शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

‘मांझी’ म्हणू नये आपला !

By admin | Updated: February 13, 2015 23:08 IST

लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाला (जदयू) मोठा पराभव पत्करावा लागला म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला

लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाला (जदयू) मोठा पराभव पत्करावा लागला म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व आपले विश्वासू सहकारी जितनराम मांझी यांच्याकडे ते पद सोपविले. एका अर्थाने रामाने सोपविलेल्या पादुका निष्ठेने सांभाळणे व त्यांच्या बळावर राज्य चालविणे ही भरताची ऐतिहासिक व नैतिक जबाबदारी मांझी यांच्यावर आली. पण मांझी भरत नव्हते. ते आताच्या राजकारणातले तरबेज सत्ताबाज होते. नितीशकुमारांच्या गैरहजेरीच्या काळात त्यांनी पक्षातील काही आमदार स्वत:कडे वळविले. ते वळविताना आपले दलितत्वही त्यांनी नीट वापरून घेतले. बिहार विधानसभेत भाजपच्या आमदारांची संख्या मोठी आहे. मांझींनी त्या आमदारांशी व त्यांच्यामार्फत दिल्लीतील मोदी व शाह यांच्या राजकारणाशी आपले सूत जमविले. आपल्यासोबत आमदारांचा असा एक गट तयार झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नितीशकुमारांना आव्हान द्यायला सुरुवात केली. गेले काही महिने मांझी यांचे हे उंडारलेपण खपवून घेतल्यानंतर व राज्याची स्थिती बिघडल्याचे दिसल्यानंतर नितीशकुमारांनी पुन्हा एकवार बिहारच्या राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे मांझींनी त्यांच्या मार्गात अडसर उभा केला आणि दिल्ली व पाटण्यातील भाजपाच्या पुढाऱ्यांनी त्या प्रयत्नात माझींना साथ दिली. आता मांझी म्हणतात ‘मीच मुख्यमंत्री’. आपल्याला बहुमताचा पाठिंबा असल्याचा दावा करताना दिल्लीही आपल्या पाठीशी असल्याचे सांगतात. दुसरीकडे नितीशकुमार यांंची बिहारच्या पक्षनेतेपदी पक्षाच्या आमदारांनी नव्याने केलेली निवड योग्य असल्याचा निर्वाळा सभापतींनी दिला आणि नितीश कुमारांनी आपल्या सोबत असलेल्या १३० आमदारांना थेट राष्ट्रपतींसमोर हजरही केले. आता मांझींना दिलेला पाठिंबा काढून घ्यायचा तर तोंडघशी पडण्याची पाळी आणि मतदानाने बहुमताचा निर्णय घ्यायची वेळ आली तर पराभवाची आपत्ती अशा शृंगापत्तीत भाजपाचे राष्ट्रीय व प्रादेशिक पुढारी अडकले आहेत. नितीशकुमार हे मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय होते आणि त्यांच्या कारकीर्दीत बिहारचे ‘बिमारू’ राज्यातून एका सुदृढ राज्यात रूपांतर झालेले देशाने पाहिले. एक अत्यंत स्वच्छ प्रतिमेचा कार्यक्षम मुख्यमंत्री अशी ख्यातीही त्यांच्या वाट्याला आली. हा माणूस वृत्तीने साधा व सरळ असावा. त्याचमुळे कदाचित राजकारणी मित्रावर भरवसा ठेवून तो काही काळासाठी राजकारणाबाहेर गेला असावा. पण बिहारचे राजकारण हे तसेही बेभरवशाचे आणि अस्थिर आहे. शिवाय त्यातली मांझीसारखी माणसे नुसती लोभी लबाडच नाहीत तर भरपूर मतलबीही आहेत. आता विधानसभेत नितीशकुमारांचे बहुमत सिद्ध होतपर्यंत मांझी मुख्यमंत्रिपदावर बसणार आणि आपल्या दिल्लीकर मित्रांच्या मदतीने आमदारांच्या घोडेबाजारात उतरून नितीशकुमारांचे आमदार विकत घेणार. स्वच्छ भारत आणि त्याचे स्वच्छ राजकारण अशी ग्वाही देणारे नरेंद्र मोदी आणि त्यांचे पराभूत पक्षाध्यक्ष अमित शाह ही खेळी जिंकून दिल्लीत आपण गमावलेल्या शिरपेचाचे काही तुकडे पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करणार. देशाला हे राजकारण नुसत्या अप्रामाणिकपणाचेच नव्हे तर बेईमानीचे वाटणार आणि राजकारणात हे असेच चालायचे म्हणून देशातली सज्जन माणसे स्वस्थ बसणार. एक गोष्ट नितीशकुमारांविषयीही, जयप्रकाशांच्या तालमीत तयार झालेले हे गृहस्थ सरळ व साधे असावे हे एका मर्यादेपर्यंत ठीक. पण एवढ्या वर्षांच्या राजकीय अनुभवाने त्यांनी राजकारण जराही शिकले नसेल तर मात्र तो त्यांच्याबाबतचाही चिंतेचा विषय ठरावा. बिहार हे तसेही सगळ्या तऱ्हेचे बरेवाईट राजकारण खोलवर गिरवणारे राज्य आहे. त्यात राहूनही नितीशकुमार असेच राहिले असतील तर त्यांनी राजकारण करण्याहून संतकारण करणे हेच अधिक चांगले नाही काय? आजच्या राजकारणाच्या अध:पतनाचा इतिहास मोठा आहे. १९६७ मध्येच त्याला सुरुवात झाली. त्याआधीही अनेकांच्या राजकारणातल्या निष्ठा पातळ झालेल्या व त्यांनी आपले जुने पक्ष सोडल्याच्या घटना घडल्या. ६७ नंतर या प्रक्रियेला वेग आला. १९७७ च्या निवडणुकीनंतर तर राजकारणी लोकांनी लोंढ्यांनी त्यांचे पक्ष सोडले. १९८० च्या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली तेव्हा अगोदर जनता पक्षात गेलेले बरेच जण पुन्हा माहेरी परतलेले दिसले. ही लागण तेव्हापासून आतापर्यंत तशीच आहे. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपात जाणाऱ्या लोकांची यादी अशीच मोठी आहे. त्यानंतरही हे पक्षांतर तसेच चालू राहिलेले आपण पाहिले आहे. राजकारणाच्या या अध:पतनाचा नितीशकुमारांना जाच होणार नाही असे अनेकांना त्यांच्याकडे पाहून वाटत आले. पण राजकारणातील लोभ हा सगळ्या नीतितत्त्वांचा पराभव करील अशीच सध्याची देशस्थिती असल्याने मांझीच मुख्यमंत्री राहिले आणि नितीशकुमारांच्या वाट्याला पुन्हा विजनवास आला तर त्याचे आपण आश्चर्य करण्याचे कारण नाही. माणसे अविश्वासापायी वाया जातात असे आपण नेहमीच म्हणतो. नितीशकुमारांच्या बाबतीत हे उलटे म्हणावे लागेल. ‘ते विश्वासापायी वाया गेले’ असाच त्यांच्याविषयीचा निर्णय इतिहासाला कदाचित द्यावा लागेल.