शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

घटस्फोटही मर्यादित असतो..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:21 IST

बायकोला नव-यापासून घटस्फोट घ्यायचा होता. मैत्रिणीने विचारले...! का गं बाई..., असं काय झालं...! बायको म्हणाली, आमचं पटत नाही. माझ्या कोणत्याच मागण्या तो मान्य करीत नाही.

बायकोला नव-यापासून घटस्फोट घ्यायचा होता. मैत्रिणीने विचारले...! का गं बाई..., असं काय झालं...! बायको म्हणाली, आमचं पटत नाही. माझ्या कोणत्याच मागण्या तो मान्य करीत नाही.अगं वेडे, मग घटस्फोट देऊन त्याला सुखी करण्याऐवजी संसारात राहून त्याला छळत राहणं चांगलं नाही का? आता मैत्रिणीचा हा सल्ला तिला आवडला की नाही हे माहीत नाही पण आमचे आजचे रायकीय पक्ष मात्र या सल्ल्यानुसार वागत आहेत एवढं मात्र खरं.आता हेच पाहा ना! चंद्राबाबू नायडूंनी एनडीएसोबत संसार थाटला. पण मोदीसाहेब आपल्या मागण्या मान्य करीत नाही म्हणून काडीमोड घेण्यापर्यंत पाळी आली. आपल्या दोन मंत्र्यांना त्यांनी मोदी सरकारातून बाहेरही काढले. आता ते आपल्या सर्व खासदारांसमवेत एनडीएचा पाठिंबा काढून घेतील आणि मोदींना मोठा हादरा बसेल म्हणून मोदींचे आतले आणि बाहेरचे विरोधक जाम खूश होते. पण चंद्राबाबूंनी एनडीएतून बाहेर पडणार नाही असे लगेच जाहीर करून विरोधकांच्या या भावी आनंदावर विरजण घातले. बाबूंनीही विचार केला असेल महाराष्टÑात शिवसेना घटस्फोट न घेता सरकारला रोज ठोकून काढतच आहे मग आपण का मागे राहावे.ंआता कुणी म्हणेल, एवढाच स्वाभिमान होता तर पाठिंबा काढून पूर्णपणे काडीमोडच का घेतला नाही. पण राजेहो, घटस्फोट का असाएका दमात मिळतो का? कोर्टातही आधी ‘चारसहा महिने नांदून पाहा, मग विचार करा’ असा सल्ला दिला जातो. हे तर राजकारण आहे. येथे मान, स्वाभिमान वगैरे चालत नाही. कोकणातला स्वाभिमान दिल्लीत गहाण ठेवावा लागतो. वाघ फक्त डरकाळीच फोडतो. सत्तेतून बाहेर पडण्याचा स्वाभिमान दाखवत नाही.चंद्राबाबूंनी एक तरी केले. सत्तेतील आपला सहभाग काढून घेतला. सेना मात्र योग्य वेळेची वाट पाहत सोडचिठ्ठीचा कागद तेवढा घेऊन फिरत आहे.आताच्या राजकारणात आणखी एक पैलू दिसतो. ‘ठोशास ठोसा’. चंद्राबाबूंनी केंद्रातून दोन मंत्री काढून घेतले. मोदींनी त्याला प्रत्युत्तर देत आंध्रच्या मंत्रिमंडळातून भाजपाच्या दोन मंत्र्यांना राजीनामा देण्यास लावले. झाले फिट्टमफाट. तुम्ही लेनिनचा पुतळा फोडता, आम्ही श्यामाप्रसादांच्या पुतळ्याला हात घालतो. मग बहुतांशी पक्ष, गट या विद्वेषाच्या बीभत्स राजकारणात सामील होऊन आपली मळमळ बाहेर काढतात. मग यातून महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे पुतळेही सुटत नाहीत. राजकारणात धर्म आणणारे विघ्नसंतोषीही आपल्याकडे कमी नाहीत. एका ठिकाणी हनुमानाच्या मूर्तीचीही विटंबना झाल्याची घटना घडली. हे प्रकार कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही. पण काही राजकारणी यावर आपली पोळी शेकून घेत आहेत एवढे नक्की.परवा एका ठिकाणी काही महाभागांनी महात्मा गांधींचा चष्माच फोडला म्हणे. हे महाभाग बहुतेक गांधीभक्त असावेत. आज देशात जे वातावरण निर्माण झाले, जी फोडाफाडी चालू आहे, ती पाहून आपल्या प्रिय बापंूनी पुन्हा एकदा ‘हे राम’ म्हणू नये ही त्यांची प्रामाणिक भावना असावी. असो! या निमित्ताने का होईना, पुतळ्यांना ‘झेड’ सुरक्षा मिळत आहे हेही नसे थोडके.- दिलीप तिखिले

टॅग्स :BJPभाजपाTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टी