शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

गाफील राहू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 03:50 IST

मुंबईवर झालेल्या पहिल्या दहशतवादी हल्ल्याला २५ वर्षे झाली़ या बॉम्बस्फोट मालिकेनंतर देशाच्या तपास यंत्रणेलाच चपराक बसली़ पाकिस्तान हा आपला एकमेव शत्रू व त्यानेच हा हल्ला केला हेही त्यातून समोर आले. त्यानंतर डोळ्यात तेल घालून आम्ही देशाचे रक्षण करू, असे तपास यंत्रणांनी...

मुंबईवर झालेल्या पहिल्या दहशतवादी हल्ल्याला २५ वर्षे झाली़ या बॉम्बस्फोट मालिकेनंतर देशाच्या तपास यंत्रणेलाच चपराक बसली़ पाकिस्तान हा आपला एकमेव शत्रू व त्यानेच हा हल्ला केला हेही त्यातून समोर आले. त्यानंतर डोळ्यात तेल घालून आम्ही देशाचे रक्षण करू, असे तपास यंत्रणांनी जाहीर केले़ या हल्ल्याचा खटलाही सुरू झाला़ न्याय व्यवस्थेचा कारभार कसा कासवगतीने चालतो, याचे उत्तम उदाहरण या खटल्याच्या रूपाने जगासमोर आले. या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाची अंतिम मोहर उमटण्याआधीच मुंबईला एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोटाचे धक्के बसतच होते. अजमल कसाब व त्याच्या दहा साथीदारांनी पाकिस्तानातून येऊन मुंबईवर दहशतवादी हल्ला चढविला. त्यात दीडशे निष्पाप जण ठार झाले. दादर, झवेरी बाजार, रेल्वे साखळी बॉम्बस्फोट असे अनेक धक्के मुंबईला बसले़ त्यातून तपास व सुरक्षा यंत्रणा गाफील असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले़ संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सत्तेत असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने ठाण्यातील एका आरोपीला दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते़ माध्यमांनी ही बाब उघडकीस आणल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने मग जाहीर माफी मागितली़ या एका घटनेने सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघाले़ तरीही देशात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट सुरूच होते. शहरांवर विशेषत: मुंबईवर सतत दहशतवादाचे सावट असते. मुंबईचे ‘स्पिरीट’ सतत जागृत असल्याने मुंबईकरांनी हे हल्ले पचविले. पण ‘त्या’ जखमा मुंबईकर विसरलेले नाहीत. देशाची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा मात्र अजूनही गाफील असल्याचे चित्र आहे. दहशतवादविरोधी पथकाचे अधिकार, त्यांना देण्यात आलेली शस्त्रे यापेक्षा दहशतवादी कितीतरी पटीने अद्ययावत आहेत़ मात्र दहशतवाद्यांचा आर्थिक स्रोत शोधण्याचे ‘तंत्र’ आपण अजूनही विकसित करू शकलेलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. दहशतवादाचा निपटारा करायचा झाल्यास ‘फॉलो द मनी’ हे सूत्र मानले जाते. तथापि, आपल्याकडे या सूत्राचा पाठपुरावा चिकाटीने होताना दिसत नाही. दहशतवादाचा सामना करणाºया जवानांच्या जॅकेट खरेदीत गैरप्रकार झाला होता़ त्यामुळे या प्रश्नी एकंदरीतच प्रशासन किती गंभीर आहे हे दिसून आले़ अशा परिस्थितीत मुंबईवर १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेला २५ वर्षे पूर्ण होत असताना आता सुरक्षा यंत्रणांनी अधिक सक्षम होण्याचा विडा उचलायला हवा. स्थानिक गुप्तहेरांचे जाळे अधिक बळकट करायला हवे़ केंद्र आणि राज्य सरकारनेही सुरक्षा यंत्रणांसाठी भक्कम निधी पुरवायला प्राधान्य द्यायला हवे. जेणेकरून भविष्यात असे हल्ले पुन्हा मुंबईवर होणार नाहीत.

टॅग्स :Mumbai Bomb Blastमुंबई बॉम्बस्फोटMumbaiमुंबईTerrorismदहशतवाद