शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

रोज काळा धूर तुमच्या श्वासात मिसळतोय?; प्रदूषणापासून दूर पळू नका, प्रदूषण करणंच टाळा!

By devendra darda | Updated: October 14, 2021 10:48 IST

Pollution: जगाच्या पाठीवर कुठेही  जा, प्रदूषण  पाठ सोडत नाही.  घरात असा, घराबाहेर असा किंवा निसर्गाच्या सान्निध्यात, प्रदूषणाचा विळखा आपल्या पाठीशी असतोच. भारतातल्या दिल्लीसारख्या शहरानं तर प्रदूषणाचं शिखर गाठलं आहे. त्यामुळे अशावेळी काय करावं, याविषयीही लोक साशंक झाले आहेत.

>> देवेंद्र दर्डा, मॅनेजिंग डायरेक्टर, लोकमत

जगाच्या पाठीवर कुठेही जा, प्रदूषण पाठ सोडत नाही. घरात असा, घराबाहेर असा किंवा निसर्गाच्या सान्निध्यात, प्रदूषणाचा विळखा आपल्या पाठीशी असतोच. भारतातल्या दिल्लीसारख्या शहरानं तर प्रदूषणाचं शिखर गाठलं आहे. त्यामुळे अशावेळी काय करावं, याविषयीही लोक साशंक झाले आहेत. प्रदूषणाच्या भीतीपोटी स्वत:ला घरात कोंडून घ्यावं, तर, आरोग्याचे अनेक प्रश्न उभे राहतात, अन् घराबाहेर पडलं, तर, प्रदूषणाचे काळे ढग आयुष्य कमी करतात. 

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानं तर, एक भयानक सत्य उजेडात आणलं आहे. संशोधकांचं म्हणणं आहे, तीन वर्षं एखाद्या प्रदूषित शहरात राहिलात, तरी हृदयविकाराचा धोका खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. हार्ट ॲटॅक येण्याचा महिलांचा धोका तर, काही शहरात तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत गेल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. दुसरीकडे संशोधकांचा असाही कयास आहे की, जगभरात प्रदूषणविरहित शहरांची संख्या आता जवळपास नष्ट झाली आहे. प्रत्येक ठिकाणचं प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढतंच आहे. 

यासंदर्भात आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि दीर्घकाळ चाललेला असा अभ्यास डेन्मार्कच्या संशोधकांनी केला. त्यांनी सुमारे २२ हजार नर्सवर वीस वर्षे अभ्यास केला. त्यात शहरी आणि ग्रमाीण भागात राहाणाऱ्या, अशा दोन्ही प्रकारच्या महिलांचा समावेश होता. त्यांनी काही निष्कर्ष काढले. त्यानुसार प्रदूषणामुळे महिलांना हार्ट ॲटॅक येण्याचं प्रमाण पुरुषांपेक्षा खूपच जास्त आहे. ते सरासरी ४३ टक्क्यांपर्यंत जातं. गेल्या दशकात प्रदूषणाचं प्रमाण तर वाढलंच, पण, त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारा घातक परिणामही वाढला. रोज विषारी वायू शरीरात जात असल्यामुळे विस्मरण, डिमेन्शिया, लठ्ठपणा, प्रजनन अक्षमता तसंच इतरही अनेक रोगांची शिकार होण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात अनारोग्य वाढल्याचं कारणही प्रदूषण हेच आहे. 

हृदयविकारामुळे इतरही अवयव निकामी व्हायला लागतात. त्यामुळे थकवा येणं, खूप अशक्तपणा वाटणं, श्वास घ्यायला त्रास होणं, हे दृश्य परिणाम तर, दिसायला लागतातच, पण, अनेकांना लगेच लक्षातही येत नाहीत, अशा आजारांचं प्रमाणही वाढायला लागतं. आवाजाचं प्रदूषण, हवेचं आणि पाण्याचं प्रदूषण, वाहनांमुळे तसेच कारखान्यांमुळे होणारं प्रदूषण यामुळे आपल्या धमन्या आणि रक्तवाहिन्या कडक होतात. त्यात रक्ताच्या गुठळ्या होतात आणि त्यामुळे हार्ट ॲटॅकचा धोका वाढतो. दुसऱ्या एका संशोधनानुसार दहा लाख ब्रिटिश नागरिक आणि तीन कोटी अमेरिकन नागरिकांमध्ये प्रदूषणाचे विपरित परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर आढळून आले. त्यामुळे तिथेही हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. 

अनेकदा आवाजामुळे होणारं प्रदूषण आपल्या लक्षात येत नाही. कारण आपल्या कानांना त्याची सवय होत जाते, पण, सतत मोठ्या आवाजात बोलल्यामुळे, मोठा, कर्कश आवाज ऐकल्यामुळे, वाहनांच्या आणि हॉर्नच्या गोंगाटात वावरल्यामुळे आपली ऐकण्याची क्षमता तर, हळूहळू कमी होत जातेच, पण, अशा वातावरणात राहणाऱ्या माणसांचा स्वभावही रागीट, चिडचिडा होतो, असं संशोधकांना आढळून आलं आहे. कानठळ्या बसवणारा किंवा तीव्र आवाज सतत तुमच्या कानावर पडल्यानं तुमची झोपेची पातळीही खालावते. नीट, शांत झोप लागत नाही. अख्ख्या शरीरावर त्याचा ताण पडतो. हृदय आणि मेंदूवर त्याचा जास्त विपरित परिणाम होतो. त्यामुळेही हृदयविकाराचं प्रमाण वाढतं. 

संशोधकांचं म्हणणं आहे, प्रदूषणापासून वाचण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाणं, प्रदूषणापासून दूर राहाणं, शहरापेक्षा ग्रामीण भागाला पसंती देणं, असे उपाय जगभरातल्या नागरिकांनी सुरु केले असले, तरी त्याचाही उलटाच परिणाम होतो आहे. कारण ज्या जागा, जी स्थळं, जी गावं आधी प्रदूषणापासून मुक्त होती, तीही प्रदूषणानं घेरली जायला लागली आहेत. प्रदूषणापासून दूर पळणं हा त्यावरचा उपाय नाही, तर, प्रत्येकानं प्रदूषण टाळणं हाच त्यावरचा एकमेव उपाय आहे. महिलांना त्यापासून अधिकच काळजी घ्यावी लागेल. 

हात, खांद्यांचा हृदयाशी काय संबंध?

संशोधकांनी आणखीही एक महत्त्वाचा निष्कर्ष काढला आहे. हृदयविकाराचं मुख्य चिन्ह म्हणजे तुमच्या छातीत दुखणं. पण, विशेषत: महिलांच्या बाबतीत प्रत्येकवेळी हे लक्षण दिसेलच असं नाही. त्याऐवजी मान, जबडा, खांदे, पाठीचा वरचा भाग, पोट इत्यादी ठिकाणी दुखणं, अस्वस्थ वाटणं, श्वासोच्छवासाची गती वाढणं, एका किंवा दोन्ही हातांना वेदना होणं, नॉशिया येणं किंवा उलटी, मळमळ होणं, घाम येणं, चक्कर येणं, वारंवार थकवा येणं, अपचन होणं.. अशी कारणं दिसली तर?... संशोधकांचं म्हणणं आहे, ही कारणं ‘किरकोळ’ असल्याचं अनेक महिला मानतात, त्याकडे दुर्लक्ष करतात, पण, तेच त्यांच्या हृदयविकाराचंही कारण असू शकतं!.. त्यामुळे महिलांनो, आपल्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करणं टाळा.

टॅग्स :pollutionप्रदूषणHealthआरोग्य