शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मनाचिये गुंथी - पहिले उरले नाही

By admin | Updated: March 29, 2017 00:59 IST

‘कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ या गोविंदाग्रजांच्या कवितेच्या ओळीने माझ्या कैक रात्री जागविल्या आहेत़ ‘जगायचीपण

‘कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ या गोविंदाग्रजांच्या कवितेच्या ओळीने माझ्या कैक रात्री जागविल्या आहेत़ ‘जगायचीपण सक्ती आहे/ मरायचीपण सक्ती आहे’ ‘हा आमचा सक्तीचा काळ, भक्ती हरवलेला़’ ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’, राम नगरकरांच्या भूपाळीने मराठी माणूस जागा होई़ त्यातील सडासंमार्जन, धेनुचे हंबरणे, गाईच्या धारा सगळेच हरवले़ दर बुधवारी रात्री १० वाजता रेडिओवर लागणारी ‘आपली आवड’ - मराठी गीतांची ही मालिका म्हणजे कुटुंबातील सर्वांसाठी पर्वणी़ आवड उरली नाही़ आपलेपणाला तर तडेच गेले़ प्रवासात पळणाऱ्या झाडांचे सुखद दर्शन कोणीच घेत नाही कारण मुलेसुद्धा मोबाइलशी खेळण्यातच दंग़ तालेवार मामाने गाव केव्हाच सोडले़ तो मुंबईला राहतो चाळीत़ मामी नोकरी करते़ तिला कोणी आले गेलेले चालत नाही़ ती सुगरण आहे का नाही माहीत नाही़ कारण ती इडली, समोसा, पॅटीस, वडापाव गाड्यावरूनच मागवते़मी काही माझ्या आजी-आजोबांना पाहिले नाही़ आईची माया आणि वडिलांचा धाक मात्र अनुभवला आहे़ बाजारातून तयार पदार्थ विकत आणणे म्हणजे कमीपणाचे मानले जाई़ तो नऊवारी साडीचा काऴ नऊवारी साडी म्हणजे वात्सल्याची ऊब़ आजीच्या जीर्ण झालेल्या साड्यांची गोधडी म्हणजे नातवंडांसाठी अप्रूप़ भातवरण, भाजी, आमटी, चटणी, पोळी किंवा भाकरी एवढाच मेनू घरोघरी़ खवय्ये नावाचा प्राणी जन्मास आला नव्हता़ माणसे अन्नाविषयी तक्रार न करता तृप्तीची ढेकर देऊनच पानावरून उठत, आवडीनिवडीचे स्थान गौण होते़ पानात टाकण्याची मुभा कोणालाही नव्हती़ ‘खाऊन माज; पण पानात टाकून माजू नकोस’ हे घरोघरी ऐकायला मिळे़ संसार काटकसरीचा होता म्हणून संसारात सुख-शांती होती़ उधळपट्टीला थारा नव्हता़ सुख-दु:ख सारेच वाटून घेत़ माणसे शिकलेली नव्हती; पण फार समंजस होती़ मुली लाजायच्या, छोटी मुले दंगामस्ती करायची, वडील डोळे वटारायचे कधी कधी चड्डी ओली होईपर्यंत बडवायचे, आई चुका पदराआड घालायची़ दिवेलागणीला सारे घरी़ घराची म्हणून एक शिस्त होती़ दुसऱ्याचे घेणे म्हणजे गुन्हा होता़ पोलिसांचा धाक होता़ खाकी वेशातील पोलिसांना पाहून मुले घाबरत़ आता कोणीच कोणाला घाबरत नाही़ दृष्कृत्यापासून रोखत नाही़ मला काय त्याचे? एवढ्या बेपर्वाईने वागतात़ आदर्शाला मूठमाती आपण केव्हाच दिली आहे़ संस्काराची नाळ तोडूनच टाकली आहे़ ‘नाही कोण कोणाचा बापलेक मामा भाचा मग अर्थ काय?बेंबीचा विश्वचक्री’ ती बेंबी मात्र आदि मानवापासून अंतिम मानवापर्यंत राहणार आहे़ पहिले उरले नाही; पण बेंबी मात्र आहे पहिली आणि अंतिम़- डॉ. गोविंद काळे