शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

जोकोविचच्या नादी लागू नका, लस घ्या, मुलांनाही द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 05:23 IST

जानेवारी २०२१ पासून जगात लसीकरण सुरू झाले नसते, तर कोविडमुळे आतापर्यंत जे मृत्यू झाले आहेत ते किमान पाचपटीने वाढले असते.

- डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंडसंपूर्ण जगात १० जानेवारी २०२२ पर्यंत ४७० कोटी लोकांना कोविड-१९ लसीचा एक डोस, तर ३९० कोटी लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. बूस्टर डोसची संख्या धरून जगभरात ९०० कोटी लसींचे डोस दिले गेले आहेत. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ४० % नागरिकांना दोन डोस मिळाले आहेत. दुर्दैवाने आफ्रिकन देश यामध्ये खूप मागे असून, तेथील १० % लोकसंख्येलासुद्धा अजूनही दोन डोस मिळालेले नाहीत. कदाचित आफ्रिकेतील लसीकरण इतर देशांसारखेच वेगाने झाले असते तर ओमायक्रॉनचा उद्रेक थांबविता आला असता.मात्र, ज्या वेगाने जगभरात लसीकरणाला प्रतिसाद मिळाला, त्याच वेगाने कोविडच्या लसीकरणाला विरोधही झाला आहे. याची सुरुवातच जगातील सर्वांत प्रगत समजल्या जाणाऱ्या अमेरिकेतून झाली. डिसेंबर २०२० पासूनच अमेरिकेत आणि नंतर युरोपमध्ये लसीकरणाला विरोध करणारे समूह तयार झाले. त्यांनी लसीबद्दलची चुकीची माहिती आणि गैरसमज लोकांच्यात पसरवायला सुरुवात केली. हळूहळू याचा प्रसार भारतामध्येसुद्धा झाला आणि त्यामुळेच मार्च २०२१ ते मे २०२१ आणि पुन्हा नोव्हेंबर २०२१ पासून भारतामधील लसीकरणाचा वेग कमी झाला.आता हा मुद्दा पुन्हा चर्चेला यायचे कारण म्हणजे युरोपमधील फ्रान्स, ऑस्ट्रिया आणि जर्मनी या देशांनी कोविड लसीकरण सक्तीचे केले, तर भारत सरकारने लसीकरण सक्तीचे असणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. प्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने टेनिस खेळण्यासाठी कोणतीही लस न घेतल्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने त्याची परतपाठवणी केल्याने लस-विरोधाचा हा मुद्दा सध्या चर्चेत आहे.लसीकरण- सक्तीच्या विरोधात युरोपात मोर्चे निघताहेत. फ्रान्स, जर्मनी आणि ऑस्ट्रियातले हे लोण आता इटली, स्पेन आणि इतर देशांत पसरले आहे. अमेरिकेत अनेक लसीकरणविरोधी समूह आहेतच. जानेवारी २०२१ पासून जगात लसीकरण सुरू झाले नसते, तर जगभरातील कोविडमुळे आतापर्यंत जे मृत्यू झाले आहेत, ते पाचपटीने वाढले असते. दुसऱ्या लाटेत ब्रिटनमध्ये एकेदिवशी सर्वोच्च म्हणजे ४० हजार कोविड रुग्णांची नोंद झाली होती आणि त्याच दिवशी मृत्यू होते १८०० आणि यातील ९५ % मृत्यू हे वृद्ध लोकांचे होते. त्यानंतर ब्रिटनमध्ये वेगाने लसीकरण झाले. जानेवारीच्या सुरुवातीला पुन्हा रुग्णसंख्या २,३०,००० पर्यंत पोहोचली. मात्र, त्यावेळी मृत्यू फक्त २०० नोंदवले गेले. म्हणजेच रुग्णसंख्या सहापटीने वाढूनही मृत्यू मात्र नऊ पटीने कमी झाले. हे शक्य झाले फक्त लसीकरणामुळे.भारतात दुसऱ्या लाटेत सर्वोच्च रुग्णसंख्या ४ लाख एवढी नोंदवली होती आणि सर्वोच्च मृत्यू ४००० होते. सध्याच्या तिसऱ्या लाटेत वेगाने रुग्णसंख्या वाढत असूनही मृत्यू मात्र दुसऱ्या लाटेच्या दहापट कमी नोंद होत आहेत. हासुद्धा लसीकरणाचाच फायदा आहे. याच वेगाने जर लसीकरण होत राहिले तर इथून पुढे येणाऱ्या सर्व लाटांमध्ये मृत्यूदर नगण्य राहील किंवा तीव्रतेची लाट येणारच नाही. त्याचबरोबर सर्वच लोकसंख्येला लसीच्या बूस्टर डोसची गरज लागणार नाही. अर्थात, लस घेतली तरी कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो; पण तो सौम्य प्रकारचा संसर्ग असेल आणि त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची गरज लागणार नाही. साधारणपणे सध्या जगभर हेच चित्र दिसत आहे. भारतात दोन वर्षांपासून सर्वच प्रकारची शैक्षणिक आस्थापने कमी-अधिक प्रमाणात बंद आहेत. याउलट सर्व युरोपियन देश, ब्रिटन, जपान, अमेरिका, कॅनडा या देशांत वेगाने लसीकरण करून लहान आणि मोठ्या मुलांच्या शाळा, कॉलेजेस आणि विद्यापीठे सुरळीत चालू ठेवून मुलांचे आणि तरुणांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले गेलेले नाही. त्यामुळे भारतीयांनी मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून स्वतःबरोबरच सरकारी नियमाप्रमाणे मुलांचेही लसीकरण करून घ्यावे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस