना मिळणार नाही यासाठी सरकारने जिल्हानिहाय उसाच्या क्षेत्रासाठी मर्यादा ठरविली पाहिजे. सव्वाटक्का व्याजाचा बोजा कारखान्यांवर पडणार असल्याने ते उसाची खरेदी कमी भावाने करतील. या योजनेतील आणखी एक चोरवाट अशी की, आज बाजारात ५० टक्के ब्रँडेड कंपन्यांचे आणि ५० टक्के स्थानिक कंपन्यांचे ठिंबक मिळते. ठिबक संचाचे उत्पादन, ते बसविणे आणि त्याची देखभाल, दुरुस्ती याचे व्यवस्थित नियोजन नाही आणि सरकारकडे पण तशी काही तयारी नाही. पाणी वाचविण्यासाठी दर्जेदार ठिबक संचच उपयुक्त ठरू शकतात. पुन्हा या पद्धतीचे मूल्यमापन आपण केलेले नाही. मुळात पाणी वापराची कार्यसंस्कृती आपल्याकडे नाही. इस्रायलमध्ये ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर होतो. कारण ती संस्कृती तेथे रुजलेली आहे. रात्रभर ठिबक संच सुरू ठेवणारे आपल्याकडे भरपूर असून, हे तंत्रज्ञान वापराकडे फॅशन म्हणून पाहिले जाते. सरसकट ठिबक सिंचन वापराचा निर्णय घेण्यापूर्वी तशी संस्कृती निर्माण करण्यासाठी लोकजागर करणे आवश्यक आहे; पण लोकप्रिय योजना जाहीर करण्यासाठी सगळीच सरकारे उतावीळ असतात. ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन सक्तीचे केले असले तरी या कायद्याची खरोखरच काटेकार अंमलबजावणी होणार आहे का? मराठवाडा, विदर्भात मुळातच पाणी कमी, गेल्यावर्षी पाऊस बरा होता, तर येथे उसाचे क्षेत्र वाढले होते, तर या भागात पाणी कोठून आणणार. यात आणखी एक गडबडीचे क्षेत्र आहे. ते ठिबकच्या नावावर कमी व्याजाचे कर्ज उचलण्याचा जुगाड कोणीही करू शकतो. यासाठी दुकानदाराशी साटेलोटे करून कागदावर खरेदी दाखवता येऊ शकते. पाच वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात ठिबक सिंचनाच्या अनुदानाचा कोट्यवधीचा घोटाळा झाला. त्या तालुक्यात जमीन नसणाऱ्याच्या नावे अनुदान उचलले गेले. सरकारी अधिकारी आणि ठिबक कंपन्यांची मिलीभगत यातून हा भ्रष्टाचार झाला. ऊस हे नगदी पीक असल्याने पाण्याची उपलब्धता असलेला शेतकरी तिकडे वळतो. रोजगाराचा विचार केला, तर उसासाठी शेतीत ८० ते ९० दिवासांचा रोजगार आहे. तुलनेने कापूस हे कमी कालावधी घेणारे, कमी पाणी लागणारे नगदी पीक आहे. कापसासाठी १२५ ते १५० दिवस रोजगार उपलब्ध होतो. उसाच्या तुलनेत कापूस फायदेशीर ठरतो. सत्तरच्या दशकात मतदारसंघात एक साखर कारखाना, एक महाविद्यालय, असा राजकारणाचा पॅटर्न प्रचलित झाला आणि महाराष्ट्रात साखर कारखान्यांचे पेव फुटले. पुढे राजकारणाचा हा पॅटर्न निकालात निघाला आणि कारखानदारीने आचके दिले. यातूनच उसाचे क्षेत्र वाढले. म्हणूनच फुंडकरांची योजना कागदावर आखीव-रेखीव असली तरी ठिबकच्या नळीची छिद्रे मोठी असल्याने त्यातून पाण्याऐवजी निधीचेच सिंचन होईल आणि पाणी आलेच, तर ते अडविण्यासाठी अनेक शुक्राचार्य आहेतच. शेवटी योजना कुणाच्या सिंचनासाठी हे महत्त्वाचे.