शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नातू ओवैसीच्या मागे जाणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 14:45 IST

बाबासाहेब देशभक्त होते, धर्मपरिवर्तन केले तरी त्यांची या देशावरील निष्ठा अभंग राहिली. त्याचमुळे ते देशाचे पहिले कायदामंत्री व घटनेचे शिल्पकार झाले. सर्व जातीधर्मांच्या नागरिकांना मूलभूत अधिकार देण्याचे क्रांतिकारी पाऊलही त्यांनीच टाकले.

प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची युती म्हणजे दलित व मुसलमान यांची युती नव्हे. महाराष्ट्राबाहेरचा दलित समाज जसा आंबेडकरांसोबत नाही तसा हैदराबाद परिसराबाहेरचा मुसलमान समाजही ओवेसीच्या मागे नाही. मुळात या दोघांचेही नेतृत्व व पक्ष प्रादेशिकच आहेत. प्रकाश आंबेडकरांचा पक्ष हा बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाच्या नंतर झालेल्या अनेक शकलांपैकी एक आहे तर ओवेसी यांचा पक्ष निजामाच्या राज्यातील इत्तेहादुल मुसलमीन या पक्षाचा अवशेष मात्र आहे. रिपब्लिकन पक्ष पूर्वीही कधी स्वबळावर आपले उमेदवार निवडून आणू शकला नाही आणि ओवेसीच्या पक्षाचा मुस्लीमबहुल क्षेत्राबाहेर प्रभाव नाही. त्यामुळे त्यांची युती ही प्रत्यक्षात प्रादेशिक स्वरूपाची व हैदराबाद आणि महाराष्ट्राचा काही भाग वगळता देशात फार काही करू शकेल अशी नाही. त्यामुळे त्यांचे एकत्र येणेही राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. मात्र या काळात आंबेडकरांवर ओवेसी यांचा पडलेला व वाढत चाललेला प्रभाव चिंताजनक वाटावा असा आहे.

‘भारतातील जनतेवर वंदे मातरम् म्हणण्याची सक्ती नको’ हा त्यांचा आताचा अविचारी उद्गार तर त्यांच्याविषयी आस्था असणाऱ्यांनाही अस्वस्थ करणारा आहे. मुसलमान धर्माची एक आज्ञा अशी की त्यांनी अल्लाखेरीज इतरांसमोर नमायचे नसते. तरीही भारतातला मुसलमानांचा मोठा वर्ग राष्ट्रध्वजाला व भारतमातेला वंदन करीतच असतो. त्यामुळे त्यांच्या धर्मश्रद्धेला बाधा येते असे ते मानत नाहीत. मातृभूमीला वंदन करणे किंवा राष्ट्राच्या प्रतीकासमोर नतमस्तक होणे यात धर्म आडवा येत नाही. खरेतर, तो धर्माहून श्रेष्ठ असलेल्या राष्ट्र या संकल्पनेचा गौरव आहे. मुळात ही मागणी ओवेसी यांची आहे. तिला खतपाणी घालण्याचे काम अल्पसंख्याकांचा घाऊक द्वेष करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनीही केले आहे. पण हीच मागणी प्रकाश आंबेडकर करीत असतील तर ते ओवैसीच्याही पुढे व खाली गेले असे म्हणावे लागेल. प्रत्यक्ष घटनाकार असलेल्या बाबासाहेबांचा नातू अशी भूमिका घेत असेल तर तो प्रकार आंबेडकरांच्या थोरवीला व त्यांच्या राष्ट्रभक्तीलाही कमीपणा आणणारा आहे. कारण बाबासाहेब नेहमी म्हणायचे की, मी प्रथम भारतीय आहे़ त्यामुळे ओवेसीच्या घोषणेला पाठिंबा देऊन दलितांचे वर्ग आपल्या पाठीशी येतील असे प्रकाश आंबेडकरांना वाटत असेल तर तोही त्यांचा खुळेपणाच म्हणावा लागेल. आजच्या घटकेला देशातील दलितांचा सर्वांत मोठा वर्ग मायावतींच्या बसपासोबत आहे. त्याची कारणे दलितांमधील जातीभेदांत शोधावी लागत असली तरी मायावतींची बाबासाहेबांवरील निष्ठा संशयातीत आहे. त्यांनी आजवर कधी भाजपाशी तर कधी समाजवादी पक्षाशी युती केली. पण मुस्लीम धर्माचे एकांगी राजकारण करणाºया पक्षांशी वा नेत्यांशी स्वत:ला जुळवून घेणे त्यांना कधी मान्य झाले नाही. ओवैसीचा पक्ष एकेकाळी निजामाच्या राजवटीला पाठिंबा देणारा होता. तो पाकिस्तानची बाजू घेणाराही होता. भारतात दुहीचे राजकारण करण्याच्या हिंदुत्ववाद्यांच्या प्रयत्नांना मुसलमानांच्या बाजूने साथ देणाºयांतही तो आहे. त्यांना मुस्लीम समाजाचे अंधश्रद्ध राजकारण पुढेही चालवायचे आहे. संसदेत व अन्यत्र त्यांनी केलेली भाषणे पाहिली तरी हे लक्षात येण्याजोगे आहे. प्रकाश आंबेडकरांची परंपरा व वारसा तसा नाही.

बाबासाहेब देशभक्त होते, धर्मपरिवर्तन केले तरी त्यांची या देशावरील निष्ठा अभंग राहिली. त्याचमुळे ते देशाचे पहिले कायदामंत्री व घटनेचे शिल्पकार झाले. देशातील सर्व जातीधर्मांच्या नागरिकांना सारखे मूलभूत अधिकार देण्याचे क्रांतिकारी पाऊलही त्यांनीच टाकले. त्यांना राष्ट्रध्वज सन्माननीय वाटला व मातृभूमीही वंदनीय वाटली. या स्थितीत प्रकाश आंबेडकरांनी वंदे मातरम्ला विरोध करणे ही बाब ते बाबासाहेबांहूनही ओवैसीच्या व त्यांना ज्याचा वारसा लाभला त्या इत्तेहादुलच्या जवळ गेले असेच म्हणावे लागेल. त्यांच्यामागे महाराष्ट्रातला दलित समाजही फारसा नाही आणि जो आहे तोही त्यांची आताची भूमिका मान्य करणार नाही. कारण या देशातला दलितांचा वर्गही देशभक्त व मातृभूमीवर श्रद्धा ठेवणारा आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी