शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
5
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
6
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
7
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
8
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
9
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
10
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
11
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
12
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
13
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
14
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
15
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
16
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
17
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
18
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
19
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
20
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता

‘मांझी’ म्हणू नये आपला !

By admin | Updated: February 13, 2015 23:08 IST

लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाला (जदयू) मोठा पराभव पत्करावा लागला म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला

लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाला (जदयू) मोठा पराभव पत्करावा लागला म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व आपले विश्वासू सहकारी जितनराम मांझी यांच्याकडे ते पद सोपविले. एका अर्थाने रामाने सोपविलेल्या पादुका निष्ठेने सांभाळणे व त्यांच्या बळावर राज्य चालविणे ही भरताची ऐतिहासिक व नैतिक जबाबदारी मांझी यांच्यावर आली. पण मांझी भरत नव्हते. ते आताच्या राजकारणातले तरबेज सत्ताबाज होते. नितीशकुमारांच्या गैरहजेरीच्या काळात त्यांनी पक्षातील काही आमदार स्वत:कडे वळविले. ते वळविताना आपले दलितत्वही त्यांनी नीट वापरून घेतले. बिहार विधानसभेत भाजपच्या आमदारांची संख्या मोठी आहे. मांझींनी त्या आमदारांशी व त्यांच्यामार्फत दिल्लीतील मोदी व शाह यांच्या राजकारणाशी आपले सूत जमविले. आपल्यासोबत आमदारांचा असा एक गट तयार झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नितीशकुमारांना आव्हान द्यायला सुरुवात केली. गेले काही महिने मांझी यांचे हे उंडारलेपण खपवून घेतल्यानंतर व राज्याची स्थिती बिघडल्याचे दिसल्यानंतर नितीशकुमारांनी पुन्हा एकवार बिहारच्या राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे मांझींनी त्यांच्या मार्गात अडसर उभा केला आणि दिल्ली व पाटण्यातील भाजपाच्या पुढाऱ्यांनी त्या प्रयत्नात माझींना साथ दिली. आता मांझी म्हणतात ‘मीच मुख्यमंत्री’. आपल्याला बहुमताचा पाठिंबा असल्याचा दावा करताना दिल्लीही आपल्या पाठीशी असल्याचे सांगतात. दुसरीकडे नितीशकुमार यांंची बिहारच्या पक्षनेतेपदी पक्षाच्या आमदारांनी नव्याने केलेली निवड योग्य असल्याचा निर्वाळा सभापतींनी दिला आणि नितीश कुमारांनी आपल्या सोबत असलेल्या १३० आमदारांना थेट राष्ट्रपतींसमोर हजरही केले. आता मांझींना दिलेला पाठिंबा काढून घ्यायचा तर तोंडघशी पडण्याची पाळी आणि मतदानाने बहुमताचा निर्णय घ्यायची वेळ आली तर पराभवाची आपत्ती अशा शृंगापत्तीत भाजपाचे राष्ट्रीय व प्रादेशिक पुढारी अडकले आहेत. नितीशकुमार हे मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय होते आणि त्यांच्या कारकीर्दीत बिहारचे ‘बिमारू’ राज्यातून एका सुदृढ राज्यात रूपांतर झालेले देशाने पाहिले. एक अत्यंत स्वच्छ प्रतिमेचा कार्यक्षम मुख्यमंत्री अशी ख्यातीही त्यांच्या वाट्याला आली. हा माणूस वृत्तीने साधा व सरळ असावा. त्याचमुळे कदाचित राजकारणी मित्रावर भरवसा ठेवून तो काही काळासाठी राजकारणाबाहेर गेला असावा. पण बिहारचे राजकारण हे तसेही बेभरवशाचे आणि अस्थिर आहे. शिवाय त्यातली मांझीसारखी माणसे नुसती लोभी लबाडच नाहीत तर भरपूर मतलबीही आहेत. आता विधानसभेत नितीशकुमारांचे बहुमत सिद्ध होतपर्यंत मांझी मुख्यमंत्रिपदावर बसणार आणि आपल्या दिल्लीकर मित्रांच्या मदतीने आमदारांच्या घोडेबाजारात उतरून नितीशकुमारांचे आमदार विकत घेणार. स्वच्छ भारत आणि त्याचे स्वच्छ राजकारण अशी ग्वाही देणारे नरेंद्र मोदी आणि त्यांचे पराभूत पक्षाध्यक्ष अमित शाह ही खेळी जिंकून दिल्लीत आपण गमावलेल्या शिरपेचाचे काही तुकडे पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करणार. देशाला हे राजकारण नुसत्या अप्रामाणिकपणाचेच नव्हे तर बेईमानीचे वाटणार आणि राजकारणात हे असेच चालायचे म्हणून देशातली सज्जन माणसे स्वस्थ बसणार. एक गोष्ट नितीशकुमारांविषयीही, जयप्रकाशांच्या तालमीत तयार झालेले हे गृहस्थ सरळ व साधे असावे हे एका मर्यादेपर्यंत ठीक. पण एवढ्या वर्षांच्या राजकीय अनुभवाने त्यांनी राजकारण जराही शिकले नसेल तर मात्र तो त्यांच्याबाबतचाही चिंतेचा विषय ठरावा. बिहार हे तसेही सगळ्या तऱ्हेचे बरेवाईट राजकारण खोलवर गिरवणारे राज्य आहे. त्यात राहूनही नितीशकुमार असेच राहिले असतील तर त्यांनी राजकारण करण्याहून संतकारण करणे हेच अधिक चांगले नाही काय? आजच्या राजकारणाच्या अध:पतनाचा इतिहास मोठा आहे. १९६७ मध्येच त्याला सुरुवात झाली. त्याआधीही अनेकांच्या राजकारणातल्या निष्ठा पातळ झालेल्या व त्यांनी आपले जुने पक्ष सोडल्याच्या घटना घडल्या. ६७ नंतर या प्रक्रियेला वेग आला. १९७७ च्या निवडणुकीनंतर तर राजकारणी लोकांनी लोंढ्यांनी त्यांचे पक्ष सोडले. १९८० च्या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली तेव्हा अगोदर जनता पक्षात गेलेले बरेच जण पुन्हा माहेरी परतलेले दिसले. ही लागण तेव्हापासून आतापर्यंत तशीच आहे. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपात जाणाऱ्या लोकांची यादी अशीच मोठी आहे. त्यानंतरही हे पक्षांतर तसेच चालू राहिलेले आपण पाहिले आहे. राजकारणाच्या या अध:पतनाचा नितीशकुमारांना जाच होणार नाही असे अनेकांना त्यांच्याकडे पाहून वाटत आले. पण राजकारणातील लोभ हा सगळ्या नीतितत्त्वांचा पराभव करील अशीच सध्याची देशस्थिती असल्याने मांझीच मुख्यमंत्री राहिले आणि नितीशकुमारांच्या वाट्याला पुन्हा विजनवास आला तर त्याचे आपण आश्चर्य करण्याचे कारण नाही. माणसे अविश्वासापायी वाया जातात असे आपण नेहमीच म्हणतो. नितीशकुमारांच्या बाबतीत हे उलटे म्हणावे लागेल. ‘ते विश्वासापायी वाया गेले’ असाच त्यांच्याविषयीचा निर्णय इतिहासाला कदाचित द्यावा लागेल.