शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
3
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
4
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
5
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
6
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
7
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
8
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
9
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
10
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
11
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
12
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
13
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
14
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
15
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
16
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
18
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
19
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
20
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्बी आणि घातक राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:54 IST

कोल्हापुरात गेल्या आठवडाभर डॉल्बीचा वाद चांगलाच तापला आहे. तशी कोल्हापूरच्या गणेशोत्सवाला पर्यावरणपूरक उत्सवाची तेजस्वी परंपरा आहे.

कोल्हापुरात गेल्या आठवडाभर डॉल्बीचा वाद चांगलाच तापला आहे. तशी कोल्हापूरच्या गणेशोत्सवाला पर्यावरणपूरक उत्सवाची तेजस्वी परंपरा आहे. उत्सवातील गुटख्याच्या जाहिरातींना व त्यायोगे होणा-या व्यसनांच्या प्रसाराला पहिल्यांदा कोल्हापूरनेच मूठमाती दिली. निर्माल्यदानाची मोहिमही याच जिल्ह्याने सुरू केली. जेव्हा ही मोहीम सुरू झाली तेव्हा सुरुवातीची काही वर्षे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना काही जण खुळ्यात काढत होते. परंतु त्यांनी घेतला वसा टाकला नाही व ही मोहीम नैतिक ताकदीच्या बळावर चालू ठेवली. त्याचा परिणाम असा झाला की आता प्रतिवर्षी शेकडो टन निर्माल्य नदीच्या काठावर जमा होते व पंचगंगा नदीसह अनेक नद्या व नाल्यांची या प्रदूषणापासून मुक्तता झाली. या यशानंतर कोल्हापुरात मूर्तिदान करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यालाही लोकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. म्हणजे लोकांना हा मांगल्याचा उत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होऊ नये याचे भान आले आहे. समाजातील हा बदल स्वागतार्ह आहे. या पार्श्वभूमीवर या उत्सवाला विधायक वळण द्यावे यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यंदा गणेशोत्सवातून डॉल्बी हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी काही निर्बंध घातले आहेत. त्याची अंमलबजावणी व्हावी व हा उत्सव डॉल्बीमुक्त व्हावा, असा आग्रह पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी धरला आहे. त्यांची भूमिका योग्यच आहे. त्यामुळे त्यांच्या डॉल्बीमुक्तीच्या मोहिमेस कोल्हापूरकरांनीच पाठबळ देण्याची गरज आहे. परंतु निव्वळ राजकीय फायद्याचा विचार करून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासारखे काही लोकप्रतिनिधीच त्यात खोडा घालत आहेत. तुम्ही हिंदूंच्या सणावेळीच असे निर्बंध का घालता, अशी विचारणा करून ते हा पर्यावरणाशी संबंधित विषय भलतीकडेच नेऊ पाहत आहेत. कोल्हापुरातील कायदा व सुव्यवस्था अगोदर सुधारावी मगच पोलिसांनी डॉल्बीस विरोध करावा, असाही प्रतिवाद त्यांच्याकडून करण्यात येत आहे. एका चांगल्या कामात पायात पाय घालण्याचे राजकारण शिवसेना करीत आहे. भाजप- शिवसेनेतील अंतर्गत कुरघोडीचे राजकारणही यास कारणीभूत आहे. राजकारणांवेळी जरूर राजकारण करावे, परंतु काही सामाजिक प्रश्नांत आपले लोकप्रतिनिधी व्यापक समाजहित डोळ्यासमोर ठेवून कधी भूमिका घेणार हाच खरा प्रश्न आहे. ती तशी घेतली जात नाही म्हणूनच अनेक सोपे प्रश्न अवघड बनत आहेत. त्यामुळे आता खरी जबाबदारी कोल्हापूरकर सामान्य माणसाचीच आहे. त्यांनीच पालकमंत्री पाटील यांच्या भूमिकेस बळ दिले तर कोल्हापूरच्या पुरोगामी परंपरेचा तो विजय ठरेल.