शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
3
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
4
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
5
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
6
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
7
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
9
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
10
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
11
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
12
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
13
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
14
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
15
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
16
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
17
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
18
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
19
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
20
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

दिवाळी अंकाचं बदलतं वारं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:26 IST

हजार वर्षांचा काळोख प्रकाशाच्या एका किरणाने नष्ट होतो. तो तेजोत्सव म्हणजेच दिवाळी असं परंपरा सांगते. गोडधोड, कपडेलत्ते, फटाके यांच्याबरोबरच मराठी वाचकांची दिवाळी ही दिवाळी अंकाशिवाय असूच शकत नाही. आता तर दिवाळी तोंडावर आली तेव्हा ‘कलाक्षरे’मध्ये दिवाळी अंकाची चाहूल अपरिहार्यच...

- रविप्रकाश कुलकर्णीहजार वर्षांचा काळोख प्रकाशाच्या एका किरणाने नष्ट होतो. तो तेजोत्सव म्हणजेच दिवाळी असं परंपरा सांगते. गोडधोड, कपडेलत्ते, फटाके यांच्याबरोबरच मराठी वाचकांची दिवाळी ही दिवाळी अंकाशिवाय असूच शकत नाही. आता तर दिवाळी तोंडावर आली तेव्हा ‘कलाक्षरे’मध्ये दिवाळी अंकाची चाहूल अपरिहार्यच...काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी १९०९ च्या दिवाळीला आपल्या मासिक दिवाळीला आपल्या मनोरंजनाच्या वाचकाला विशेष भेट म्हणून ‘दिवाळीचा अंक’ ही अभिनव कल्पना सादर केली आणि ही भेट वाचकांना इतकी आवडली की तेव्हापासून दिवाळी अंकाला दरवर्षी नवनवे धुमारे फुटायला लागले आहेत.याबाबत उत्तुंग झेप घेतली तो लोकमत दीपोत्सव अंकाने. दोन वर्षांपूर्वी हा अंक लाखाच्या वर खपला हा केवळ योगायोग नव्हता. तर विशेष आयोजन केले तर याच्याही पुढे जाता येते, हे गेल्या वर्षी दोन लाखांच्या वर हा अंक वाचकांनी विकत घेतला यावरून दिसलं. यंदा तर तीन लाखांच्या वर हा अंक संपेल असा संपादकांचा विश्वास आहे! थोडक्यात लोकमत दीपोत्सव हे जणू ब्रँड नेम झाले आहे.दूरदर्शनला मालिकांचे आगमन हे दिवाळी अंकाच्या मुळावर येऊ पाहते आहे. असा आरडाओरडा कालपरवा काही जणांनी केला. पण त्यात किती तथ्य होते, आहे? तर आता चक्क झी मराठी या वाहिनीतर्फे यंदा ‘उत्सव नात्यांचा’ हा दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे! प्रशांत दळवी संपादित या अंकाची सर्व निर्मितीची जबाबदारी ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी घेतली. चॅनेलतर्फे दिवाळी अंक निघतोय असे कळल्याबरोबर या क्षेत्रात मरगळ आलेल्या धुरीणांनी नेहमीप्रमाणे असा अंक किती खपणार? वगैरे रडका सूर लावला. पण सुदेश हिंगलासपूरकर यांनी त्यांच्या स्वभावानुसार ‘करायचं तर ते दणक्यात’ या वृत्तीने ‘उत्सव नात्यांची’ आवृत्ती काढली. गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठाने ‘विद्यावृत्ती’ दिवाळी अंक काढून दिवाळी अंकाचे महत्त्व अधोरेखित केले. आता ‘झी’सारख्या वाहिनीला प्रिंट मीडियाकडे वळावेसे वाटले हे वाचन संस्कृतीचे यश आहे.बदल हा करायला लागतो. केले म्हणजे होते हेच खरे. त्यामागे ऊर्मी लागते. मग ‘ब्रँड नेम’ आपोआप होते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘ऋतूरंग’ दिवाळी अंक. एखाद्या विशिष्ट विषयालाच वाहिलेला अंक हा प्रकार या अंकाचे संपादक अरुण शेवते यांनी सुरू केला. तेव्हा असा अंक कुठे चालतो का वगैरे सूर उमटला. त्या ‘ऋतूरंग’ने पंचवीस वर्षे पूर्ण केली आहेत! त्याच्याही पुढची वेगळी गोष्ट म्हणजे दिवाळी अंक साहित्याचे पुस्तक काढायची कल्पना शेवते यांनी सुरू केली आणि ती यशस्वी झाली. ऋतूरंगच्या पंचवीस वर्षांतील साहित्याची पन्नास पुस्तके वेगवेगळ्या प्रकाशकांतर्र्फे प्रकाशित झालेली आहेत.थोडक्यात केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे हेच खरे...दिवाळी अंकाची भेट योजना वीस वर्षांपूर्वी अनिल कोठावळे यांनी सुरू केली आणि हे लोण इतके काही पसरत गेले की एक वर्षी कुठल्या तरी अंकासोबत तेलाची बाटलीदेखील देण्यात आली. पण या थेट वस्तूतील झालेले साचलेपणा ओळखून किल्ला इतिहासातला, मनातला वास्तवातला या अंकाचे संपादक रामनाथ आंबेरकर यांनी आपल्या वाचकांची इतिहासाची ओढ ओळखून चक्र अंकासोबत शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं चलन शिवराई याची यथामूळ निर्मिती करून हे नाणं शिवप्रेमींना एक विशेष भेट म्हणून दिलेलं आहे.दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा हा एक नवा प्रकार आता रूढ होऊ पाहतो आहे. पुण्यात दिवाळी अंकाचे खूपच प्रकाशन सोहळे होतात, हे विशेष. त्यातदेखील वेगळेपण दाखवले ते ‘मोहनगरी’ या नव्यानेच आलेल्या अंकाचे संपादक आनंद लाटकर यांनी. त्यांचा 'दिलीप राज देव' विशेषांक आहे. त्याकरिता त्यांनी या त्रिमूर्तीच्या गाड्यांचा आॅर्केस्ट्रा ठेवला. एरव्ही आॅर्केस्ट्रामध्ये गाण्यांचे किस्से, मिमिक्री असलं काही तरी असतं. पण! ‘मोहनगरी’च्या या आॅर्केस्ट्राच्या सुरेल गाण्यांच्या मध्ये अंकातील लेखाची माहिती त्या त्या लेखकांच्या नावासकट सांगितली गेली. कुठल्याही लेखकाला ही सुखावणारी गोष्ट. दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आॅर्केस्ट्रा प्रकारातले हे नवे वळण आहे.दिवाळी अंकाचे हे नवे वारे दिवाळी अंक परंपरा पुढे नेणारी आहे. तेव्हा आता येणाºया अंकाची वाट पाहूया. ‘कलाक्षरे’च्या रसिक वाचकांना ही दिवाळी वाचनानंदाने जावो हीच सदिच्छा!

टॅग्स :diwaliदिवाळी