शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

रोज काळा धूर तुमच्या श्वासात मिसळतोय?; प्रदूषणापासून दूर पळू नका, प्रदूषण करणंच टाळा!

By devendra darda | Updated: October 14, 2021 10:48 IST

Pollution: जगाच्या पाठीवर कुठेही  जा, प्रदूषण  पाठ सोडत नाही.  घरात असा, घराबाहेर असा किंवा निसर्गाच्या सान्निध्यात, प्रदूषणाचा विळखा आपल्या पाठीशी असतोच. भारतातल्या दिल्लीसारख्या शहरानं तर प्रदूषणाचं शिखर गाठलं आहे. त्यामुळे अशावेळी काय करावं, याविषयीही लोक साशंक झाले आहेत.

>> देवेंद्र दर्डा, मॅनेजिंग डायरेक्टर, लोकमत

जगाच्या पाठीवर कुठेही जा, प्रदूषण पाठ सोडत नाही. घरात असा, घराबाहेर असा किंवा निसर्गाच्या सान्निध्यात, प्रदूषणाचा विळखा आपल्या पाठीशी असतोच. भारतातल्या दिल्लीसारख्या शहरानं तर प्रदूषणाचं शिखर गाठलं आहे. त्यामुळे अशावेळी काय करावं, याविषयीही लोक साशंक झाले आहेत. प्रदूषणाच्या भीतीपोटी स्वत:ला घरात कोंडून घ्यावं, तर, आरोग्याचे अनेक प्रश्न उभे राहतात, अन् घराबाहेर पडलं, तर, प्रदूषणाचे काळे ढग आयुष्य कमी करतात. 

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानं तर, एक भयानक सत्य उजेडात आणलं आहे. संशोधकांचं म्हणणं आहे, तीन वर्षं एखाद्या प्रदूषित शहरात राहिलात, तरी हृदयविकाराचा धोका खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. हार्ट ॲटॅक येण्याचा महिलांचा धोका तर, काही शहरात तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत गेल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. दुसरीकडे संशोधकांचा असाही कयास आहे की, जगभरात प्रदूषणविरहित शहरांची संख्या आता जवळपास नष्ट झाली आहे. प्रत्येक ठिकाणचं प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढतंच आहे. 

यासंदर्भात आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि दीर्घकाळ चाललेला असा अभ्यास डेन्मार्कच्या संशोधकांनी केला. त्यांनी सुमारे २२ हजार नर्सवर वीस वर्षे अभ्यास केला. त्यात शहरी आणि ग्रमाीण भागात राहाणाऱ्या, अशा दोन्ही प्रकारच्या महिलांचा समावेश होता. त्यांनी काही निष्कर्ष काढले. त्यानुसार प्रदूषणामुळे महिलांना हार्ट ॲटॅक येण्याचं प्रमाण पुरुषांपेक्षा खूपच जास्त आहे. ते सरासरी ४३ टक्क्यांपर्यंत जातं. गेल्या दशकात प्रदूषणाचं प्रमाण तर वाढलंच, पण, त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारा घातक परिणामही वाढला. रोज विषारी वायू शरीरात जात असल्यामुळे विस्मरण, डिमेन्शिया, लठ्ठपणा, प्रजनन अक्षमता तसंच इतरही अनेक रोगांची शिकार होण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात अनारोग्य वाढल्याचं कारणही प्रदूषण हेच आहे. 

हृदयविकारामुळे इतरही अवयव निकामी व्हायला लागतात. त्यामुळे थकवा येणं, खूप अशक्तपणा वाटणं, श्वास घ्यायला त्रास होणं, हे दृश्य परिणाम तर, दिसायला लागतातच, पण, अनेकांना लगेच लक्षातही येत नाहीत, अशा आजारांचं प्रमाणही वाढायला लागतं. आवाजाचं प्रदूषण, हवेचं आणि पाण्याचं प्रदूषण, वाहनांमुळे तसेच कारखान्यांमुळे होणारं प्रदूषण यामुळे आपल्या धमन्या आणि रक्तवाहिन्या कडक होतात. त्यात रक्ताच्या गुठळ्या होतात आणि त्यामुळे हार्ट ॲटॅकचा धोका वाढतो. दुसऱ्या एका संशोधनानुसार दहा लाख ब्रिटिश नागरिक आणि तीन कोटी अमेरिकन नागरिकांमध्ये प्रदूषणाचे विपरित परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर आढळून आले. त्यामुळे तिथेही हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. 

अनेकदा आवाजामुळे होणारं प्रदूषण आपल्या लक्षात येत नाही. कारण आपल्या कानांना त्याची सवय होत जाते, पण, सतत मोठ्या आवाजात बोलल्यामुळे, मोठा, कर्कश आवाज ऐकल्यामुळे, वाहनांच्या आणि हॉर्नच्या गोंगाटात वावरल्यामुळे आपली ऐकण्याची क्षमता तर, हळूहळू कमी होत जातेच, पण, अशा वातावरणात राहणाऱ्या माणसांचा स्वभावही रागीट, चिडचिडा होतो, असं संशोधकांना आढळून आलं आहे. कानठळ्या बसवणारा किंवा तीव्र आवाज सतत तुमच्या कानावर पडल्यानं तुमची झोपेची पातळीही खालावते. नीट, शांत झोप लागत नाही. अख्ख्या शरीरावर त्याचा ताण पडतो. हृदय आणि मेंदूवर त्याचा जास्त विपरित परिणाम होतो. त्यामुळेही हृदयविकाराचं प्रमाण वाढतं. 

संशोधकांचं म्हणणं आहे, प्रदूषणापासून वाचण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाणं, प्रदूषणापासून दूर राहाणं, शहरापेक्षा ग्रामीण भागाला पसंती देणं, असे उपाय जगभरातल्या नागरिकांनी सुरु केले असले, तरी त्याचाही उलटाच परिणाम होतो आहे. कारण ज्या जागा, जी स्थळं, जी गावं आधी प्रदूषणापासून मुक्त होती, तीही प्रदूषणानं घेरली जायला लागली आहेत. प्रदूषणापासून दूर पळणं हा त्यावरचा उपाय नाही, तर, प्रत्येकानं प्रदूषण टाळणं हाच त्यावरचा एकमेव उपाय आहे. महिलांना त्यापासून अधिकच काळजी घ्यावी लागेल. 

हात, खांद्यांचा हृदयाशी काय संबंध?

संशोधकांनी आणखीही एक महत्त्वाचा निष्कर्ष काढला आहे. हृदयविकाराचं मुख्य चिन्ह म्हणजे तुमच्या छातीत दुखणं. पण, विशेषत: महिलांच्या बाबतीत प्रत्येकवेळी हे लक्षण दिसेलच असं नाही. त्याऐवजी मान, जबडा, खांदे, पाठीचा वरचा भाग, पोट इत्यादी ठिकाणी दुखणं, अस्वस्थ वाटणं, श्वासोच्छवासाची गती वाढणं, एका किंवा दोन्ही हातांना वेदना होणं, नॉशिया येणं किंवा उलटी, मळमळ होणं, घाम येणं, चक्कर येणं, वारंवार थकवा येणं, अपचन होणं.. अशी कारणं दिसली तर?... संशोधकांचं म्हणणं आहे, ही कारणं ‘किरकोळ’ असल्याचं अनेक महिला मानतात, त्याकडे दुर्लक्ष करतात, पण, तेच त्यांच्या हृदयविकाराचंही कारण असू शकतं!.. त्यामुळे महिलांनो, आपल्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करणं टाळा.

टॅग्स :pollutionप्रदूषणHealthआरोग्य