शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकांची मृत्युघंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 02:52 IST

राज्यातील ३१ पैकी आर्थिक अडचणीत असलेल्या १२ बँका राज्य बँकेत विलीन करण्याचा शासन विचार करीत आहे. त्यासाठी ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.

राज्यातील ३१ पैकी आर्थिक अडचणीत असलेल्या १२ बँका राज्य बँकेत विलीन करण्याचा शासन विचार करीत आहे. त्यासाठी ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीने तीन महिन्यांत अहवाल द्यावा, असे शासनाने सुचविले आहे. शेतकºयांना पीककर्ज पुरवठ्यात या बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. राज्य शासनाचा हा निर्णय अडचणीतील जिल्हा बँकांसाठी मृत्युघंटाच आहे. केरळ सरकारनेही अशाच पद्धतीने १४ जिल्हा बँकाचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण केले आहे. रिझर्व्ह बँकेने केरळ, झारखंडसह चार राज्यांत राज्य बँकेनेच थेट प्राथमिक पतपुरवठा संस्थांना कर्जपुरवठा करण्याची द्विस्तरीय पद्धती लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर समिती नेमण्याच्या निर्णयाचा विचार केला पाहिजे. राज्यात आजच्या घडीला तरी जिल्हा बँका याच पीककर्जासाठी शेतकºयांचा प्रमुख आधार आहेत. सन २०१७-१८ मध्ये पीककर्जाचे ४०,५४७ कोटी रुपयांचे खरिपाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात १७,९५३ कोटी (४४ टक्के) वाटप झाले आहे. या ४४ टक्क्यांमध्ये जिल्हा बँकांचा हिस्सा ६३ टक्के आहे. उर्वरित वाटप व्यापारी व ग्रामीण बँकांनी केले आहे. नाशिक, सोलापूरसारख्या नऊ जिल्हा बँकांचे पीककर्ज वाटप ५० टक्क्यांहून कमी आहे; कारण त्यांच्याकडे त्यासाठी निधीच नाही. म्हणजे जिल्हा बँका अडचणीत असल्यामुळे निम्म्याहून जास्त शेतकºयांना खासगी सावकारांच्या दारात ढकलले गेले आहे. विदर्भ-मराठवाड्यात जिल्हा बँकांचा विस्कळीत पतपुरवठा हेच शेतकरी आत्महत्यांचे महत्त्वाचे कारण आहे. कमकुवत बँका विलीन करून सगळे प्रश्न सुटतील असे समजण्याचे कारण नाही. मुळात या बँका अडचणीत का आल्या, याचाच अभ्यास नीट झालेला नाही. जिल्हा बँका, साखर कारखानदारी, सूतगिरण्या यावर राष्ट्रवादी काँग्रेसची मांड राहिली. या संस्था म्हणजे आपल्या बापाची मिळकत असल्यासारखा व्यवहार काही ठिकाणी झाला. कोल्हापूर जिल्हा बँकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एका मतासाठी दोन कोटी रुपये देण्याचा प्रकार घडला आहे; म्हणून या बँका विलीन करून भाजप सरकारला राष्ट्रवादीच्या गंडस्थळावरच हल्ला करायचा आहे. राजकारण म्हणून त्यांनी तो जरुर करावा; परंतु त्या प्रयत्नात शेतकºयांच्या अडचणी वाढू नयेत एवढे भान सरकारने बाळगावे. जादा व्याजदरांच्या ठेवी, गलथान व्यवस्थापन, भ्रष्टाचार, खर्च व उत्पन्न यातील अनिष्ट तफावत अशा कारणांमुळे या बँका अडचणीत आल्या. त्या दुरुस्त करायच्या असतील तर मुळात त्या बँकांचे व्यवस्थापन सुधारले पाहिजे. या बॅँका राज्य बँकेत विलीन करून सगळे प्रश्न सुटणार नाहीत, उलट वाढतील. राज्य बँकेला गावोगावी यंत्रणा उभी करून पतपुरवठा करणे अडचणीचे आहे. त्यास रिझर्व्ह बँक परवानगी देणार का हादेखील मुद्दा आहे. नांदेड, उस्मानाबाद, बीड यासारख्या बँकांना राज्य सरकारने मदत केली. त्यातून त्यांचा बँकिंग परवाना शाबूत राहण्यापलीकडे दुसरे काही झाले नाही. पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारीमुळे कर्जवसुलीची लिंकिंग व्यवस्था आहे. अशी सोय कापूस-सोयाबीनच्या शेतकºयांबाबत नाही. या बँका थकबाकीत जाण्याचे हेही एक महत्त्वाचे कारण आहे. राज्य बँकेची आर्थिक स्थिती जेमतेमच आहे. आता कुठे तिचे सलाईन काढले आहे. अपात्र कर्जामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकही अडचणीत होती. त्या बँकेवर पाच वर्षे प्रशासक नेमल्यानंतर ही बँक पुन्हा रुळावर आली. अशी उपाययोजना करून कमकुवत बँका सुदृढ करणे शक्य आहे. तसे न करता जिल्हा बँकांचे राज्य बॅँकेत विलीनीकरण करण्याचा विचार म्हणजे त्या बँकांसाठीची मृत्युघंटाच आहे.

टॅग्स :bankबँक