शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

दिवाळी गोड झाली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 23:06 IST

एडिटर्स व्ह्यू

मिलिंद कुलकर्णीकोरोना महासाथीच्या भयाखाली गेली सात महिने जीवन कंठणाऱ्या नागरिकांना दिवाळीने दिलासा मिळाला. भय कमी झाले आणि चैतन्याचा स्पर्श झाला. शेवट गोड तर सगळे गोड असे म्हणण्याची प्रथा आहे, पण कोरोनाविषयी तसे म्हणता येणार नाही. युरोप आणि दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली असून रुग्णसंख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचे सावट अद्याप कायम असले तरी दिवाळीचे चार दिवस आनंदात गेले, हे समाधान आहे.माणूस हा आशेवर जगतो. महाभारताचे युध्द १८ दिवसात संपले, कोरोनाचे युध्द आपण २१ दिवसात संपवू, असे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी मार्चच्या शेवटच्या आठवडयात भारतीय जनतेला सांगितले. नागरिकांनी विश्वास ठेवला. २१ दिवसांचा लॉकडाऊन काटेकोरपणे पाळला. थाळी वाजविली, दिवे ओवाळले, शंखनाद केला. कोरोना कमी झाला नाही, तरी तक्रार केली नाही. शारीरिक, मानसिक त्रास सहन करीत कामगार, कष्टकरी पायी, सायकल, रिक्षा अशा मिळेल त्या मार्गाने मूळगावी परतले. त्यांचा आक्रोश राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचला नाही. लॉकडाऊनचे टप्पे वाढत गेले. रुग्ण संख्या वाढली, मृत्यूमुखींचे आकडे मोजले जाऊ लागले. औषधींचा काळाबाजार, खाजगी रुग्णालयांचा असहकार व नंतर अडवणूक, शासकीय रुग्णालयांवर पडलेला ताण हे सगळे मुकाटपणे नागरिकांनी सोसले. घरात कोरोना रुग्ण असल्याचे कळताच संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार घालणारी गल्ली, वाळीत टाकल्यासारखी वागणूक, रुग्णाला किंवा मृत्यू पावलेल्या नातेवाईकाला स्पर्श करायलाही न धजावणारी रुग्णालय आणि वैकुंठधामातील कर्मचारी हे अनुभव माणुसकीवरील विश्वास उध्वस्त करणारे होते. पण जशी समुद्राची लाट ओसरत जाताना किनाºयावरील वाळूवर गिरवलेली अक्षरे पुसली जातात, तसेच कोरोनाची लाट ओसरल्यावर लोक हे कटू अनुभव विसरुन जात आहेत. प्रकाशमय दिवाळीचे धूमधडाक्यात केलेले स्वागत म्हणूनच औचित्यपूर्ण आहे.‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभिवचन राज्य शासनाने महाराष्टÑातील नागरिकांकडून घेतले. स्वत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे निवासस्थानी क्वारंटाईन होत जनतेला ‘घरात रहा, सुरक्षित रहा’ असा उपदेश देत होते. आणि जनता त्याचे पालन करीत होती. पुढे जाऊन अनलॉकचे टप्पे सुरु झाले. एस.टी. पूर्ण क्षमतेने धावू लागली. हॉटेल, चित्रपटगृह पथ्य पाळून सुरु झाली. पाडव्याला मंदिरे उघडली. पुढच्या सोमवारी ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा उघडतील. जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर ही त्रीसूत्री पाळत लोक घराबाहेर पडले आहेत.दिवाळीच्या निमित्ताने कुटुंबे एकत्र आली. आठ महिन्यांनंतर घरे भरली. चेहºयावरील भयाचे सावट जाऊन हास्यलकेर उमटली. अंगणात आकाशकंदील लागला. दिव्यांच्या माळा आणि पणत्यांनी कोरोनामुळे घरादारात निर्माण झालेला अंधकार दूर केला. फटाक्यांचा आवाज कमी असला तरी आठ महिन्यांपासून मनात दाटलेला आवेग फटाक्यांच्या रुपाने बाहेर आला. क्वारंटाईन झालेले आबालवृध्द अंगणात मोकळेपणाने वावरले. घरात आलेल्या प्रत्येक वस्तूकडे संशयाने पाहण्याची सवय झालेल्या आम्हाला भेटवस्तू, मिठाईचे बॉक्स आनंद देऊन गेले. फराळाच्या ताटांची शेजारपाजारी अदलाबदल झाली. कोरोनाचे मळभ हळूहळू कमी होत चालल्याचा हा सुखद अनुभव होता.दिवाळीने बाजारपेठेतदेखील चैतन्य आणले. वर्षातून एकदा येणारा मोठा सण असल्याने प्रत्येक नागरिकाने ऐपतीप्रमाणे खरेदी केली. श्रीमंतांनी चारचाकी घेतली, मध्यमवर्गीयांनी मोटारसायकली, नोकरदारांनी टी व्ही, फ्रीजसारख्या वस्तू घेतल्या. सहा महिन्यांपासून ठप्प झालेली बाजारपेठ गजबजली. या बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या उद्योजकांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांना ही दिवाळीची उलाढाल उत्साहित करुन गेली. २०२० ची सुरुवात कठीण झाली असली तरी शेवट चांगला होईल, हा आशावाद दिवाळीने दिला. ही उभारी खूप महत्त्वाची आहे.युरोप असो की, दिल्ली...कोरोनाच्या दुसºया लाटेने हाहाकार माजविला आहे. कोरोना संपलेला नाही. प्रतिबंधक लस अद्याप आलेली नाही. ही लस आली तरी ती कोरोनाचा पूर्ण नायनाट करेल, असे सांगता येणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यायला हवी. एका दुस्वप्नातून बाहेर पडत असताना पुरेशी खबरदारी घेतली नाही, तर पुन्हा त्या खाईत आपण लोटले जाऊ, हे लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :Jalgaonजळगाव