शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

डॉल्बी आणि घातक राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:54 IST

कोल्हापुरात गेल्या आठवडाभर डॉल्बीचा वाद चांगलाच तापला आहे. तशी कोल्हापूरच्या गणेशोत्सवाला पर्यावरणपूरक उत्सवाची तेजस्वी परंपरा आहे.

कोल्हापुरात गेल्या आठवडाभर डॉल्बीचा वाद चांगलाच तापला आहे. तशी कोल्हापूरच्या गणेशोत्सवाला पर्यावरणपूरक उत्सवाची तेजस्वी परंपरा आहे. उत्सवातील गुटख्याच्या जाहिरातींना व त्यायोगे होणा-या व्यसनांच्या प्रसाराला पहिल्यांदा कोल्हापूरनेच मूठमाती दिली. निर्माल्यदानाची मोहिमही याच जिल्ह्याने सुरू केली. जेव्हा ही मोहीम सुरू झाली तेव्हा सुरुवातीची काही वर्षे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना काही जण खुळ्यात काढत होते. परंतु त्यांनी घेतला वसा टाकला नाही व ही मोहीम नैतिक ताकदीच्या बळावर चालू ठेवली. त्याचा परिणाम असा झाला की आता प्रतिवर्षी शेकडो टन निर्माल्य नदीच्या काठावर जमा होते व पंचगंगा नदीसह अनेक नद्या व नाल्यांची या प्रदूषणापासून मुक्तता झाली. या यशानंतर कोल्हापुरात मूर्तिदान करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यालाही लोकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. म्हणजे लोकांना हा मांगल्याचा उत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होऊ नये याचे भान आले आहे. समाजातील हा बदल स्वागतार्ह आहे. या पार्श्वभूमीवर या उत्सवाला विधायक वळण द्यावे यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यंदा गणेशोत्सवातून डॉल्बी हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी काही निर्बंध घातले आहेत. त्याची अंमलबजावणी व्हावी व हा उत्सव डॉल्बीमुक्त व्हावा, असा आग्रह पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी धरला आहे. त्यांची भूमिका योग्यच आहे. त्यामुळे त्यांच्या डॉल्बीमुक्तीच्या मोहिमेस कोल्हापूरकरांनीच पाठबळ देण्याची गरज आहे. परंतु निव्वळ राजकीय फायद्याचा विचार करून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासारखे काही लोकप्रतिनिधीच त्यात खोडा घालत आहेत. तुम्ही हिंदूंच्या सणावेळीच असे निर्बंध का घालता, अशी विचारणा करून ते हा पर्यावरणाशी संबंधित विषय भलतीकडेच नेऊ पाहत आहेत. कोल्हापुरातील कायदा व सुव्यवस्था अगोदर सुधारावी मगच पोलिसांनी डॉल्बीस विरोध करावा, असाही प्रतिवाद त्यांच्याकडून करण्यात येत आहे. एका चांगल्या कामात पायात पाय घालण्याचे राजकारण शिवसेना करीत आहे. भाजप- शिवसेनेतील अंतर्गत कुरघोडीचे राजकारणही यास कारणीभूत आहे. राजकारणांवेळी जरूर राजकारण करावे, परंतु काही सामाजिक प्रश्नांत आपले लोकप्रतिनिधी व्यापक समाजहित डोळ्यासमोर ठेवून कधी भूमिका घेणार हाच खरा प्रश्न आहे. ती तशी घेतली जात नाही म्हणूनच अनेक सोपे प्रश्न अवघड बनत आहेत. त्यामुळे आता खरी जबाबदारी कोल्हापूरकर सामान्य माणसाचीच आहे. त्यांनीच पालकमंत्री पाटील यांच्या भूमिकेस बळ दिले तर कोल्हापूरच्या पुरोगामी परंपरेचा तो विजय ठरेल.