शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

मनाचिये गुंथी - पहिले उरले नाही

By admin | Updated: March 29, 2017 00:59 IST

‘कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ या गोविंदाग्रजांच्या कवितेच्या ओळीने माझ्या कैक रात्री जागविल्या आहेत़ ‘जगायचीपण

‘कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ या गोविंदाग्रजांच्या कवितेच्या ओळीने माझ्या कैक रात्री जागविल्या आहेत़ ‘जगायचीपण सक्ती आहे/ मरायचीपण सक्ती आहे’ ‘हा आमचा सक्तीचा काळ, भक्ती हरवलेला़’ ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’, राम नगरकरांच्या भूपाळीने मराठी माणूस जागा होई़ त्यातील सडासंमार्जन, धेनुचे हंबरणे, गाईच्या धारा सगळेच हरवले़ दर बुधवारी रात्री १० वाजता रेडिओवर लागणारी ‘आपली आवड’ - मराठी गीतांची ही मालिका म्हणजे कुटुंबातील सर्वांसाठी पर्वणी़ आवड उरली नाही़ आपलेपणाला तर तडेच गेले़ प्रवासात पळणाऱ्या झाडांचे सुखद दर्शन कोणीच घेत नाही कारण मुलेसुद्धा मोबाइलशी खेळण्यातच दंग़ तालेवार मामाने गाव केव्हाच सोडले़ तो मुंबईला राहतो चाळीत़ मामी नोकरी करते़ तिला कोणी आले गेलेले चालत नाही़ ती सुगरण आहे का नाही माहीत नाही़ कारण ती इडली, समोसा, पॅटीस, वडापाव गाड्यावरूनच मागवते़मी काही माझ्या आजी-आजोबांना पाहिले नाही़ आईची माया आणि वडिलांचा धाक मात्र अनुभवला आहे़ बाजारातून तयार पदार्थ विकत आणणे म्हणजे कमीपणाचे मानले जाई़ तो नऊवारी साडीचा काऴ नऊवारी साडी म्हणजे वात्सल्याची ऊब़ आजीच्या जीर्ण झालेल्या साड्यांची गोधडी म्हणजे नातवंडांसाठी अप्रूप़ भातवरण, भाजी, आमटी, चटणी, पोळी किंवा भाकरी एवढाच मेनू घरोघरी़ खवय्ये नावाचा प्राणी जन्मास आला नव्हता़ माणसे अन्नाविषयी तक्रार न करता तृप्तीची ढेकर देऊनच पानावरून उठत, आवडीनिवडीचे स्थान गौण होते़ पानात टाकण्याची मुभा कोणालाही नव्हती़ ‘खाऊन माज; पण पानात टाकून माजू नकोस’ हे घरोघरी ऐकायला मिळे़ संसार काटकसरीचा होता म्हणून संसारात सुख-शांती होती़ उधळपट्टीला थारा नव्हता़ सुख-दु:ख सारेच वाटून घेत़ माणसे शिकलेली नव्हती; पण फार समंजस होती़ मुली लाजायच्या, छोटी मुले दंगामस्ती करायची, वडील डोळे वटारायचे कधी कधी चड्डी ओली होईपर्यंत बडवायचे, आई चुका पदराआड घालायची़ दिवेलागणीला सारे घरी़ घराची म्हणून एक शिस्त होती़ दुसऱ्याचे घेणे म्हणजे गुन्हा होता़ पोलिसांचा धाक होता़ खाकी वेशातील पोलिसांना पाहून मुले घाबरत़ आता कोणीच कोणाला घाबरत नाही़ दृष्कृत्यापासून रोखत नाही़ मला काय त्याचे? एवढ्या बेपर्वाईने वागतात़ आदर्शाला मूठमाती आपण केव्हाच दिली आहे़ संस्काराची नाळ तोडूनच टाकली आहे़ ‘नाही कोण कोणाचा बापलेक मामा भाचा मग अर्थ काय?बेंबीचा विश्वचक्री’ ती बेंबी मात्र आदि मानवापासून अंतिम मानवापर्यंत राहणार आहे़ पहिले उरले नाही; पण बेंबी मात्र आहे पहिली आणि अंतिम़- डॉ. गोविंद काळे