शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अस्मितेचा बोलबाला

By admin | Updated: January 14, 2015 03:40 IST

मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली; पण आजही मराठवाड्याची प्रादेशिक अस्मिता कायम आहे

सुधीर महाजन - 

मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली; पण आजही मराठवाड्याची प्रादेशिक अस्मिता कायम आहे. ही भावनिक एकात्मता आठवण्याचे कारण म्हणजे सध्या मराठवाड्याचे विभाजन करून नवीन आयुक्तालय नांदेड येथे होणार, कारण अधिसूचना निघाली आहे. हे आयुक्तालय लातूरला व्हावे यासाठी विलासराव देशमुख आग्रही होते आणि त्यांची अशोक चव्हाणांशी स्पर्धा होती. विलासरावांच्या अकाली जाण्याने नांदेडचे पारडे जड झाले; पण वाद निर्माण न होता मराठवाडी अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी मराठवाड्याचे विभाजन न करता त्रिभाजन करावे, असा मार्ग तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी काढला होता. अंतर, लोकसंख्या आणि शहराची गुणवत्ता या मुद्यांवर नांदेडचे पारडे जड होते. या मुद्द्यावर आता नांदेडची अधिसूचना निघाली. यासंबंधी हरकती असल्यास त्या २ फेब्रुवारीपर्यंत मांडण्यात येतील; पण हे प्रकरण न्यायालयीन वादात अडकू नये यासाठी नांदेडकरांनी अगोदरच खबरदारी घेऊन डॉ. बालाजी कुंपलवार यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात कॅव्हेट दाखल केला आहे. लातूरकरसुद्धा तेवढेच आग्रही आहेत. जास्तीत जास्त हरकती पाठविण्याची मोहीम तिथे चालू आहे आणि जनमानस ढवळून निघत आहे. आयुक्तालय लातूरला होणार म्हणून त्यावेळी विलासरावांनी इमारतही बांधली. आज ती ‘आयुक्तालय’ या नावानेच ओळखली जाते. आमच्याकडे इमारत तयार असल्याने येथे झाल्यास सरकारला केवळ ५० कोटी खर्च येईल. नांदेडला गेले तर ३०० कोटी खर्चावे लागतील. आज लातूरमध्ये २२ विभागीय कार्यालये आहेत.एका आयुक्तालयावरून मराठवाड्याची प्रादेशिक अस्मिता पणाला लागल्याचे चित्र दोन्हीकडे दिसते. दोन्ही जिल्ह्यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविला. मराठवाड्याच्या विकासाच्या मुद्यावर एवढी प्रतिष्ठा कधी पणाला लावली जात नाही. तसे असते तर परवा नांदेड येथे रेल्वे मुद्यावर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत काही आग्रही भूमिका दिसली असती. एक तर ६७ वर्षांत मराठवाड्यात १ कि. मी. नवा मार्ग टाकला गेला नाही. सोलापूर-जळगाव हा प्रस्तावित मार्ग फायलीतून बाहेर येत नाही. रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण झालेले नाही. येणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी काही तरतूद करावी म्हणून ही बैठक होती; परंतु रावसाहेब दानवे व चंद्रकांत खैरे हे दोन सत्ताधारी खासदारच गैरहजर होते. मराठवाड्यासाठी मागणी करताना सर्वांनी एकत्र येऊन जोर लावला तर त्या प्रयत्नांना यश येईल; पण या महत्त्वाच्या बैठकीला असलेली गैरहजेरी विकासाविषयीची उदासीनता दर्शविते. एकीकडे हे चित्र असताना राजकारणाच्या पटलावर चंद्रकांत खैरे आणि त्यांच्याच पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या राजकीय भांडणाचा आणखी एक जाहीर कार्यक्रम औरंगाबादकरांनी अनुभवला. या दोघांमधून विस्तव जात नाही याचे पुन्हा दर्शन झाले, तेही त्यांच्या पक्षाचे पालकमंत्री रामदास कदम यांच्यासमोर! लोकसभा आणि विधानसभा निवडणुका संपल्या तरी शिवसेनेतील शिमगा मात्र चालू आहे. पाणी आणि रस्त्यामुळे त्रासलेल्या औरंगाबादकरांची तेवढीच करमणूक!राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांताचे महासंगम हा एक वेगळा अनुभव होता. मराठवाडा आणि खान्देशच्या ११ जिल्ह्यांतून यासाठी ५० हजार स्वयंसेवक आले होते. रटाळ राजकीय कार्यक्रमांच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महासंगमचे हे नेटके आणि शिस्तबद्ध नियोजन सर्वच राजकीय पक्षांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. या महासंगममध्ये सहभागी झालेल्या ५० हजारपैकी ७५ टक्के स्वयंसेवक हे तरुण होते, तर ४० टक्के स्वयंसेवक हे नव्यानेच जोडले गेले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात तरी शाखांची संख्या आणि तेथील उपस्थिती वाढली याचे हे दर्शक आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या दृष्टीने या अधिवेशनाला अधिक महत्त्व होते. या महासंगमचा लाभ भाजपा कसा उठवतो, हे येत्या काही दिवसांतच कळेल.