शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
4
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
5
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
6
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
9
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
10
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
11
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
12
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
13
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
14
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
15
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
16
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
17
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
18
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
19
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
20
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

घटस्फोट, कायदा आणि सर्वाेच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 05:04 IST

भारतीय संस्कृतीनुसार विवाह एक पवित्र बंधन आहे. त्यामुळे बऱ्याच काळापर्यंत घटस्फोट ही संकल्पना कायद्याला मान्य नव्हती.

-अ‍ॅड. नितीन देशपांडेभारतीय संस्कृतीनुसार विवाह एक पवित्र बंधन आहे. त्यामुळे बऱ्याच काळापर्यंत घटस्फोट ही संकल्पना कायद्याला मान्य नव्हती. विवाहविच्छेदन हे सोपे नव्हते. आता मात्र परिस्थितीमध्ये बदल झाला आहे. पती-पत्नीमधील वाढत्या वादांमुळे स्वतंत्र कुटुंब न्यायालयाची स्थापना करावी लागली. सध्या अशा खटल्यांची संख्यासुद्धा इतकी जास्त झाली आहे की त्वरित न्याय मिळणे अवघड बनले आहे. या स्वरूपाच्या खटल्यांमध्ये लवकर न्याय मिळाला तर पती-पत्नींना आपले जीवन नव्याने सुरू करता येते. खटला लांबला तर वैयक्तिक जीवनात निर्णय घेणे अशक्य असते. फॅमिली कोर्ट अ‍ॅक्टनुसार न्यायालय उभय पक्षांमध्ये तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करीतच असते. त्यात सूर असा असतो की दुभंगलेली मने एकत्र येणे शक्य नसेल तर फारकत घेतलेली बरी. त्यातील अटी व शर्ती दोन्ही बाजूंनी ठरवाव्यात. या खटल्यांमध्ये वास्तव असे की एकदा मने दुरावली की पत्नीकडून हुंड्याच्या मागणीकरिता फ ौजदारी तक्रार तसेच कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली खटला उभा केला जातो. त्यातही केवळ पोटगीसाठीसुद्धा प्रकरण अनेक स्तरांवर लढविले जाते.बरेचदा घटस्फोटाचे प्रकरण लांबण्यामागे विरुद्ध बाजूच्या पती वा पत्नीचे दुसरे लग्न सहज होऊ नये, असा प्रयत्न असतो. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. शरद बोबडे आणि एल. नागेश्वर राव या खंडपीठाने अनुराग मित्तल वि. शैल्य मिश्रा मित्तल या खटल्यातील निकालाने लांबलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणातील पहिल्या स्तरावर घटस्फोट मिळालेल्या पती वा पत्नीला दिलासा देणारा ठरू शके ल. या खटल्यात पतीच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट मिळाला होता. त्याविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात अपील केले. उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या हुकूमनाम्याला स्थगिती दिली. मग पती-पत्नीमध्ये तडजोड झाली. पतीने अपील मागे घेण्याचा अर्ज केला आणि त्यात तडजोड झाल्याचे म्हटले. या अर्जावर हुकूम होण्यापूर्वीच पतीने दुसरे लग्न केले. योगायोग म्हणजे दुसºया पत्नीशीही पतीचे पटले नाही. दुसºया पत्नीने मग आपला विवाह पतीच्या पहिल्या विवाहाचे अपील संपून ते फेटाळले जाण्याआधीच तो मुळातच बेकायदेशीर असल्याचा दावा केला. त्यावर कुटुंब न्यायालयाने पत्नीचा दावा फेटाळला, पण उच्च न्यायालयाने तिचे म्हणणे मान्य केले व तिचा विवाह बेकायदेशीर ठरविला. त्याविरुद्धचे अपील सर्वोच्च न्यायालयापुढे सुनावणीस आले.न्यायालयाने दोन मुद्दे काढले. पहिल्यात नंतर फेटाळलेल्या पतीच्या अपिलाच्या हुकूमाची अंमलबजावणी त्याने अपील मागे घेण्यासाठी केलेल्या तारखेपासून होते का? याचे उत्तर खंडपीठाने ‘होय’ दिल्याने दुसरा विवाह कायदेशीर ठरला. दुसºया मुद्द्यात घटस्फोटाच्या निर्णयाविरुद्धचे अपील चालू असताना केलेला विवाह कायदेशीर ठरतो का? यावर सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाह कायद्याच्या कलम ११चा विचार केला. यानुसार जर विवाहाच्या वेळी पती अथवा त्याची पत्नी हयात असेल तर असा विवाह मुळातच बेकायदेशीर मानतात. या कायद्याच्या १५व्या कलमानुसार, जर न्यायालयाने घटस्फोटाचा निर्णय दिला तर कोणत्या परिस्थितीत दुसरा विवाह करता येतो हे स्पष्ट केले आहे.जर घटस्फोटाच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची कायद्यात तरतूद असेल तर दुसरा विवाह शक्य आहे. कौटुंबिक न्यायालय व हिंदू विवाह कायद्यानुसार अपिलाची मुभा आहे. म्हणून या कलमानुसार अपिलाची मुदत टळल्यानंतर किंवा अपील दाखल झाले असता ते फेटाळल्यानंतर दुसरा विवाह करण्यास कायदा संमती देतो. मग घटस्फ ोटाच्या निर्णयाच्या विरुद्धचे अपील चालू असताना केलेला दुसरा विवाह हा कलम ११ (१)नुसार पहिली पत्नी अथवा पती हयात आहे म्हणून बेकायदेशीर ठरतो का, असा प्रश्न पडला. याविषयी आणखी माहिती घेऊ पुढील लेखात.

टॅग्स :Courtन्यायालय