शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सपनों के सौदागर

By admin | Updated: December 30, 2015 02:45 IST

नितीन गडकरी यांनी मराठवाड्यातील रस्त्यांच्या छप्परफाड कामाचे भूमिपूजन करताना केलेली घोषणांची आतषबाजी पाहून तर मराठवाड्याचे डोळे एवढे दिपले, की डोळ्यांपुढे आलेल्या

- सुधीर महाजननितीन गडकरी यांनी मराठवाड्यातील रस्त्यांच्या छप्परफाड कामाचे भूमिपूजन करताना केलेली घोषणांची आतषबाजी पाहून तर मराठवाड्याचे डोळे एवढे दिपले, की डोळ्यांपुढे आलेल्या अंधारीने रस्त्यातील खड्डेही दिसत नाहीत. एवढे महामार्ग आणि उड्डाणपूल यांचा स्वप्नातसुद्धा कोणी विचार केला नव्हता. सरकारने जनतेची स्वप्नं साकार करायची असतात; पण जेव्हा सरकारच स्वप्नांचा बाजार मांडते त्यावेळी जनताही भूलभुलैयात अडकते. व्यक्तिमाहात्म्य आणि अनुदानाच्या जोरावर पोसल्या जाणाऱ्या लोकशाही देशात जनता या भूलभुलैयाला बळी पडण्याचीच शक्यता जास्त. मराठवाड्यातील जनता तर भोळी. ती कोणाच्याही आश्वासनामागे पळणारी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यातील रस्त्यांच्या छप्परफाड कामांचे भूमिपूजन करताना केलेली घोषणांची आतषबाजी पाहून तर मराठवाड्याचे डोळे एवढे दिपले, की डोळ्यांपुढे आलेल्या अंधारीने रस्त्यातील खड्डेही दिसत नाहीत. एवढे महामार्ग आणि उड्डाणपूल यांचा स्वप्नातसुद्धा कोणी विचार केला नव्हता. खड्ड्यांच्या रस्त्यांमध्ये वावरण्याची सवय झाल्यामुळे हे स्वप्न की वास्तव हे तपासण्यासाठी एकमेकाना चिमटे काढले असतील. शिवाय या घोषणांची पूर्तता झाली नाही तर फासावर लटकवा, असे गडकरी म्हणाले त्यावेळी सारी गर्दी गदगदली.गडकरींनी केलेल्या घोषणांकडे नजर टाकली, तर आकडे पाहूनच बुबुळे बाहेर येतात. महाराष्ट्रात दीड लाख कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी. औरंगाबाद जिल्ह्यात १८००० कोटी रुपयांची कामे. औरंगाबाद शहरासाठी ७०० कोटी आणि आणखी दीडशे कोटी रुपये देण्याची तयारी. चिकलठाणा-अहमदनगर नाका रस्त्यासाठी ४०० कोटी. शहरासाठी आणखी दोन उड्डाणपूल. घेशील किती दोहो करांनी अशी भांबावल्यासारखी अवस्था झाली आहे. आता रस्ते गुळगुळीत होणार, महामार्गांवर वेगाने वाहने धावणार, प्रवास सुखकर होणार अशा स्वप्नात लोक मश्गुल आहेत.रस्त्यांच्या कामासाठी कोट्यवधी-चुकले-अब्जावधी रुपये देण्याची घोषणा गडकरी करतात. प्रश्न असा आहे की, मराठवाडा दुष्काळाने होरपळत आहे. परिस्थितीची पाहणी केंद्रीय पथकाने केली. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून दोन महिने उलटले; पण केंद्राचा निधी दुष्काळ निवारणासाठी अजून मिळत नाही. महाराष्ट्राला सर्वात जास्त निधी केंद्राकडून आणू असे हिवाळी अधिवेशनापूर्वी आणि अधिवेशनातही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले. बाकीचे मंत्रीसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी प्रसंगानुसार याच घोषणेची री ओढत असतात; पण केंद्राने अजून काही दिले नाही आणि गडकरी इकडे अब्जावधी रुपयांच्या घोषणांची बरसात करतात. हा विरोधाभास का? दुष्काळासाठी दोन हजार कोटींची अपेक्षा. ही रक्कम तुलनेने फार नाही, तरी हाती पडत नाही. त्याचा परिणाम दुष्काळी कामे सुरू होण्यावर झाला. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी तर हा घोषणांचा पाऊस नव्हे, अशीही शंका येते. राज्य आणि केंद्रात भाजपाचेच सरकार असताना कथनी आणि करणीतील हा विरोधाभास दिसतो, त्यावेळी असे प्रश्न पडतात. गडकरींच्या घोषणा येथेच थांबल्या नाहीत, तर गोदावरी नदीतून नांदेड ते विशाखापट्टणम अशी जलवाहतूक सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यातून मराठवाड्यासाठी हक्काचे पाणी मिळविण्यासाठी दरवर्षी डोके आपटून घ्यावे लागते. ज्या गोदावरीतून जलवाहतुकीचे स्वप्न गडकरी दाखवितात ती कोरडी पडली. त्यात कागदी नौका सोडण्याइतके पाणी आहे. या नौकाही खडकावर आपटून फाटू शकतात.नजीकच्या काळात कोणत्याही निवडणुका नाहीत. असे असताना एवढ्या घोषणा का केल्या याचेही कोडे आहे, कारण या कोणत्याही कामाचा अजून प्रशासकीय आदेश निघालेला नाही. एक मात्र झाले, जालन्याचा ड्रायपोर्टचा कार्यक्रम असो, की औरंगाबादला झालेल्या रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनाचा, सगळीकडे भाजपाच वरचढ होती. शिवसेनेला नेहमीप्रमाणे सापत्न वागणूक होती. आता हे नवीन नाही. पण हे ठळकपणे जाणवत होते. गडकरी स्वप्न विकायला आले; पण दुष्काळी मराठवाड्याचा खिसा फाटका आहे.