शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

डोन्ट अँग्री मी.. हमारे पास थोरले काका है!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 00:42 IST

‘सर्वांत भारी डायलॉग कुणाचा, शोधा,’ असा आदेश मिळताच नारद मुनी महाराष्ट्रात येऊन सगळ्या नेत्यांना भेटले. त्यांच्या कानी जे पडलं ते जस्संच्या तस्सं..

- सचिन जवळकोटे

अलीकडच्या काळात अनेक नवनवीन शब्द कानावर पडू लागल्यानं इंद्रदेव नारदमुनींना म्हणाले, ‘आज-काल मला दिल्लीतून दुटप्पीपणा तर मुंबईतून विश्वासघातकी असे शब्द वारंवार ऐकू येताहेत. हा काय प्रकार मुनी?’ हातातली वीणा झंकारत नारद उत्तरले, ‘सध्या भूतलावर दोन गट एकमेकांच्या जीवावर उठलेत, महाराज ! सारेच फिल्मी डायलॉगबाजी करण्यात रमलेत.’ 

  ‘अरे वा.. असं असेल तर सर्वांत भारी डायलॉग कुणाचा, शोध घ्या बघू.’ - महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून नारद भूतलावर पोहोचले. ‘गोकुळ’साठी पंचगंगेच्या किनारी कोल्हापुरी भाषेत भयंकर राडा सुरू असल्याचं त्यांना दिसलं. तिथल्या फ्लेक्सवरची अनोखी डायलॉगबाजीही भलताच टाइमपास करून गेली. बावड्यात बंटी भेटले. मुश्रीफांकडून येणारे तयार मेसेज वाचून ते मुन्नांवर टीकास्त्र सोडण्यात मग्न झालेले. म्हाडकांना संपविण्याच्या नादात बावडेकरांना कुणाकुणाशी जोडून घ्यावं लागतंय, हे पाहून मुनींनाही आश्चर्य वाटलं. 

मात्र ‘बंटीं’नी डायलॉग टाकला, ‘जिनके अपने घर शीशों के होते है, वो दुसरों पर पत्थर नहीं फेका करते.’  -त्यांना दाद देत मुनी साताऱ्याकडं सरकले. शशिकांत जावळीकरांकडं तिरका कटाक्ष टाकणाऱ्या धाकट्या राजेंचा आवाज कानी पडला, ‘मशवरा मत दो मुझे. मेरा वक्त खराब है.. दिमाग नही.’ 

दचकून मुनींनी ‘सुरुची’वरून ‘जलमंदिर’ गाठलं. तिथं थोरले राजे हातात ॲल्युमिनियम पात्र घेऊन नेहमीच्या स्टाईलमध्ये चुटकी वाजविण्यात रमलेले, ‘बर्तन खाली हो तो ये मत समझो, कि माँगने चला है. हो सकता है सब कुछ बांट के आया हो.’ त्यांच्या बोलण्यात रुबाब असला तरी खासदारकीच्या पोटनिवडणुकीचा सल होताच. 

डोकं खाजवत मुनी बारामतीच्या बंगल्याजवळ पोहोचले. आतमधून जोरात आवाज येऊ लागलेला, ‘डोन्ट अँग्री मी. आता माझी सटकली.’ मुनींनी ओळखलं, नक्कीच अजित दादांचा आवाज. एवढ्यात अजून एक संवाद कानावर आदळला, ‘कितने आदमी थे? वो दो थे.. और तुम तीन. फिर भी खाली हाथ वापस आए?’ 

- डायलॉगबाजी संपल्यानंतर ते तिघे बाहेर आले. संजयभाऊ यवतमाळकर, अनिलभाऊ नागपूरकर अन‌् धनंजयभाऊ परळीकर यांना पाहून नारदांनी ओळखलं की ‘वो दो’ म्हणजे नक्कीच ‘देवेंद्र नागपूरकर’ अन‌् चंदूदादा कोथरूडकर.’ धनुभाऊ खूपच शांत-शांत दिसत होते. त्यांना याचं कारण विचारताच चॅनलचे कॅमेरे नाहीत नां, हे पाहात त्यांनी हळूच सांगितलं, ‘मेरी खामोशी को मेरी हार मत समझना. मै कुछ फैसले उपरवाले पर छोड देता हूँ.’ 

बाजूला उभे असलेले अनिलभाऊ कदाचित सीबीआय भेटीत काय-काय घडलं, हे सांगण्यासाठी आलेले. मात्र त्यांनी चेहऱ्यावर उसनं हसू आणत डायलॉग फेकला, ‘हम भी वही है जो किसी के पीछे नही खडे होते. जहां खडे हो जाते है, लाईन वहीं से शुरू हो जाती है.. हे ऐकून त्यांच्या पाठीमागं उभारलेले दोन-चार मिनिस्टर घाईघाईनं बाजूला सरकले. ‘आपल्याला नाही बुवा राजीनामा द्यायचा,’ असं पुटपुटत दोघं झटकन् निघूनही गेले. 

 पुढं एका लसीकरण केंद्रावर उद्धो अन‌् देवेंद्र आपापला स्वतंत्र फौजफाटा घेऊन लोकांसमोर उभारलेले. ‘आम्हीच कशी लसीची सोय केलीय,’ असं ठणकावून सांगू लागलेले. तेवढ्यात मलिकभाई मध्येच कॅमेऱ्यासमोर येऊन ‘ही लस मीच फुकटमध्ये दिली बरं का,’ याची आठवण करून देऊ लागले. तेवढ्यात देवेंद्रनी डायलॉग मारला, ‘मेरे पास सेंट्रल गव्हर्नमेंट है. सीबीआय है. आयपीएस लॉबी है. तुम्हारे पास क्या है?’ - तेव्हा शांतपणे ‘बारामती’कडे बघत ‘उद्धो’ एकच वाक्य बोलले, ‘मेरे पास थोरले काका है.. नारायणऽऽ नारायणऽऽ  

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीHasan Mushrifहसन मुश्रीफ