शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

आमचं माहेर तोडू नका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 02:51 IST

- बाळासाहेब बोचरेअकलूजची लावणी स्पर्धा आता बंद होणार, या जाणिवेने कलावंत मंडळींच्या मनात कालवाकालव सुरू असून ज्या स्पर्धेमुळे आपण घडलो आणि मानसन्मान मिळाला ती स्पर्धा बंद होऊ नये, असेच अनेक कलाकारांना वाटते.अकलूजची लावणी स्पर्धा ही जगभर गाजली असून तिला जगभर पोहोचविण्यात अकलूजकरांचे परिश्रम तेवढेच मोलाचे आहेत. गेल्या २५ वर्षांत या ...

- बाळासाहेब बोचरेअकलूजची लावणी स्पर्धा आता बंद होणार, या जाणिवेने कलावंत मंडळींच्या मनात कालवाकालव सुरू असून ज्या स्पर्धेमुळे आपण घडलो आणि मानसन्मान मिळाला ती स्पर्धा बंद होऊ नये, असेच अनेक कलाकारांना वाटते.अकलूजची लावणी स्पर्धा ही जगभर गाजली असून तिला जगभर पोहोचविण्यात अकलूजकरांचे परिश्रम तेवढेच मोलाचे आहेत. गेल्या २५ वर्षांत या लावणी स्पर्धेने अनेक कलावंत घडवले असून या कलेलाही मोठ्या उंचीवर पोहोचवले आहे. या कलेला सन्मान मिळवून दिला आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची जन्मशताब्दी साजरी होत असताना या स्पर्धेने रौप्यमहोत्सव पूर्ण केला. राज्यभरातून लावणी कलावंतांना बोलावणे, त्यांच्यातील कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांचा सन्मान करणे हे काम २५ वर्षे अव्याहतपणे करणे सोपे नाही. वर्षातून एकदा भरणाºया या स्पर्धेत आपली हजेरी लावावी, असे कित्येक कलावंतांना वाटल्याशिवाय राहत नाही. कलावंत मंडळींना मिळणारा मानसन्मान पाहता त्यांना अकलूज म्हणजे लावणीची पंढरी अन् आपले माहेर वाटू लागले. २५ वर्षे स्पर्धा चालवल्यानंतर आता ही स्पर्धा बंद करण्याचा मानस संयोजक जयसिंह मोहिते-पाटील ऊर्फ बाळदादा यांनी बोलून दाखवला. त्यामुळे अनेक कलावंत मंडळींच्या मनाची घालमेल सुरू झाली. ही स्पर्धा बंद होऊ नये, झाली तर आमचे माहेरच तुटेल अशी भावना कलावंतांनी व्यक्त केली. वास्तविक अकलूजची लावणी स्पर्धा ही केवळ कलेसाठीच नावाजली नाही तर त्यातला शिस्तबद्धपणा आणि कलाकारांना मिळणारी दाद ही खास बाब आहे. त्यातून कलेचा आविष्कार तर पाहायला मिळतोच पण लोकप्रबोधनही केले जाते. काश्मीरचा प्रश्न असो वा कोपर्डीची घटना असो. त्यांना लावणीमध्ये मोठ्या खुबीने बसवून कलाकारांनी प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला. अनेकवेळा डोळ्यात पाणी आणले. ही स्पर्धा म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटचा एक उत्तम नमुना असून कलाकारांना घरच्यासारखी वागणूक देणारा भावनिक धागा घट्ट बांधला आहे. इथं धांगडधिंग्याला कधीच थारा मिळाला नाही. अगदी महिलाही लावणीतील शृंगार अन् आर्जव मनापासून पाहतात. बाळदादांच्या शिस्तीमुळे प्रेक्षकांमधून अश्लील शेरेबाजी अथवा कलेचा अवमान करणारी कसलीच घटना घडली नाही. त्यामुळेच कलाकाराला मनमुराद दाद देण्याचीच परंपरा सुरू झाली होती. इथं आमदार, खासदार अथवा मंत्री हे व्हीआयपी नसून केवळ कलाकारांना व्हीआयपी मानले जाते. तिकिटासाठी राज्यभर प्रत्येक जिल्ह्याला कोटा वाटून देण्याचा बाळदादांचा पारदर्शीपणा कौतुकास्पद आहे. ज्यावेळी आयटम साँगच्या मागे दुनिया पळू लागली तेव्हा अकलूजच्या लावणीने प्रेक्षकांना लावणीसोबत खिळवून ठेवण्यात यश मिळवले आहे. नुकत्याच झालेल्या स्पर्धेला शेवटची स्पर्धा समजून नवे-जुने कलाकार आवर्जून आले होते. वास्तविक एखादी स्पर्धा अथवा पुरस्कार सलग २५ वर्षे चालवल्यानंतर ती बंद करणे स्वाभाविकच आहे. पण अकलूजची लावणी स्पर्धा बंद होऊ नये, असेच कलाकारांना वाटते. ही स्पर्धा बंद झाली तर आमचे माहेर तुटल्यासारखे होईल, अशीच त्यांची भावना आहे. सोलापूरचा दमाणी पुरस्कार २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बंद करण्यात आला. पण तो पुरस्कार आता लोकमंगलच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे तसेच बळ बाळदादांनाही मिळणे गरजेचे आहे. कलाकार, गायक, लेखक, वादक आणि नृत्यांगना या सर्व कलाकारांबरोबरच थिएटर मालक आणि प्रेक्षक यांनीही ही कला जपण्यासाठी पुढे आले पाहिजे. शासनाचीही तितकीच जबाबदारी आहे. त्या कलेला वाचवणे आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे; अन्यथा भविष्यात पुन्हा धांगडधिंगाच पाहायला मिळेल. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर