शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

मनाचिये गुंथी - पहिले उरले नाही

By admin | Updated: March 29, 2017 00:59 IST

‘कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ या गोविंदाग्रजांच्या कवितेच्या ओळीने माझ्या कैक रात्री जागविल्या आहेत़ ‘जगायचीपण

‘कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ या गोविंदाग्रजांच्या कवितेच्या ओळीने माझ्या कैक रात्री जागविल्या आहेत़ ‘जगायचीपण सक्ती आहे/ मरायचीपण सक्ती आहे’ ‘हा आमचा सक्तीचा काळ, भक्ती हरवलेला़’ ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’, राम नगरकरांच्या भूपाळीने मराठी माणूस जागा होई़ त्यातील सडासंमार्जन, धेनुचे हंबरणे, गाईच्या धारा सगळेच हरवले़ दर बुधवारी रात्री १० वाजता रेडिओवर लागणारी ‘आपली आवड’ - मराठी गीतांची ही मालिका म्हणजे कुटुंबातील सर्वांसाठी पर्वणी़ आवड उरली नाही़ आपलेपणाला तर तडेच गेले़ प्रवासात पळणाऱ्या झाडांचे सुखद दर्शन कोणीच घेत नाही कारण मुलेसुद्धा मोबाइलशी खेळण्यातच दंग़ तालेवार मामाने गाव केव्हाच सोडले़ तो मुंबईला राहतो चाळीत़ मामी नोकरी करते़ तिला कोणी आले गेलेले चालत नाही़ ती सुगरण आहे का नाही माहीत नाही़ कारण ती इडली, समोसा, पॅटीस, वडापाव गाड्यावरूनच मागवते़मी काही माझ्या आजी-आजोबांना पाहिले नाही़ आईची माया आणि वडिलांचा धाक मात्र अनुभवला आहे़ बाजारातून तयार पदार्थ विकत आणणे म्हणजे कमीपणाचे मानले जाई़ तो नऊवारी साडीचा काऴ नऊवारी साडी म्हणजे वात्सल्याची ऊब़ आजीच्या जीर्ण झालेल्या साड्यांची गोधडी म्हणजे नातवंडांसाठी अप्रूप़ भातवरण, भाजी, आमटी, चटणी, पोळी किंवा भाकरी एवढाच मेनू घरोघरी़ खवय्ये नावाचा प्राणी जन्मास आला नव्हता़ माणसे अन्नाविषयी तक्रार न करता तृप्तीची ढेकर देऊनच पानावरून उठत, आवडीनिवडीचे स्थान गौण होते़ पानात टाकण्याची मुभा कोणालाही नव्हती़ ‘खाऊन माज; पण पानात टाकून माजू नकोस’ हे घरोघरी ऐकायला मिळे़ संसार काटकसरीचा होता म्हणून संसारात सुख-शांती होती़ उधळपट्टीला थारा नव्हता़ सुख-दु:ख सारेच वाटून घेत़ माणसे शिकलेली नव्हती; पण फार समंजस होती़ मुली लाजायच्या, छोटी मुले दंगामस्ती करायची, वडील डोळे वटारायचे कधी कधी चड्डी ओली होईपर्यंत बडवायचे, आई चुका पदराआड घालायची़ दिवेलागणीला सारे घरी़ घराची म्हणून एक शिस्त होती़ दुसऱ्याचे घेणे म्हणजे गुन्हा होता़ पोलिसांचा धाक होता़ खाकी वेशातील पोलिसांना पाहून मुले घाबरत़ आता कोणीच कोणाला घाबरत नाही़ दृष्कृत्यापासून रोखत नाही़ मला काय त्याचे? एवढ्या बेपर्वाईने वागतात़ आदर्शाला मूठमाती आपण केव्हाच दिली आहे़ संस्काराची नाळ तोडूनच टाकली आहे़ ‘नाही कोण कोणाचा बापलेक मामा भाचा मग अर्थ काय?बेंबीचा विश्वचक्री’ ती बेंबी मात्र आदि मानवापासून अंतिम मानवापर्यंत राहणार आहे़ पहिले उरले नाही; पण बेंबी मात्र आहे पहिली आणि अंतिम़- डॉ. गोविंद काळे