शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

डॉल्बी आणि घातक राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:54 IST

कोल्हापुरात गेल्या आठवडाभर डॉल्बीचा वाद चांगलाच तापला आहे. तशी कोल्हापूरच्या गणेशोत्सवाला पर्यावरणपूरक उत्सवाची तेजस्वी परंपरा आहे.

कोल्हापुरात गेल्या आठवडाभर डॉल्बीचा वाद चांगलाच तापला आहे. तशी कोल्हापूरच्या गणेशोत्सवाला पर्यावरणपूरक उत्सवाची तेजस्वी परंपरा आहे. उत्सवातील गुटख्याच्या जाहिरातींना व त्यायोगे होणा-या व्यसनांच्या प्रसाराला पहिल्यांदा कोल्हापूरनेच मूठमाती दिली. निर्माल्यदानाची मोहिमही याच जिल्ह्याने सुरू केली. जेव्हा ही मोहीम सुरू झाली तेव्हा सुरुवातीची काही वर्षे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना काही जण खुळ्यात काढत होते. परंतु त्यांनी घेतला वसा टाकला नाही व ही मोहीम नैतिक ताकदीच्या बळावर चालू ठेवली. त्याचा परिणाम असा झाला की आता प्रतिवर्षी शेकडो टन निर्माल्य नदीच्या काठावर जमा होते व पंचगंगा नदीसह अनेक नद्या व नाल्यांची या प्रदूषणापासून मुक्तता झाली. या यशानंतर कोल्हापुरात मूर्तिदान करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यालाही लोकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. म्हणजे लोकांना हा मांगल्याचा उत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होऊ नये याचे भान आले आहे. समाजातील हा बदल स्वागतार्ह आहे. या पार्श्वभूमीवर या उत्सवाला विधायक वळण द्यावे यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यंदा गणेशोत्सवातून डॉल्बी हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी काही निर्बंध घातले आहेत. त्याची अंमलबजावणी व्हावी व हा उत्सव डॉल्बीमुक्त व्हावा, असा आग्रह पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी धरला आहे. त्यांची भूमिका योग्यच आहे. त्यामुळे त्यांच्या डॉल्बीमुक्तीच्या मोहिमेस कोल्हापूरकरांनीच पाठबळ देण्याची गरज आहे. परंतु निव्वळ राजकीय फायद्याचा विचार करून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासारखे काही लोकप्रतिनिधीच त्यात खोडा घालत आहेत. तुम्ही हिंदूंच्या सणावेळीच असे निर्बंध का घालता, अशी विचारणा करून ते हा पर्यावरणाशी संबंधित विषय भलतीकडेच नेऊ पाहत आहेत. कोल्हापुरातील कायदा व सुव्यवस्था अगोदर सुधारावी मगच पोलिसांनी डॉल्बीस विरोध करावा, असाही प्रतिवाद त्यांच्याकडून करण्यात येत आहे. एका चांगल्या कामात पायात पाय घालण्याचे राजकारण शिवसेना करीत आहे. भाजप- शिवसेनेतील अंतर्गत कुरघोडीचे राजकारणही यास कारणीभूत आहे. राजकारणांवेळी जरूर राजकारण करावे, परंतु काही सामाजिक प्रश्नांत आपले लोकप्रतिनिधी व्यापक समाजहित डोळ्यासमोर ठेवून कधी भूमिका घेणार हाच खरा प्रश्न आहे. ती तशी घेतली जात नाही म्हणूनच अनेक सोपे प्रश्न अवघड बनत आहेत. त्यामुळे आता खरी जबाबदारी कोल्हापूरकर सामान्य माणसाचीच आहे. त्यांनीच पालकमंत्री पाटील यांच्या भूमिकेस बळ दिले तर कोल्हापूरच्या पुरोगामी परंपरेचा तो विजय ठरेल.