शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

रब्बीच्या आशेवर तरी पाणी फेरू नका साहेब!

By किरण अग्रवाल | Updated: November 5, 2023 12:06 IST

Agriculture : रात्र-रात्र शेतात काढण्याची वेळ येणार असेल तर वीज वितरण कंपनीचा प्रश्न म्हणून त्याकडे जिल्हा प्रशासनाला दुर्लक्ष करून चालणार नाही.

- किरण अग्रवाल

घरात दिवाळीच्या आनंदाचा माहोल असताना बळीराजाला रात्र शेतात जागून काढावी लागत आहे. विजेच्या वाढत्या भारनियमनामुळे रब्बीच्या पिकासाठी सिंचनाचा प्रश्न उपस्थित झाला असून, ऐन दिवाळीत या विषयावरून फटाके वाजू लागले आहेत, हे चिंतनीय आहे.

 

एकीकडे दिवाळी सणानिमित्तच्या उत्साहात आसमंत उजळून निघू पाहत असताना दुसरीकडे विजेचे भारनियमन व कमी व्होल्टेजच्या पुरवठ्यामुळे बळीराजाला ऐन सणासुदीच्या दिवसात रात्र-रात्र शेतात काढण्याची वेळ येणार असेल तर वीज वितरण कंपनीचा प्रश्न म्हणून त्याकडे जिल्हा प्रशासनाला दुर्लक्ष करून चालणार नाही.

 

शेतकरी बांधव सध्या रब्बीच्या हंगामात व्यस्त आहेत. पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगाम हातचा गेला. दुबार पेरणी करूनही अनेकांचा लागवड खर्चही निघेनासा झाला आहे. अशाही स्थितीत ऋण काढून सण साजरा करण्याची आपली मानसिकता असल्याने बळीराजा दिवाळी सणाच्या तयारीला लागला आहे. त्याची आशा आता रब्बीवर लागून आहे, पण रब्बीची पिके घेतानाही त्याला वीज भारनियमनाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी वीजपुरवठा होत असला तरी कमी होल्टेजमुळे वीज पंप चालतच नसल्याच्या समस्या येत आहेत, त्यामुळे बळीराजाला पुन्हा कपाळाला हात लावण्याची वेळ आली आहे.

पश्चिम वऱ्हाडात गहू, हरभरा, तूर, कापूस आदी पिकांची पेरणी झाली असून, त्यांना आता पाण्याची आवश्यकता आहे. कृषी सिंचनासाठी महावितरण आठ तास वीज देते हे कागदोपत्री खरे असले तरी, प्रत्यक्षात या वीजपुरवठ्यात येणारे अडथळे लपून राहिलेले नाहीत. दुसरे असे की, पुरवठ्यातील अडचणीव्यतिरिक्त सदर वीजपुरवठा हा रात्रीच्या वेळीच अधिक ठिकाणी होत असल्याने थंडीत कुडकुडत व वन्यप्राण्यांचा धोका पत्करून शेतकऱ्यांना शेतात रात्र काढावी लागत आहे. राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक नुकतेच बुलढाणा येथे येऊन गेले. तेथे वीज कंपन्यांच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यात सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत ४२ हजार कोटींची कामे सुरू असल्याचे सांगतानाच सौर कृषी वाहिनी योजनेतून शेतीसाठी दिवसा वीज मिळेल असेही ते म्हणाले, पण प्रत्यक्षात काय स्थिती आहे हे लोकप्रतिनिधींनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

वीजपुरवठ्यातील अडचणींमुळे रब्बीच्या आशेवर पाणी फेरले जाण्याच्या भीतीतून शेतकरी संतप्त झाले असून, जागोजागी आंदोलनेही सुरू झाली आहेत. कृषी सेवा केंद्र चालकांच्या बंदमुळे बसणारा फटका कमी म्हणून की काय, वीज वितरणातील फटकाही सहन करावा लागतो आहे. अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातील दुर्गवाडा उपकेंद्रावर धडकून निवेदन देण्यात आले असून, बाळापूर तालुका, तसेच व्याळा, खिरपुरी फिडरच्या तक्रारीही केल्या गेल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात चिखली येथे काँग्रेसने आंदोलन केले तर शहापूर, वहाळा, बोथा काझी आदी परिसरातील शेतकऱ्यांसह शिवसैनिकांनी खामगावच्या उपकार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात धडक देऊन अटाळी सब स्टेशनच्या गलथान कारभाराबद्दल निवेदन दिले. वाशिम जिल्ह्यात शेलूबाजारला शेतकऱ्यांनी महावितरणच्या विरोधात रास्ता रोको केला तर कामरगावच्या समस्याग्रस्तांनी वीज उपकेंद्रावर धडक देऊन कनिष्ठ अभियंत्याला धारेवर धरले. इतरही ठिकाणी असंतोष वाढीस लागताना दिसत आहे, त्याची वेळीच दखल घेतली जाणे गरजेचे आहे.

सारांशात, नैसर्गिक आपत्तींना इलाज नसतो; परंतु ज्या बाबी आपल्या हातच्या असतात म्हणजे प्रशासनाच्या अखत्यारीत असतात तेथे लक्ष देऊन व्यवस्था सुरळीत राहील असा प्रयत्न केला तर मानवनिर्मित अडचणी टाळता येतात. तसे होत नाही तेव्हा व्यवस्थेविरोधात रोष निर्माण होतो. एखाद्या विभागाच्या अशा अनियमिततेमुळे किंवा दुर्लक्षामुळे शासन व प्रशासनही अडचणीत सापडते. वीजपुरवठ्यातील अडचणीमुळे तशीच वेळ आता येऊन ठेपलेली असल्याने जिल्हा प्रशासनाने यात तातडीने लक्ष पुरविणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र